ETV Bharat / state

शून्य शून्याकडे गेला तरी शून्यच, आशिष शेलारांचा राष्ट्रवादीसह मनसेला टोला

author img

By

Published : Oct 10, 2019, 5:23 PM IST

Updated : Oct 10, 2019, 5:45 PM IST

एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल, असा टोला शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीसह मनसेला लगावला.

आशिष शेलार

मुंबई - एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल, असा टोला शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीसह मनसेला लगावला. कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहरमध्ये राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेत मनसेला छुपा पाठिंबा दिला आहे. यावरुन शेलार यांनी राष्ट्रवादीसह मनसेला लक्ष्य केले. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 1 लाख 67 हजार शेततळी आणि विहिरी दिल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या काळातील आकडेवारी सांगावी असे थेट आवाहनही त्यांनी यावेळी दिले.

आशिष शेलारांचा राष्ट्रवादीसह मनसेला टोला

मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही सरकारने खूप कामे केली आहेत. या ठिकाणी अनेक प्रकल्प आणि बेघरांना घरे दिली आहेत. गतिमान वाहतुकीसाठी या सरकारने काम केले आहे. समृद्धी महामार्गाचेही काम चालू आहे. मेट्रो प्रकल्प देखील आपण वेगात आणला. रोजगाराकडे या सरकारने लक्ष दिले आहे.

हेही वाचा - सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नाही - निर्मला सीतारामन

हेही वाचा - पवारांचे नाव येताच ईडीला घाम फुटला- खा. कोल्हे

मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी भाजप सरकारने सर्वांना एकत्र घेतले. शरद पवार यांच्या काळात किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली? असा सवालही यावेळी त्यांनी केला. सहकारी बँकांना त्यांनी पैसे दिले हे आता उच्च न्यायालयानेदेखील स्पष्ट केले आहे. असे वक्तव्य करुन त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे. आरेबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याबाबत मी काही बोलू इच्छित नसल्याचे शेलार म्हणाले. युतीच्या वचनामाप्रमाणे युती सरकार राम मंदिर पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.

मुंबई - एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल, असा टोला शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीसह मनसेला लगावला. कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहरमध्ये राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेत मनसेला छुपा पाठिंबा दिला आहे. यावरुन शेलार यांनी राष्ट्रवादीसह मनसेला लक्ष्य केले. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना 1 लाख 67 हजार शेततळी आणि विहिरी दिल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या काळातील आकडेवारी सांगावी असे थेट आवाहनही त्यांनी यावेळी दिले.

आशिष शेलारांचा राष्ट्रवादीसह मनसेला टोला

मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही सरकारने खूप कामे केली आहेत. या ठिकाणी अनेक प्रकल्प आणि बेघरांना घरे दिली आहेत. गतिमान वाहतुकीसाठी या सरकारने काम केले आहे. समृद्धी महामार्गाचेही काम चालू आहे. मेट्रो प्रकल्प देखील आपण वेगात आणला. रोजगाराकडे या सरकारने लक्ष दिले आहे.

हेही वाचा - सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नाही - निर्मला सीतारामन

हेही वाचा - पवारांचे नाव येताच ईडीला घाम फुटला- खा. कोल्हे

मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी भाजप सरकारने सर्वांना एकत्र घेतले. शरद पवार यांच्या काळात किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली? असा सवालही यावेळी त्यांनी केला. सहकारी बँकांना त्यांनी पैसे दिले हे आता उच्च न्यायालयानेदेखील स्पष्ट केले आहे. असे वक्तव्य करुन त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे. आरेबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याबाबत मी काही बोलू इच्छित नसल्याचे शेलार म्हणाले. युतीच्या वचनामाप्रमाणे युती सरकार राम मंदिर पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.

Intro:
एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल असा टोला आशिष शैलार यांनी आघाडी आणि मनसेला लगावलाय
Body:
एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल असा टोला आशिष शैलार यांनी आघाडी आणि मनसेला लगावलाय... ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहर या ठिकाणी उमेदवारी मागे घेत मनसेला राष्ट्रवादी काॅंग्रेसने छुपा पाठिंबा दिला असून काही ठिकाणी तर मनसे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचार करताहेत... या प्रश्नावर आशिष शैलार यांनी हा टोला लगावलाय... ठाण्यात एका कार्यक्रमा दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते याच बरोबर
1 लाख 67 हजार शेततळी आणि विहिरी आपण या राज्यात दिले, आघाडीच्या काळातील त्यांनी त्यांची आकडेवारी त्यांनी सांगावी असं थेट आव्हान
देखील आशिष शैलार यांनी आघाडीला केलय.
मराठवाडा या भागात गेल्या अनेक वर्षे दुष्काळ पाहिला या भागात देखील भाजप कडून प्रयत्न करण्यात आले.अनेक प्रकल्प आणि बेघराना घरे दिली, ग्रामीण भागात विकास कामे केली,
समृद्धी महामार्ग याचे देखील काम सुरू आहे.
गतिमान वाहतुकी साठी या सरकारने काम केले. मेट्रो हा प्रकल्प देखील आपण वेग आणला. मेट्रो mmrd च्या रिजन मध्ये नेली, कर्ज आणि महसूल वेळेत पूर्ण केले, रोजगार कडे या सरकारने लक्ष दिले, मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्वाना एकत्र येऊन भाजप सरकारने पाठपुरावा केला या सरकारने केला. हा पाढा वाचत शेतकऱ्यांची कर्ज माफी शरद पवार यांच्या काळात किती केली? असा प्रश्न देखील यावेळेस आशिष शैलार यांनी विचारला. सहकारी बँकांना त्यांनी पैसे दिले आता हाय कोर्टाने देखील स्पष्ट केले आहे.ही मुद्दा काढून आशिष शैलार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काॅंग्रेसला डिवचलय.तर आरे बाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे त्या बाबत मी काही बोलू इच्छित नाही मी उमेदवार आहे
असं बोलून रामजन्म भूमी युतीचा वचनामा प्रमाणे युती सरकार पूर्ण करेल हा पुर्नरुच्चार देखील आशिष शैलार यांनी केलाय.


बाईट १ : आशिष शैलार, मंत्री, भाजपाConclusion:
Last Updated : Oct 10, 2019, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.