ETV Bharat / state

Bird Flu Thane : ठाण्याच्या शहापुरात ३००हून अधिक कोंबड्या दगावल्या; 'बर्ड फ्लू'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आरोग्ययंत्रणा सतर्क

शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ( Bird Flu in Thane ) या फार्ममधील आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगवल्याची बाब समोर आल्या आहेत. ( 300 Hens Died ) या घटनेनंतर पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना विभागाकडून केल्या जात आहेत. ( Thane Veternary Health Department )

author img

By

Published : Feb 18, 2022, 11:35 AM IST

Updated : Feb 18, 2022, 1:34 PM IST

300 hens died in shahapur thane
Bird Flu Thane

ठाणे - शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ( Bird Flu in Thane ) या फार्ममधील आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगवल्याची बाब समोर आल्या आहेत. ( 300 Hens Died ) या घटनेनंतर पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना विभागाकडून केल्या जात आहेत. ( Thane Veternary Health Department )

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर याबाबत बोलताना

मृत व जिवंत कोंबड्याना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न -

शहापूर तालुक्यातील वाशिंद नजीक वेहळोली गावात मुक्तजीवन नावाने पोल्ट्री फार्म आहे. या फार्म मधील शेडमध्ये देशी कोंबड्या व बदके काल सायंकाळच्या सुमारास अचानक मृत्युमुखी पडत होती. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय अधिकाराला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र उपचारांनंतरही कोंबड्या दगावत असल्याने मृत कोंबड्यांचे शवविच्छेदनाचे व जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्या अहवालामध्ये कोंबड्याना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले.

शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांना मारून निर्मनुष्य जागी पुरणार -

कोंबड्याना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या घटनेची गांभीर्याने दाखल घेत, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह ७० जणांच्या पथकाने वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीमध्ये धाव घेतली. त्यानंतर एक किलोमीटर परिघात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील किंवा घरगुती पाळीव अशा सर्व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांना मारून निर्मनुष्य जागी पुरणार आल्याचे सांगण्यात आले. तर जिल्हा प्रशासनांकडून पुढील निर्देश येईपर्यत या परिसरात कोंबड्या पाळण्यावर बंदी असणार आहे. शिवाय एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या आणि बदके यांचे कलिंग करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - चालत्या ट्रेनमधून पडून रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

चिकन किंवा अंडी खाण्यास कोणतीही भिती नाही; पण -

बर्ड फ्ल्यूपासून माणसांना संसर्ग होण्याचा धोका आपल्याकडे अत्यंत कमी असून ७० डिग्रीवर शिजवलेले चिकन किंवा अंडी खाण्यास कोणतीही भिती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पशुसंवर्धन विभागाने एकीकडे योग्य तापमानावर शिजवून चिकन खाण्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले असले. अशातच आता बर्ड फ्ल्यूचा शिरकाव पुन्हा झाल्याच्या पार्श्वभूमीवर कुकटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळाले आहे.

परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून -

शहापूर तालुक्यातील वाशिंद नजीक वेहळोली गावातील पोल्ट्री फार्म सोडून इतर कुठेही कोंबड्याना अशी लागण झाल्याचे निदर्शनास आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या सर्व परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी, राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

ठाणे - शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ( Bird Flu in Thane ) या फार्ममधील आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगवल्याची बाब समोर आल्या आहेत. ( 300 Hens Died ) या घटनेनंतर पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना विभागाकडून केल्या जात आहेत. ( Thane Veternary Health Department )

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर याबाबत बोलताना

मृत व जिवंत कोंबड्याना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न -

शहापूर तालुक्यातील वाशिंद नजीक वेहळोली गावात मुक्तजीवन नावाने पोल्ट्री फार्म आहे. या फार्म मधील शेडमध्ये देशी कोंबड्या व बदके काल सायंकाळच्या सुमारास अचानक मृत्युमुखी पडत होती. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय अधिकाराला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र उपचारांनंतरही कोंबड्या दगावत असल्याने मृत कोंबड्यांचे शवविच्छेदनाचे व जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्या अहवालामध्ये कोंबड्याना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले.

शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांना मारून निर्मनुष्य जागी पुरणार -

कोंबड्याना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या घटनेची गांभीर्याने दाखल घेत, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह ७० जणांच्या पथकाने वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीमध्ये धाव घेतली. त्यानंतर एक किलोमीटर परिघात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील किंवा घरगुती पाळीव अशा सर्व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांना मारून निर्मनुष्य जागी पुरणार आल्याचे सांगण्यात आले. तर जिल्हा प्रशासनांकडून पुढील निर्देश येईपर्यत या परिसरात कोंबड्या पाळण्यावर बंदी असणार आहे. शिवाय एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या आणि बदके यांचे कलिंग करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - चालत्या ट्रेनमधून पडून रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

चिकन किंवा अंडी खाण्यास कोणतीही भिती नाही; पण -

बर्ड फ्ल्यूपासून माणसांना संसर्ग होण्याचा धोका आपल्याकडे अत्यंत कमी असून ७० डिग्रीवर शिजवलेले चिकन किंवा अंडी खाण्यास कोणतीही भिती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पशुसंवर्धन विभागाने एकीकडे योग्य तापमानावर शिजवून चिकन खाण्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले असले. अशातच आता बर्ड फ्ल्यूचा शिरकाव पुन्हा झाल्याच्या पार्श्वभूमीवर कुकटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळाले आहे.

परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून -

शहापूर तालुक्यातील वाशिंद नजीक वेहळोली गावातील पोल्ट्री फार्म सोडून इतर कुठेही कोंबड्याना अशी लागण झाल्याचे निदर्शनास आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या सर्व परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी, राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

Last Updated : Feb 18, 2022, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.