ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळात निसर्ग चक्रीवादळापेक्षा जास्त नुकसानभरपाई दिली जाईल

author img

By

Published : May 23, 2021, 3:01 PM IST

Updated : May 23, 2021, 4:39 PM IST

यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी आहे. पक्षीय मतभेद विसरून सर्वजण काम करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी या भागाचा दौरा करत पाहणी केली आहे. पंचनामे झाल्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही.

minister balasaheb patil visit sidhudurg district over tauktae cyclone crisis
मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळात कोकणातील नुकसानीच्या भरपाईपोटी निसर्ग चक्रीवादळापेक्षा जास्त नुकसानभरपाई दिली जाईल, असे राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बाळासाहेब पाटील यांनी वैभववाडी, मालवण, वेंगुर्ला या भागातील नुकसानीची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला.

मंत्री बाळासाहेब पाटील याबाबत बोलताना

पंचनामे झाल्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही -

यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी आहे. पक्षीय मतभेद विसरून सर्वजण काम करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी या भागाचा दौरा करत पाहणी केली आहे. पंचनामे झाल्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही. नारळाचे, आंब्याचे, घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे चांगल्या पद्धतीने केले जातील. त्यानुसार शासन मदत जाहीर करेल. कोकणवासीयांनी विश्वास ठेवावा की महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निश्चितच दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - रायगडच्या समुद्रकिनारी सापडले आठ मृतदेह; पी 305 बार्जमधील कर्मचाऱ्यांचे मृतदेह असल्याची शक्यता

नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता -

तौक्ते वादळाचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. वादळामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तसेच ज्या ठिकाणी कृषीचे पंचनामे झाले नाहीत त्याठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश प्रांत कार्यालयाला देणार असल्याची माहितीही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, या वादळाने घरांचे, झाडांचे तसेच मच्छिमार बांधवांच्या बोटीचे आणि जाळ्यांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनाम्यात सध्याच्या नुकसानीची आकडेवारी वाढू शकते, हे लक्षात घेता पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाई जाहीर करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - तौक्ते वादळातील नुकसानीच्या भरपाईत सरकार भेदभाव करणार नाही - नाना पटोले

सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळात कोकणातील नुकसानीच्या भरपाईपोटी निसर्ग चक्रीवादळापेक्षा जास्त नुकसानभरपाई दिली जाईल, असे राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बाळासाहेब पाटील यांनी वैभववाडी, मालवण, वेंगुर्ला या भागातील नुकसानीची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला.

मंत्री बाळासाहेब पाटील याबाबत बोलताना

पंचनामे झाल्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही -

यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी आहे. पक्षीय मतभेद विसरून सर्वजण काम करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी या भागाचा दौरा करत पाहणी केली आहे. पंचनामे झाल्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही. नारळाचे, आंब्याचे, घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे चांगल्या पद्धतीने केले जातील. त्यानुसार शासन मदत जाहीर करेल. कोकणवासीयांनी विश्वास ठेवावा की महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निश्चितच दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - रायगडच्या समुद्रकिनारी सापडले आठ मृतदेह; पी 305 बार्जमधील कर्मचाऱ्यांचे मृतदेह असल्याची शक्यता

नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता -

तौक्ते वादळाचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. वादळामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तसेच ज्या ठिकाणी कृषीचे पंचनामे झाले नाहीत त्याठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश प्रांत कार्यालयाला देणार असल्याची माहितीही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, या वादळाने घरांचे, झाडांचे तसेच मच्छिमार बांधवांच्या बोटीचे आणि जाळ्यांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनाम्यात सध्याच्या नुकसानीची आकडेवारी वाढू शकते, हे लक्षात घेता पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाई जाहीर करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - तौक्ते वादळातील नुकसानीच्या भरपाईत सरकार भेदभाव करणार नाही - नाना पटोले

Last Updated : May 23, 2021, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.