ETV Bharat / state

वारकऱ्यांसाठी चैतन्याचा झरा असलेले तुकोबांच्या पालखीतील उभे रिंगण उत्साहात

लिंग,वय,जात,धर्म,वरिष्ठ,कनिष्ठ असा कुठलाच भेद न करणारे रिंगण चालून थकलेल्या वारकऱ्यांना पुन्हा पुढच्या प्रवासासाठी बळ देते. म्हणून संतांच्या दिंड्यात होणारा रिंगण सोहळा वारकऱ्यांसाठी चैतन्याचा झरा आहे.

author img

By

Published : Jul 9, 2019, 12:00 AM IST

रिंगण सोहळा

सोलापूर- आषाढी एकादशीला सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात आज माळीनगर येथे उभे रिंगण पार पडले. वारीतील रिंगण भक्तीची ऊर्जा प्रदान करते,अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

रिंगण सोहळा

रिंगण सोहळा म्हटले की वारकरी आनंदी होतो. कारण तीनशेच्या घरात असलेल्या प्रत्येक दिंडीतला पताकाधारी, विणेकरी, पखवाज-टाळकरी आणि तुलसी वृंदावनधारी महिला आप-आपल्या दिंड्या सोडून भेदा-भेदाच्या पलीकडे रिंगणात येऊन धावा करतात. त्यात भक्तीच्या पलीकडे कुठलाच लवलेश नसतो.

चैतन्य आणि आनंददायी वातावरणात पालखीसोहळ्यात आज उभे रिंगण पार पडले. रविवारी अकलूज येथे गोल रिंगण पार पडले होते.

अडीचशे किलोमीटरचे अंतर ऊन, वारा,पाऊस झेलत आम्ही पार करतो. मात्र, या प्रवासात कुठेही थकवा जाणवत नाही याचे कारण रिंगण सोहळा आहे, असे वारकऱ्यांनी सांगितले.

सोलापूर- आषाढी एकादशीला सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात आज माळीनगर येथे उभे रिंगण पार पडले. वारीतील रिंगण भक्तीची ऊर्जा प्रदान करते,अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

रिंगण सोहळा

रिंगण सोहळा म्हटले की वारकरी आनंदी होतो. कारण तीनशेच्या घरात असलेल्या प्रत्येक दिंडीतला पताकाधारी, विणेकरी, पखवाज-टाळकरी आणि तुलसी वृंदावनधारी महिला आप-आपल्या दिंड्या सोडून भेदा-भेदाच्या पलीकडे रिंगणात येऊन धावा करतात. त्यात भक्तीच्या पलीकडे कुठलाच लवलेश नसतो.

चैतन्य आणि आनंददायी वातावरणात पालखीसोहळ्यात आज उभे रिंगण पार पडले. रविवारी अकलूज येथे गोल रिंगण पार पडले होते.

अडीचशे किलोमीटरचे अंतर ऊन, वारा,पाऊस झेलत आम्ही पार करतो. मात्र, या प्रवासात कुठेही थकवा जाणवत नाही याचे कारण रिंगण सोहळा आहे, असे वारकऱ्यांनी सांगितले.

Intro:सोलापूर : आषाढी एकादशीला सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना दिंडी सोहळ्यातील रिंगण भक्तीची ऊर्जा प्रदान करतं.जवळपास अडीचशे किलोमीटरचं आंतर ऊन, वारा,पाऊस झेलत पार करणारे वारकरी न थकता हा पूर्ण प्रवास करतात. पण ते कुठंचं थकलेले दिसत नाहीत.त्याच कारण दिंडीत होणारा रिंगण सोहळा आहे.


Body:रिंगण...म्हंटलं की वारकऱ्यांच्या आनंदाला भरतं येतं..कारण तीनशेच्या घरात असलेल्या प्रत्येक दिंडीतला पताकाधारी, विणेकरी, पखवाज-टाळकरी आणि तुलसी वृंदावनधारी महिला आप-आपल्या दिंड्या सोडून भेदा-भेदाच्या पलीकडे रिंगणात येऊन धावा करतात... त्यात भक्तीच्या पलीकडे कुठलाच लवलेश नसतो....असतो तो फक्त उत्साह,चैतन्य...धाव्याचं अन रिंगणाचं.


Conclusion:लिंग,वय,जात,धर्म,वरिष्ठ,कनिष्ठ असा कुठलाच भेद न करणारं रिंगण चालून थकलेल्या वारकऱ्यांना पुन्हा पुढच्या प्रवासासाठी बळ देतं म्हणून संतांच्या दिंड्यात होणारा रिंगण सोहळा हा वारकऱ्यांच्या चैतन्याचा झरा आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.