ETV Bharat / state

स्वतःच मत नसताना केवळ १२ दिवसात सपाचे उमेदवार ठरले आमदारकीचे मानकरी

author img

By

Published : Oct 27, 2019, 4:42 PM IST

भिवंडीसाठी नवखे असलेले व मतदारसंघात स्वतःचे एक मत नसणारे मुंबई, भायखळ्याचे समाजवादीचे नगरसेवक रईस कलाम शेख अवघ्या १२ दिवसाच्या प्रचारात आमदारकी मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. ही किमया फक्त भिवंडी पूर्व मतदारसंघात घडू शकते हे विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

रईस कलाम शेख

ठाणे- भिवंडीसाठी नवखे असलेले व मतदारसंघात स्वतःचे एक मत नसणारे मुंबई, भायखळ्याचे समाजवादीचे नगरसेवक रईस कलाम शेख अवघ्या १२ दिवसाच्या प्रचारात आमदारकी मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. ही किमया फक्त भिवंडी पूर्व मतदारसंघात घडू शकते हे विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ येथे मुस्लिम बहुल अल्पसंख्यांक मतांचा भरणा असून यामध्ये मुस्लिम मते ६० टक्के तर हिंदू व अन्य मिळून ४० टक्के मते आहे. हा मतादारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात अल्पसंख्यांक मतांच्या विभाजनाचा फायदा घेत २०१० ची पोटनिवडणूक व २०१४ ची विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निसटता विजय संपादन करून आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र, या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षता व विकासाचा मुद्दा बाजूला सारून कट्टर धर्मकारण पुढे करून समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा आपले पाय रोवले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य असतानाही संतोष शेट्टी यांना पराभव पत्कारावा लागला आहे.

भिवंडी पूर्व मतदारसंघात एकूण मतदान २ लाख ६९ हजार ९३५ एवढे असून त्यापैकी या निवडणुकीत १ लाख २७ हजार ९१३ मतदान झाले होते. यामध्ये मुस्लिम मते ६० टक्के तर हिंदू व अन्य ४० टक्के मते होती. मात्र यामध्ये संतोष शेट्टी यांची तेलुगू व्होट बँक ही ३० हजारांपेक्षा अधिक आहे. असे असताना धार्मिक ध्रुवीकरणामुळे त्यांच्या पारड्यात मुस्लिम मतदारांनी पुरती पाठ फिरवली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे.

हेही वाचा- सिडकोनिर्मित्त जुन्या व मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांची फरफट

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी शहरातील काँग्रेस पक्षाची पुरती ससे होलपट झालेली आहे. काँग्रेस पदाधिकारी निव्वळ एखादा उमेदवार शोधून त्याला बळीचा बकरा बनवत आहेत, असे चित्र समोर होते. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस उमेदवार म्हणून सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना गळ घालून दिल्ली वाऱ्या करायला लावून त्यांना कोट्यवधीच्या नुकसानीत टाकले होते. तर, यावेळी काँग्रेसने संतोष शेट्टी यांना भाजपचे शहराध्यक्ष पद सोडण्यास लावून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली होती. मात्र, त्यांना मतदानासाठी मदत न करता कँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे कँग्रेस पराभूत झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

हेही वाचा- ठाण्यात 'दिवाळी पहाट'मध्ये तरुणाईचा जल्लोष

ठाणे- भिवंडीसाठी नवखे असलेले व मतदारसंघात स्वतःचे एक मत नसणारे मुंबई, भायखळ्याचे समाजवादीचे नगरसेवक रईस कलाम शेख अवघ्या १२ दिवसाच्या प्रचारात आमदारकी मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. ही किमया फक्त भिवंडी पूर्व मतदारसंघात घडू शकते हे विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ येथे मुस्लिम बहुल अल्पसंख्यांक मतांचा भरणा असून यामध्ये मुस्लिम मते ६० टक्के तर हिंदू व अन्य मिळून ४० टक्के मते आहे. हा मतादारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात अल्पसंख्यांक मतांच्या विभाजनाचा फायदा घेत २०१० ची पोटनिवडणूक व २०१४ ची विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निसटता विजय संपादन करून आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र, या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षता व विकासाचा मुद्दा बाजूला सारून कट्टर धर्मकारण पुढे करून समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा आपले पाय रोवले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य असतानाही संतोष शेट्टी यांना पराभव पत्कारावा लागला आहे.

