ठाणे : बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराज गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. मीरा भाईंदर येथे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा दोन दिवसीय दिव्य दर्शन दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आज धीरेंद्र शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य केले. आहे. ते म्हणाले की, राजकीय नेते काही विधान करतात. पण मी त्यावर बोलणार नाही. मलाही काही लोक जादू टोणा करणारा बोलतात, पण आम्ही हनुमान भक्त आहोत. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. म्हणून महाराष्ट्रापासून हिंदु राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे ते म्हणाले आहेत. ते भिवंडी तालुक्यातील अंजुरदिवे येथील इंडियन कॉर्पोरेशन माईलस्टोन येथे आज दुपारी भूमिपूजनाचा कार्यक्रम आले होते. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला.
सनातन धर्माचा झेंडा रोवणार : भाईंदर येथील झालेल्या कार्यक्रमादरम्यान मायानगरी मुंबईचे माधव नगरी बाबत भाष्य केले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मायनगरी ही चमक चंदेरी दुनिया आहे. या मायानगरीत लोक अडकली आहे. आता हीच लोकं त्यामधून बाहेर येऊन ती देवाच्या भक्तीत लिन होत आहे. मुंबईतील व्यवस्था पाहून लोकांनी मायानगरी सोडून माधवच्या मागेही धावावे यासाठी महानगरी मुंबईची नाव माधव नगरी केले आहे. भारतातील काही लोक सनातन धर्मातील साधू संतांना कायम विरोध करतात. त्या विरोध करणाऱ्या लोकांच्या छातीवर एक दिवस सनातन धर्माचा झेंडा रोवणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.