ETV Bharat / state

सडक्या मनोवृत्तीचा प्रत्यय : अज्ञाताने फवारले बागेवर तणनाशक, तीन एक द्राक्ष जळाले

पंढरपूर तालुक्यातील तनाळी येथील शेतकरी नवनाथ लवटे यांच्या ३ एकरच्या द्राक्ष बागेत फवारणी करण्याच्या पाण्याच्या टाकीत कोणीतरी तणनाशक टाकल्यामुळे त्यांची संपूर्ण द्राक्ष बाग जळून गेली. संपूर्ण बाग जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांने ३ एकर बाग तोडून टाकली.

author img

By

Published : Jan 20, 2020, 4:34 PM IST

अज्ञाताने फवारले द्राक्ष बागेवर तणनाशक
अज्ञाताने फवारले द्राक्ष बागेवर तणनाशक

सोलापूर - सडक्या मनोवृत्तीचा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचे उदाहरण पंढरपूर तालूक्यात पाहायला मिळाले. तनाळी गावातील शेतकरी नवनाथ लवटे यांच्या द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीने 'तणनाशक' फवारणी करण्याच्या टाकीमध्ये टाकले, त्यामुळे संपूर्ण द्राक्ष बाग जळून गेली आणि नवनाथ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अज्ञाताने फवारले द्राक्ष बागेवर तणनाशक

पंढरपूर तालुक्यातील तनाळी येथील शेतकरी नवनाथ लवटे यांची ३ एकर द्राक्ष बाग आहे. मोठ्या मेहनतीने पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी या बागेची जोपासना केली. मात्र, बागेत फवारणी करण्याच्या पाण्याच्या टाकीत कोणीतरी तणनाशक टाकल्यामुळे त्यांची संपूर्ण द्राक्ष बाग जळून गेली. संपूर्ण बाग जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांने ३ एकर बाग तोडून टाकली. गेल्या वर्षी नवनाथ यांना द्राक्ष बागेतून जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यावर्षीच्या या घटनेमुळे लवटे कुटुंबावर आभाळ कोसळले.

हेही वाचा - विषमता आणि बेरोजगार यापासून मुक्ती म्हणजे देशभक्ती - प्रा. अजित अभ्यंकर

नुकसान झालेल्या द्राक्ष बागेला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार, पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी भेट दिली. कृषी अधिकाऱ्यांनी या बागेची पाहणी करून पंचनामे करावेत आणि या शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात यावी. सोबतच शेतकऱ्यांच्या बाबतीत पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपींना शोधून शिक्षा करावी, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक व पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख यांनी केली.

लवटे यांच्या द्राक्ष बागेत झालेल्या नुकसानीच्या घटनेमुळे तनाळी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा - 24 तारखेला बार्शीचा 'म्होरक्या' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सडक्या मनोवृत्तीचा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचे उदाहरण पंढरपूर तालूक्यात पाहायला मिळाले. तनाळी गावातील शेतकरी नवनाथ लवटे यांच्या द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीने 'तणनाशक' फवारणी करण्याच्या टाकीमध्ये टाकले, त्यामुळे संपूर्ण द्राक्ष बाग जळून गेली आणि नवनाथ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अज्ञाताने फवारले द्राक्ष बागेवर तणनाशक

पंढरपूर तालुक्यातील तनाळी येथील शेतकरी नवनाथ लवटे यांची ३ एकर द्राक्ष बाग आहे. मोठ्या मेहनतीने पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी या बागेची जोपासना केली. मात्र, बागेत फवारणी करण्याच्या पाण्याच्या टाकीत कोणीतरी तणनाशक टाकल्यामुळे त्यांची संपूर्ण द्राक्ष बाग जळून गेली. संपूर्ण बाग जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांने ३ एकर बाग तोडून टाकली. गेल्या वर्षी नवनाथ यांना द्राक्ष बागेतून जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यावर्षीच्या या घटनेमुळे लवटे कुटुंबावर आभाळ कोसळले.

हेही वाचा - विषमता आणि बेरोजगार यापासून मुक्ती म्हणजे देशभक्ती - प्रा. अजित अभ्यंकर

नुकसान झालेल्या द्राक्ष बागेला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार, पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी भेट दिली. कृषी अधिकाऱ्यांनी या बागेची पाहणी करून पंचनामे करावेत आणि या शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात यावी. सोबतच शेतकऱ्यांच्या बाबतीत पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपींना शोधून शिक्षा करावी, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक व पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख यांनी केली.

लवटे यांच्या द्राक्ष बागेत झालेल्या नुकसानीच्या घटनेमुळे तनाळी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा - 24 तारखेला बार्शीचा 'म्होरक्या' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Intro:mh_sol_01_greps_farm_contro_7201168
सडक्या मनोवृत्तीचा प्रत्यय, द्राक्ष बागेवर तणनाशक फवारले, तीन एक द्राक्ष जळाले.
सोलापूर-
सडक्या मनोवृत्तीचा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो याचे उत्तम पंढरपूर तालूक्यात पहायला मिळाले आहे. माणूस जातीला काळीमा फासणारी घटना पंढरपूर तालूक्यातील तनाळी गावच्या शिवारात घडली आहे. तनाळी गावातील शेतकरी नवनाथ लवटे यांच्या द्राक्ष बागेवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तणनाशक हे फवारणी करण्याच्या टाकीमध्ये टाकले आहे. तणनाशकामुळे संपूर्ण बाग जळून गेली आहे आणि नवनाथ लवटे यांच्यावर आभाळच कोसळले आहे.Body:पंढरपूर तालुक्यातील तनाळी येथील शेतकरी नवनाथ लवटे यांची तीन एकर द्राक्ष बाग आहे. पोटच्या लेकरापेक्षाही जास्त द्राक्ष बागेची जोपासना केली आहे. वर्षभर मेहनत करून पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या द्राक्ष बागेत फवारणी करण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये कोणीतरी तणनाशक टाकले आणि द्राक्ष बागेच होत्याच नव्हत झालं.
फवारणी करायच्या टाकीमध्ये तणनाशक टाकल्यामुळे संपूर्ण द्राक्ष बाग जळून गेली आहे. संपूर्ण बाग जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांन तीन एकर बाग तोडून टाकली आहे. मागील वर्षी नवनाथ लवटे यांनी द्राक्ष बागेतून जवळपास १० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते.या घटनेमुळे लवटे कुटुंब हे चांगलेच अडचणीत आले आहे.

नुकसान झालेल्या द्राक्ष बागेला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार,पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी भेट दिली.
कृषी अधिकार्यांनी या बागेची पाहणी करुन पंचनामे करावेत.आणि या शेतकर्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात यावी.शेतकर्यांच्या बाबतीत पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपींना शोधून शिक्षा करण्यात यावी.अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक व पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख यांनी केली आहे.
लवटे यांच्या द्राक्ष बागेतील झालेल्या नुकसानीच्या घटनेमुळे तनाळी परिसरात शेतकऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी पंढरपूर शहर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करणार आहोत. Conclusion:Note - रेडी टू एअर पॅकेज पाठविले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.