ETV Bharat / state

जमिनीच्या वादातून खून; उपसरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल! - दाभोली

जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीतून एकाचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना वेंगुर्ला दाभोली मोबारकरवाडी येथे गुरुवारी घडली.

भानुदास मोर्जे
author img

By

Published : Mar 1, 2019, 2:53 PM IST

सिंधुदुर्ग - जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीतून एकाचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना वेंगुर्ला दाभोली मोबारकरवाडी येथे गुरुवारी घडली. भानुदास मोर्जे असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उपसरपंचासह चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वेंगुर्ले पोलिसांना मृत भानुदास यांचा मुलगा सुदाम याने तक्रार दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, शैलेश पाटील, राजाराम कांबळी, भाई दाभोलकर हे सकाळी आमच्या जमिनीशेजारी आले. यावेळी त्यांनी आमच्या कुंपणाच्या लगत सिमेंटचे पोल पुरुन कुंपण घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी आम्ही विचारणा केली असता, त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने उपसरपंच संदीप पाटील याने तेथे येऊन आम्हाला शिवीगाळ केली व कुंपण घालणारच, असे सांगितले.


यावेळी मी, वडील बाळकृष्ण, आई लक्ष्मी, भाऊ गौरव, माझी पत्नी अर्पिता असे आम्ही उपस्थित होतो. हा विषय उद्या सरपंचांसमवेत बसून मिटवूया, असे त्यांनी आम्हाला सांगितले. मात्र, याचा राग आल्याने संदीपने वडिलांना मारण्यास सुरुवात केली. त्यांना सोडविण्यासाठी आम्ही गेलो असता, त्या तिन्ही जणांनी आम्हा सर्वांना मारण्यास सुरुवात केली. तेवढ्यात संदीपने वडिलांना जोरात मारुन सिमेंटच्या पोलावर आपटले. त्यात ते जागीच मृत झाले. हे पाहून त्या चारही जणांनी तेथून पलायन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

undefined


दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेहाचे वेंगुर्ले रुग्णालयात शवविच्छेदन केले आहे. मात्र, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत खोत यांनी पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. परिसरात तणाव वाढू नये, यासाठी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली.

सिंधुदुर्ग - जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीतून एकाचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना वेंगुर्ला दाभोली मोबारकरवाडी येथे गुरुवारी घडली. भानुदास मोर्जे असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उपसरपंचासह चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वेंगुर्ले पोलिसांना मृत भानुदास यांचा मुलगा सुदाम याने तक्रार दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, शैलेश पाटील, राजाराम कांबळी, भाई दाभोलकर हे सकाळी आमच्या जमिनीशेजारी आले. यावेळी त्यांनी आमच्या कुंपणाच्या लगत सिमेंटचे पोल पुरुन कुंपण घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी आम्ही विचारणा केली असता, त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने उपसरपंच संदीप पाटील याने तेथे येऊन आम्हाला शिवीगाळ केली व कुंपण घालणारच, असे सांगितले.


यावेळी मी, वडील बाळकृष्ण, आई लक्ष्मी, भाऊ गौरव, माझी पत्नी अर्पिता असे आम्ही उपस्थित होतो. हा विषय उद्या सरपंचांसमवेत बसून मिटवूया, असे त्यांनी आम्हाला सांगितले. मात्र, याचा राग आल्याने संदीपने वडिलांना मारण्यास सुरुवात केली. त्यांना सोडविण्यासाठी आम्ही गेलो असता, त्या तिन्ही जणांनी आम्हा सर्वांना मारण्यास सुरुवात केली. तेवढ्यात संदीपने वडिलांना जोरात मारुन सिमेंटच्या पोलावर आपटले. त्यात ते जागीच मृत झाले. हे पाहून त्या चारही जणांनी तेथून पलायन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

undefined


दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेहाचे वेंगुर्ले रुग्णालयात शवविच्छेदन केले आहे. मात्र, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत खोत यांनी पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. परिसरात तणाव वाढू नये, यासाठी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली.

Intro:गुरुवारी खुनाच्या घटनेने वेंगुर्ला तालुका हादरून गेला आहे. दाभोली मोबारकरवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली. जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत भानुदास मोर्जे (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाभोलीचा उपसरपंच संदीप पाटील याच्यासह चार जणांवर भा.द.वी. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. Body:वेंगुर्ले पोलिसांना मयत भानुदास यांचा मुलगा सुदाम याने तक्रारी दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, शैलेश पाटील, राजाराम कांबळी, भाई दाभोलकर यांनी सकाळी आमच्या जमिनी शेजारी येऊन आमच्या कुंपणाच्या लगत सिमेंटचे पोल पुरून कुंपण घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी आम्ही विचारणा केली असता त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. त्या नंतर काही वेळाने उपसरपंच संदीप पाटील याने तेथे येऊन आम्हाला शिवीगाळ केली व कुंपण घालणारच असे सांगितले. Conclusion:यावेळी मी, वडील बाळकृष्ण, आई लक्ष्मी, भाऊ गौरव, माझी पत्नी अर्पिता असे आम्ही उपस्थित होतो. हा विषय उद्या सरपंचांसमवेत बसून मिटवूया असे त्यांना सांगितले. मात्र याचा राग आल्याने संदीप याने वडिलांना मारण्यास सुरुवात केली. त्यांना सोडविण्यासाठी आम्ही गेलो असता त्या तिन्ही जणांनी आम्हा सर्वांना मारण्यास सुरुवात केली. तेवढ्यात संदीप याने वडिलांना जोरात मारून सिमेंटच्या पोलावर आपटले. त्यात ते जागीच मयत झाले. हे पाहून त्या चारही जणांनी तेथून पलायन केले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृताचे वेंगुर्ले रुग्णालयात शवविच्छेदन केले आहे. मात्र जोपर्यंत त्या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. दरम्यान वेंगुर्ला पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी पुढील तपास सुरू केला असल्याचे सांगितले. तसेच परिसरात तणाव वाढू नये यासाठी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केले आहे. दरम्यान या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात मोठी गर्दी केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.