ETV Bharat / state

उजनी धरण ५० टक्के भरले; 1 लाख 25 हजार क्युसेक पाण्याची आवक

author img

By

Published : Aug 4, 2019, 8:10 PM IST

Updated : Aug 4, 2019, 8:29 PM IST

उजनी धरणात सुमारे 1 लाख 25 हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

धरणाच्या कालव्याद्वारे 800 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

सोलापूर - उजनी धरणात सुमारे 1 लाख 25 हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी धरणाच्या कालव्याद्वारे 800 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. उद्यापासून हे प्रमाण 2000 क्युसेक पर्यंत वाढणार असून, यामध्ये वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे भीमा नदीला पूर आला आहे.

धरणाच्या कालव्याद्वारे 800 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

पुण्यातील सर्व धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने यांमधून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. दौंड येथील विसर्गातून उजनीत सुमारे एक लाख 25 हजार क्युसेक वेगाने पाणी मिसळत आहे. यामुळे दररोज जवळपास 18 टीएमसी पाणी धरणात येत असून, हा वेग कायम राहिल्यास येत्या चार ते पाच दिवसांमध्ये उजनीत शंभर टक्के पाणीसाठा होईल. या धरणाची क्षमता 121 टीएमसी आहे.

तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून सुमारे 42 हजार क्युसेक पाणी सोडल्याने पंढरपूरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे अनेक मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली आहे.

सोलापूर - उजनी धरणात सुमारे 1 लाख 25 हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी धरणाच्या कालव्याद्वारे 800 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. उद्यापासून हे प्रमाण 2000 क्युसेक पर्यंत वाढणार असून, यामध्ये वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे भीमा नदीला पूर आला आहे.

धरणाच्या कालव्याद्वारे 800 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

पुण्यातील सर्व धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने यांमधून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. दौंड येथील विसर्गातून उजनीत सुमारे एक लाख 25 हजार क्युसेक वेगाने पाणी मिसळत आहे. यामुळे दररोज जवळपास 18 टीएमसी पाणी धरणात येत असून, हा वेग कायम राहिल्यास येत्या चार ते पाच दिवसांमध्ये उजनीत शंभर टक्के पाणीसाठा होईल. या धरणाची क्षमता 121 टीएमसी आहे.

तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून सुमारे 42 हजार क्युसेक पाणी सोडल्याने पंढरपूरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे अनेक मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली आहे.

Intro:mh_sol_01_ujani_water_7201168

उजनी।धरणात 1 लाख 25 हजार कुसेक ने पाण्याची आवक, उजनीची वाटचाल 50 टक्क्या कडे
सोलापूर-
उजनी धरणात रविवारी सायंकाळी सुमारे एक लाख 25 हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी 50 टक्के पर्यंत गेली आहे.Body:धरण 50 टक्के च्या पुढे भरल्यामुळे आता उजनीतून खाली पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे कालव्याद्वारे 300 कुसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. उद्यापासून हाच वेग दोन हजार कुसेक केला जाणार आहे. तर वीज निर्मितीसाठी सोळाशे कुसेक पाणी सोडले जात आहे पुण्यातील सर्व धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे पुण्यातून उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे दौंड येथील निसर्गातून उजनी मध्ये सुमारे एक लाख 25 हजार कुसेक वेगाने पाणी मिसळत आहे.
म्हणजेच एका दिवसाला जवळपास 18 टीएमसी इतके पाणी उजनी धरणात येत आहे उजनी धरणाची क्षमता 121 टीएमसी इतकी आहे. एवढाच पाण्याचा वेग राहिला तर येत्या चार ते पाच दिवसांमध्ये उजनी धरण शंभर टक्के भरेल. एकीकडे सोलापूर जिल्हा पावसासाठी व्याकुळ झाला असताना भीमा नदी मात्र आता दुथडी भरून वाहू लागली आहे सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून सुमारे 42 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे वीर धरणातील पाणी हे संगम जवळ भीमा नदीला मिळत आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेला भरपूर पाणी आले आहे अनेक मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली आहे.
Conclusion:नोट. सोबत जोडलेला व्हिडीओ हा कालव्यातून पाणी सोडताना आहे.
Last Updated : Aug 4, 2019, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.