ETV Bharat / state

करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेतून नाव वगळा अन् टँकरने पाणी द्या, घोटी ग्रामस्थांची मागणी

author img

By

Published : May 12, 2020, 2:07 PM IST

करमाळा तालुक्यातील घोटी गावात दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी येतो. पण, यंदा पाणी न आल्याने गावात पाणी टंचाई भासत आहे. यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी गावकरी करत आहेत.

पाण्यासाठी फिरताना चिमुकले
पाण्यासाठी फिरताना चिमुकले

करमाळा (सोलापूर) - दहिगाव उपसा सिंचन योजनेतून टेल तू हेड म्हणजेच शेवटच्यापासून ते सुरुवातीच्या गावापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, घोटी या टेल म्हणजेच शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. यामुळे या गावात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जेऊन प्रादेशिक योजना सुरु करावी व घोटी गावाला पाण्याची सोय करावी, यामागणीचे निवेदन गावकऱ्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे दिले आहेत. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार, पालकमंत्री देण्यात आल्या आहेत.

व्यथा मांडताना सरपंच

घोटी गावची लोकसंख्या 5 हजार असून गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील सर्व विंधनविहरी कोरड्या पडल्या आहेत. घोटी हे गाव दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या शेवटच्या टप्प्यात येते. (टेल मायनर) या योजनेतून घोटी गावाला रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन योग्य प्रमाणात मिळालेले नाही. या आवर्तनातून गावठाणातील ओढे बंधारे भरणे अपेक्षित होते. पण, पाण्याच्या अयोग्य वाटपामुळे हक्काचे पाणी गावाला मिळालेले नाही. त्यामुळे गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याप्रकाराची चौकशी करून नियमाप्रमाणे दहीगावचे पाणी घोटी गावासाठी लवकरात लवकर चालू करावे. अन्यथा घोटी गावाचे नाव टेल आरखड्यातून नाव वगळून पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

हेही वाचा - सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या 275 वर; 17 जणांचा मृत्यू

करमाळा (सोलापूर) - दहिगाव उपसा सिंचन योजनेतून टेल तू हेड म्हणजेच शेवटच्यापासून ते सुरुवातीच्या गावापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, घोटी या टेल म्हणजेच शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. यामुळे या गावात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जेऊन प्रादेशिक योजना सुरु करावी व घोटी गावाला पाण्याची सोय करावी, यामागणीचे निवेदन गावकऱ्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे दिले आहेत. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार, पालकमंत्री देण्यात आल्या आहेत.

व्यथा मांडताना सरपंच

घोटी गावची लोकसंख्या 5 हजार असून गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील सर्व विंधनविहरी कोरड्या पडल्या आहेत. घोटी हे गाव दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या शेवटच्या टप्प्यात येते. (टेल मायनर) या योजनेतून घोटी गावाला रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन योग्य प्रमाणात मिळालेले नाही. या आवर्तनातून गावठाणातील ओढे बंधारे भरणे अपेक्षित होते. पण, पाण्याच्या अयोग्य वाटपामुळे हक्काचे पाणी गावाला मिळालेले नाही. त्यामुळे गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याप्रकाराची चौकशी करून नियमाप्रमाणे दहीगावचे पाणी घोटी गावासाठी लवकरात लवकर चालू करावे. अन्यथा घोटी गावाचे नाव टेल आरखड्यातून नाव वगळून पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

हेही वाचा - सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या 275 वर; 17 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.