ETV Bharat / state

माजी मंत्री खोत यांच्या मुलाकडून चळवळीला काळीमा फासण्याचे काम; स्वाभिमानीचे नेते सचिन पाटील

author img

By

Published : Sep 8, 2021, 8:26 AM IST

Updated : Sep 11, 2021, 6:59 AM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी वाळवा तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांना घरात घुसून मारहाण, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आमदार सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांच्यासह चौघांवर कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या मारहाण प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

स्वाभिमानीचे नेते सचिन पाटील
स्वाभिमानीचे नेते सचिन पाटील

पंढरपूर(सोलापूर) - वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रवीकिरण माने यांच्या कुटुंबावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याने हल्ला केल्याचा प्रकार घडला. या हल्ल्याचा सोलापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. सागर खोत यांनी माने यांच्या कुटुंबावर हल्ला करून चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिला आहे.

खोत यांच्या मुलाकडून चळवळीला काळिमा

स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांकडून हल्ल्याचा जाहीर निषेध

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सोशल मीडियावरून टीका केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी वाळवा तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांना घरात घुसून मारहाण झाली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सागर खोतसह चौघांवर कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पंढरपूर तालुका स्वाभिमानी संघटनेकडून निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तत्काळ कारवाई करावी-

वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकिरण माने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला. यापूर्वीही चळवळीवर अनेक प्रकारच्या हल्ले झाले आहे. चळवळीतून उदयास आलेल्या नेतृत्वाच्या पोटातून जन्म घेतलेल्या सागर खोत यांनी चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. स्वाभिमानीचे नेते रविकिरण माने यांच्यासोबत संपूर्ण स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी आहे. या प्रकारात लवकरात लवकर कारवाई व्हावी अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा पाटील यांनी दिला.

पंढरपूर(सोलापूर) - वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रवीकिरण माने यांच्या कुटुंबावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याने हल्ला केल्याचा प्रकार घडला. या हल्ल्याचा सोलापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. सागर खोत यांनी माने यांच्या कुटुंबावर हल्ला करून चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिला आहे.

खोत यांच्या मुलाकडून चळवळीला काळिमा

स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांकडून हल्ल्याचा जाहीर निषेध

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सोशल मीडियावरून टीका केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी वाळवा तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांना घरात घुसून मारहाण झाली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सागर खोतसह चौघांवर कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पंढरपूर तालुका स्वाभिमानी संघटनेकडून निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तत्काळ कारवाई करावी-

वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकिरण माने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला. यापूर्वीही चळवळीवर अनेक प्रकारच्या हल्ले झाले आहे. चळवळीतून उदयास आलेल्या नेतृत्वाच्या पोटातून जन्म घेतलेल्या सागर खोत यांनी चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. स्वाभिमानीचे नेते रविकिरण माने यांच्यासोबत संपूर्ण स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी आहे. या प्रकारात लवकरात लवकर कारवाई व्हावी अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा पाटील यांनी दिला.

Last Updated : Sep 11, 2021, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.