ETV Bharat / state

Nitin Gadkari In Solapur : देशात लवकरच इलेक्ट्रिक हायवे उभारण्याचा प्रयत्न करणार - नितीन गडकरी - नितीन गडकरी सोलापूर भाषण

सोलापूर-अक्कलकोट महामार्गाचा लोकार्पण सोहळा ( Inauguration Ceremony of Solapur Akkalkot Highway ) सोमवारी 25 एप्रिल रोजी सोलापूर शहरात आयोजित करण्यात आला होता. 164 कोटी रुपये खर्च करून सोलापूर अक्कलकोट असा 42 किमी महामार्ग तयार झाला आहे. याचं लोकार्पण आज केंद्रीय ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना देशात इलेक्ट्रिक हायवे ( Electric Highway ) उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari In Solapur
Nitin Gadkari In Solapur
author img

By

Published : Apr 25, 2022, 9:44 PM IST

Updated : Apr 25, 2022, 10:51 PM IST

सोलापूर - सोलापूर-अक्कलकोट महामार्गाचा लोकार्पण सोहळा ( Inauguration Ceremony of Solapur Akkalkot Highway ) सोमवारी 25 एप्रिल रोजी सोलापूर शहरात आयोजित करण्यात आला होता. 164 कोटी रुपये खर्च करून सोलापूर अक्कलकोट असा 42 किमी महामार्ग तयार झाला आहे. याचं लोकार्पण आज केंद्रीय ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या हस्ते पार पडले. व्यासपीठावर बोलताना वापरण्यावर अधिक भर दिला. ऊस कारखानदारांना उसापासून इथेनॉलचा अधिक उत्पादन करा असा सल्ला देखील गडकरी यांनी यावेळी दिला. भविष्यात सोलापूरसह इतर ठिकाणी इलेक्ट्रिक मार्ग उभे करू, ज्या प्रमाणे इलेक्ट्रिक रेल्वे, इलेक्ट्रिक रोपवे चालतात त्या धर्तीवर इलेक्ट्रिक वायरीच्या आधारे बसेस किंवा डबल डेकर बसेस चालतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सोलापूर शहरातील उड्डाणपूल होणार - पाच वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर शहरात दोन उड्डाणपूलाची घोषणा केली होती. मात्र पाच वर्षात ते काम पूर्ण झालेच नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने 100 कोटी रुपये माझ्या खात्यातून देतो. सोलापूर शहरात लवकरच दोन उड्डाणपूलाच्या कामास सुरुवात होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

साखर सरप्लस झाली तर शेतकरी वर्ग अडचणी येईल - एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आज 22 लाख टन उसाच गाळप एका साखर कारखान्यात झालं आहे. जगातील सर्वात जास्त साखर उत्पादन करणाऱ्या ब्राझीलमुळे भारत ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार अडचणीत येईल, अशी चिंता व्यक्त केली. त्यामुळे साखर कारखानदारांनी इथेनॉल सारख्या उत्पादनावर भर दिला पाहिजे.

शहरातील रस्ते इलेक्ट्रिक करण्याचा संकल्प - सोलापूर शहरातील सार्वजनिक बस व्यवस्था मोडकळीस आली आहे. वाढत्या इंधनदरवाढीचा फटका महानगरपालिका सार्वजनिक बस प्रशासनाला बसत आहे. ही बाब स्थानिक नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते इलेक्टरीक करू आणि ज्या प्रमाणे इलेक्टरीक रेल्वे धावते, रोपवे धावते, त्याप्रमाणे सोलापूर शहरात आणि इतर ठिकाणी रस्त्यावर अशा प्रकारे बसेस धावताना दिसतील. त्याचे तिकीटदरदेखील पेट्रोल डिझेलच्या बसेस पेक्षा 60 टक्क्यांनी कमी असेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray : दादागिरी केली तर ती मोडून काढू; भोंगा वादावरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

सोलापूर - सोलापूर-अक्कलकोट महामार्गाचा लोकार्पण सोहळा ( Inauguration Ceremony of Solapur Akkalkot Highway ) सोमवारी 25 एप्रिल रोजी सोलापूर शहरात आयोजित करण्यात आला होता. 164 कोटी रुपये खर्च करून सोलापूर अक्कलकोट असा 42 किमी महामार्ग तयार झाला आहे. याचं लोकार्पण आज केंद्रीय ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या हस्ते पार पडले. व्यासपीठावर बोलताना वापरण्यावर अधिक भर दिला. ऊस कारखानदारांना उसापासून इथेनॉलचा अधिक उत्पादन करा असा सल्ला देखील गडकरी यांनी यावेळी दिला. भविष्यात सोलापूरसह इतर ठिकाणी इलेक्ट्रिक मार्ग उभे करू, ज्या प्रमाणे इलेक्ट्रिक रेल्वे, इलेक्ट्रिक रोपवे चालतात त्या धर्तीवर इलेक्ट्रिक वायरीच्या आधारे बसेस किंवा डबल डेकर बसेस चालतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सोलापूर शहरातील उड्डाणपूल होणार - पाच वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर शहरात दोन उड्डाणपूलाची घोषणा केली होती. मात्र पाच वर्षात ते काम पूर्ण झालेच नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने 100 कोटी रुपये माझ्या खात्यातून देतो. सोलापूर शहरात लवकरच दोन उड्डाणपूलाच्या कामास सुरुवात होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

साखर सरप्लस झाली तर शेतकरी वर्ग अडचणी येईल - एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आज 22 लाख टन उसाच गाळप एका साखर कारखान्यात झालं आहे. जगातील सर्वात जास्त साखर उत्पादन करणाऱ्या ब्राझीलमुळे भारत ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार अडचणीत येईल, अशी चिंता व्यक्त केली. त्यामुळे साखर कारखानदारांनी इथेनॉल सारख्या उत्पादनावर भर दिला पाहिजे.

शहरातील रस्ते इलेक्ट्रिक करण्याचा संकल्प - सोलापूर शहरातील सार्वजनिक बस व्यवस्था मोडकळीस आली आहे. वाढत्या इंधनदरवाढीचा फटका महानगरपालिका सार्वजनिक बस प्रशासनाला बसत आहे. ही बाब स्थानिक नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते इलेक्टरीक करू आणि ज्या प्रमाणे इलेक्टरीक रेल्वे धावते, रोपवे धावते, त्याप्रमाणे सोलापूर शहरात आणि इतर ठिकाणी रस्त्यावर अशा प्रकारे बसेस धावताना दिसतील. त्याचे तिकीटदरदेखील पेट्रोल डिझेलच्या बसेस पेक्षा 60 टक्क्यांनी कमी असेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray : दादागिरी केली तर ती मोडून काढू; भोंगा वादावरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

Last Updated : Apr 25, 2022, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.