ETV Bharat / state

सत्ता कुणाचीही आली तरी, कॅबिनेट मंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीचेच - सुप्रिया सुळे

author img

By

Published : Aug 25, 2019, 12:32 PM IST

Updated : Aug 25, 2019, 12:42 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे नेते तसेच विधानसभा पातळीवरील अनेक नेते पक्ष सोडत आहेत. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

सुप्रिया सुळे

सोलापूर - देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे सीबीआयला हाताशी धरून नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात गोवण्याच्या धमक्या देत पक्षांतर घडवून आणत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. भविष्यात महाराष्ट्रात कोणतेही सरकार सत्तेत आले तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच कॅबिनेट मंत्री असतील, असेही सुळे यांनी सांगितले. त्या सोलापुरात पत्रकारांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी खासदार

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते पक्ष सोडून चालले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे नेते तसेच विधानसभा पातळीवरील अनेक नेते पक्ष सोडत आहेत. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असली तरीही हेडलाईनमध्ये मात्र कायम आम्हीच आहोत, असे सांगत ज्यांनी पक्ष सोडला त्यांनी कधीही शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत नाराजी किंवा टीका केलेली नसल्याचे सुळे यांनी सांगतले. तर पक्ष सोडून जाणाऱ्यासोबत आमचे कायम कौटुंबीक संबंध असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.

देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली असल्याचा आरोप करत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे कुटुंबीय हे नेमके कुठे आहेत याची कोणतीही माहिती दिली जात नाही, अशा पद्धतीच्या घटना देशात पहिल्यांदाच घडत असल्यामुळे ही अघोषित आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सोलापूर - देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे सीबीआयला हाताशी धरून नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात गोवण्याच्या धमक्या देत पक्षांतर घडवून आणत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. भविष्यात महाराष्ट्रात कोणतेही सरकार सत्तेत आले तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच कॅबिनेट मंत्री असतील, असेही सुळे यांनी सांगितले. त्या सोलापुरात पत्रकारांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी खासदार

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते पक्ष सोडून चालले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे नेते तसेच विधानसभा पातळीवरील अनेक नेते पक्ष सोडत आहेत. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असली तरीही हेडलाईनमध्ये मात्र कायम आम्हीच आहोत, असे सांगत ज्यांनी पक्ष सोडला त्यांनी कधीही शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत नाराजी किंवा टीका केलेली नसल्याचे सुळे यांनी सांगतले. तर पक्ष सोडून जाणाऱ्यासोबत आमचे कायम कौटुंबीक संबंध असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.

देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली असल्याचा आरोप करत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे कुटुंबीय हे नेमके कुठे आहेत याची कोणतीही माहिती दिली जात नाही, अशा पद्धतीच्या घटना देशात पहिल्यांदाच घडत असल्यामुळे ही अघोषित आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Intro:mh_sol_02_sule_on_bjp_7201168

सरकार कुणाचेही आले तरी कॅबिनेट मंत्री हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या डीएनए चे असतील- सुप्रिया सुळे
सोलापूर-
राज्यात सरकार कोणाचे आली तरीही ही कॅबिनेट मंत्री हे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या डी एन ए मधील असतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच संपूर्ण देशात सरकार कडून अघोषित आणीबाणी लागू केली असल्याचा आरोप करत आमचे मोबाईल देखील सरकारच्या नियंत्रणाखाली असल्याचे सुळे यांनी सांगितले आहे.



Body:
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतराची जोरदार वारे वाहत आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते पक्ष सोडून चालले आहेत त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे नेते तसेच विधानसभा पातळीवरील अनेक नेते पक्ष सोडून जिल्हा आहेत आणि जाण्याच्या वाटेवर आहेत.
यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे साहित्य संस्था असलेल्या तसेच सीबीआय यांना हाताशी धरून नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात गोवत अशी धमकी देऊन त्यांचे पक्षांतर्गत घडवून आणले जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे भविष्यात महाराष्ट्रात कोणतेही सरकार सत्तेत आले तरीही ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या देण्याचे कॅबिनेट मंत्री पाहायला मिळतील असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असली तरीही पक्षातून जाणाऱ्यांची संख्या कितीही असली तरीही ही हेडलाईन मध्ये मात्र कायम आम्हीच आहोत असे सांगत ज्यांनी पक्ष सोडला त्यांनी कधीही शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत नाराजी किंवा टीका केलेली नसल्याचे सांगत पक्ष सोडून जाणाऱ्या सोबत आमचे कायम कौटुंबिक संबंध असल्याची सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली असल्याचा आरोप करत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला ओमर अब्दुल्ला आणि त्यांचे कुटुंबीय हे नेमके कुठे आहेत यांची कोणतीही माहिती ती दिली जात नाही अशा पद्धतीच्या घटना देशात पहिल्यांदाच घडत असल्यामुळे ही अघोषित आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे यांनी संवाद ताईशी अशी यात्रा सुरू केली आहे.



Conclusion:बाईट - सुप्रिया सुळे,

सुप्रिया सुळे यांचे दोन बाईट आणि व्हिडीओ सोबत जोडले आहेत.
Last Updated : Aug 25, 2019, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.