ETV Bharat / state

रयत क्रांती संघटनेचे शेतकऱ्यांसाठी जागरण गोंधळ आंदोलन

author img

By

Published : Oct 22, 2020, 4:09 PM IST

Updated : Oct 22, 2020, 5:49 PM IST

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोेठे नुकसान झाले. यामुळे विविध मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन केले.

आंदोलक
आंदोलक

सोलापूर - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्णपणे असमानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. या विरोधात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने गुरुवारी (दि. 22 ऑक्टोबर) दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करण्यात आले.

बोलताना दीपक भोसले

शेतकऱ्यांची सर्व शेती माल व पिके अतिवृष्टीत उद्ध्वस्त झाले आहे. गेल्या वर्षीचा परतीचा पाऊस त्यानंतर कोरोना महामारी आणि नुकतीच झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्व पिके व शेतीमालाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (गुरुवार) दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

  • या आहेत प्रमुख मागण्या
  1. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे.
  2. जिरायत भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार व बागायती शेतजमीनिला प्रति हेक्टर 1 लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.
  3. शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीजबिल माफ करावे.
  4. पुरात शेतजमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मिळावे.

हेही वाचा - देशाच्या विकासामध्ये पोलिसांचे योगदान मोठे - पी. शिवशंकर

हेही वाचा - सोलापूरात कचरा घोटाळा; मनपा अधिकाऱ्यांची तक्रार दाखल

सोलापूर - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्णपणे असमानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. या विरोधात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने गुरुवारी (दि. 22 ऑक्टोबर) दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करण्यात आले.

बोलताना दीपक भोसले

शेतकऱ्यांची सर्व शेती माल व पिके अतिवृष्टीत उद्ध्वस्त झाले आहे. गेल्या वर्षीचा परतीचा पाऊस त्यानंतर कोरोना महामारी आणि नुकतीच झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्व पिके व शेतीमालाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (गुरुवार) दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

  • या आहेत प्रमुख मागण्या
  1. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे.
  2. जिरायत भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार व बागायती शेतजमीनिला प्रति हेक्टर 1 लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.
  3. शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीजबिल माफ करावे.
  4. पुरात शेतजमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मिळावे.

हेही वाचा - देशाच्या विकासामध्ये पोलिसांचे योगदान मोठे - पी. शिवशंकर

हेही वाचा - सोलापूरात कचरा घोटाळा; मनपा अधिकाऱ्यांची तक्रार दाखल

Last Updated : Oct 22, 2020, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.