भिवंडी पूर्व मतदारसंघात एकूण मतदान २ लाख ६९ हजार ९३५ एवढे असून त्यापैकी या निवडणुकीत १ लाख २७ हजार ९१३ मतदान झाले होते. यामध्ये मुस्लिम मते ६० टक्के तर हिंदू व अन्य ४० टक्के मते होती. मात्र यामध्ये संतोष शेट्टी यांची तेलुगू व्होट बँक ही ३० हजारांपेक्षा अधिक आहे. असे असताना धार्मिक ध्रुवीकरणामुळे त्यांच्या पारड्यात मुस्लिम मतदारांनी पुरती पाठ फिरवली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे.

हेही वाचा- सिडकोनिर्मित्त जुन्या व मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांची फरफट

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी शहरातील काँग्रेस पक्षाची पुरती ससे होलपट झालेली आहे. काँग्रेस पदाधिकारी निव्वळ एखादा उमेदवार शोधून त्याला बळीचा बकरा बनवत आहेत, असे चित्र समोर होते. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस उमेदवार म्हणून सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना गळ घालून दिल्ली वाऱ्या करायला लावून त्यांना कोट्यवधीच्या नुकसानीत टाकले होते. तर, यावेळी काँग्रेसने संतोष शेट्टी यांना भाजपचे शहराध्यक्ष पद सोडण्यास लावून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली होती. मात्र, त्यांना मतदानासाठी मदत न करता कँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे कँग्रेस पराभूत झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

हेही वाचा- ठाण्यात 'दिवाळी पहाट'मध्ये तरुणाईचा जल्लोष

Intro:kit 319Body:स्वतः च मत नसताना केवळ १२ दिवसात सपाचे उमेदवार ठरले आमदारकीचे मानकरी

ठाणे ; भिवंडीसाठी नवखे असलेले तसेच त्यांचे मतदारसंघात स्वतःचे देखील एक मत नसताना मुंबई ,भायखळ्याचे समाजवादीचे नगरसेवक रईस कलाम शेख अवघ्या १२ दिवसाच्या प्रचारात आमदारकी मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. हि किमया फक्त भिवंडी पूर्व मतदारसंघात घडू शकते एवढे मात्र नक्की झाले.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघ मुस्लिम बहुल अल्पसंख्याक मतांचा भरणा असून यामध्ये मुस्लिम मते ६० टक्के तर हिंदू व अन्य ४० टक्के मते असलेला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघात अल्पसंख्याक मतांच्या विभाजनाचा फायदा घेत २०१०ची पोटनिवणूक व २०१४ची विधानसभा निवडणूक या दोन निवडणूकीत शिवसेनेने निसटता विजय संपादन करून आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षता व विकासाचा मुद्दा बाजूला करून कट्टर धर्मकारण पुढे करून समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा भिवंडीत आपले पाय रोवले आहेत. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य असतानाही संतोष शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला आहे.

भिवंडी पूर्व या मतदार संघात एकूण मतदान २ लाख ६९ हजार ९३५ असे असून त्यापैकी या निवडणुकीत १ लाख २७ हजार ९१३ मतदान झाले होते. यामध्ये मुस्लिम मते ६० टक्के तर हिंदू व अन्य ४० टक्के मते होती. मात्र यामध्ये संतोष शेट्टी यांची तेलुगू व्होट बँक हि ३० हजारांपेक्षा अधिक आहे. असे असताना धार्मिक ध्रुवीकरणामुळे त्यांच्या पारड्यात मुस्लिम मतदारांनी पुरती पाठ फिरवली त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे. या विधानसभा निवडणुकीत भिवंडी शहरातील काँग्रेस पक्षाची पुरती ससे होलपट झालेली आहे. तर काँग्रेस पदाधिकारी निव्वळ एखादा उमेदवार शोधून त्याला बळीचा बकरा बनवत आहेत. असे चित्र समोर येत आहे. लोकसभा निवडणूकीतही काँग्रेस उमेदवार म्हणून सुरेश (बाळ्या मामा ) म्हात्रे यांना गळ घालून दिल्ली वाऱ्या करायला लावून त्यांना कोट्यवधीच्या नुकसानीत टाकले होते. तर यावेळी भाजपचे शहराध्यक्ष पद सोडण्यास लावून संतोष शेट्टी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालून त्यांना मतदानासाठी मदत न करता फक्त कॉग्रेस नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने कॉग्रेस पराभूत झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.


Conclusion:sp bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.