ETV Bharat / state

लॉकडाऊन प्रभाव: घरच्या घरीच लग्न आटोपताच केले गरजूंना जेवणाचे वाटप

author img

By

Published : Apr 30, 2020, 7:29 AM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून लॉकडाऊन कधीपर्यंत संपेल याची कल्पना नाही. भिवंडीच्या पडघा गावातील बालाजीनगर येथील नयन नवशा भोईर यांचा विवाह सोहळा आईवडिलांच्या उपस्थित घरच्या घरी पार पाडला. त्यानंतर, नवविवाहित जोडप्याने लग्न सोहळ्यासाठी ठेवलेल्या रकमेतून शेकडो निराधारांना जेवणाची पाकिटे वाटली.

Nayan and Prachi Bhoir
नयन आणि प्राची भोईर

ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले. मात्र, ठाण्यातील उच्चशिक्षित असेलेल्या वधू-वरांनी आईवडिलांच्या उपस्थित तोंडाला मास्क बांधून घरच्या घरी आपला विवाह सोहळा आटोपला. त्यानंतर, लग्न सोहळ्यासाठी ठेवलेल्या रक्कमेतून शेकडो निराधारांना जेवणाची पाकिटे वाटून आपला आगळा वेगळा लग्न सोहळा पार पाडला.

नयन आणि प्राची भोईर यांनी गरजूंना मदत केली
नयन आणि प्राची भोईर यांनी गरजूंना मदत केली

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून लॉकडाऊन कधीपर्यंत संपेल याची कल्पना नाही. भिवंडीच्या पडघा गावातील बालाजीनगर येथील नयन नवशा भोईर यांनी आईवडिलांच्या उपस्थित घरच्याघरी आपला विवाह सोहळा पार पाडला. नयन भोईर हे अभियंता असून त्याची पत्नी प्राची या संगणक प्राध्यापक आहेत. दोघे उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता समाजामध्ये एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपले लग्न सरकारी नियमांचे पालन करुन केले.

यामुळे विवाह सोहळ्यातील रक्कमेतून मुंबई-नाशिक महामार्गावरील पायी जाणारे मजूर आणि गावातील निराधारांना जेवण आणि धान्याचे वाटप या नवविवाहित जोडप्याने केले.

ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले. मात्र, ठाण्यातील उच्चशिक्षित असेलेल्या वधू-वरांनी आईवडिलांच्या उपस्थित तोंडाला मास्क बांधून घरच्या घरी आपला विवाह सोहळा आटोपला. त्यानंतर, लग्न सोहळ्यासाठी ठेवलेल्या रक्कमेतून शेकडो निराधारांना जेवणाची पाकिटे वाटून आपला आगळा वेगळा लग्न सोहळा पार पाडला.

नयन आणि प्राची भोईर यांनी गरजूंना मदत केली
नयन आणि प्राची भोईर यांनी गरजूंना मदत केली

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून लॉकडाऊन कधीपर्यंत संपेल याची कल्पना नाही. भिवंडीच्या पडघा गावातील बालाजीनगर येथील नयन नवशा भोईर यांनी आईवडिलांच्या उपस्थित घरच्याघरी आपला विवाह सोहळा पार पाडला. नयन भोईर हे अभियंता असून त्याची पत्नी प्राची या संगणक प्राध्यापक आहेत. दोघे उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता समाजामध्ये एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपले लग्न सरकारी नियमांचे पालन करुन केले.

यामुळे विवाह सोहळ्यातील रक्कमेतून मुंबई-नाशिक महामार्गावरील पायी जाणारे मजूर आणि गावातील निराधारांना जेवण आणि धान्याचे वाटप या नवविवाहित जोडप्याने केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.