ETV Bharat / state

मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, खासदार नारायण राणे यांचा खुलासा - Narayan Rane at Sindhudurg

नारायण राणे मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते, या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांचे नारायण राणे यांनी खंडन केले आहे. तसेच मेडिकल कॉलेजला केंद्रसरकार परवानगी देतं, राज्य सरकार नाही, हे आपलं अज्ञान विनायक राऊत यांनी दूर करावं असंही ते यावेळी म्हणाले.

Narayan Rane
नारायण राणे
author img

By

Published : Jan 11, 2021, 7:20 PM IST

सिंधुदुर्ग: दोन महिन्यापूर्वी नारायण राणे मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते, हा शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा आरोप नारायण राणे यांनी फेटाळून लावला आहे. मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच मेडिकल कॉलेजला केंद्रसरकार परवानगी देतं, राज्य सरकार नाही, हे आपलं अज्ञान विनायक राऊत यांनी दूर करावं असंही ते यावेळी म्हणाले.

विनायक राऊत यांचे वक्तव्य अज्ञान दाखवणारे

नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी माझ्या हिंमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

खासदार नारायण राणे यांचा खुलासा

खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट नेमका काय होता?

मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी खासदार नारायण राणे हे दोन महिन्यापूर्वी मातोश्रीवर फोन करत होते. असा गौप्यस्फोट शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात बोलताना केला होता. तर आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीची १२ कोटींची फसवणूक केली आहे. नारायण राणे हे दोन महिन्यापूर्वी मातोश्रीवर फोन करत होते. असाही आरोप त्यांनी यावेळी केला होता.

मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी नारायण राणे यांचा मातोश्रीवर फोन

नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा सल्लाही विनायक राऊत यांनी राणेंना दिला होता.

देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस हे नितेश राणे यांना तुरुंगात टाकणार होते. त्यांनी एका व्यक्तीला १२ कोटीचा गंडा घातला होता. पण नारायण राणे भाजपला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती एक ओपन झाली तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा विनायक राऊत यांनी केला होता.

सिंधुदुर्ग: दोन महिन्यापूर्वी नारायण राणे मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते, हा शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा आरोप नारायण राणे यांनी फेटाळून लावला आहे. मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच मेडिकल कॉलेजला केंद्रसरकार परवानगी देतं, राज्य सरकार नाही, हे आपलं अज्ञान विनायक राऊत यांनी दूर करावं असंही ते यावेळी म्हणाले.

विनायक राऊत यांचे वक्तव्य अज्ञान दाखवणारे

नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी माझ्या हिंमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

खासदार नारायण राणे यांचा खुलासा

खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट नेमका काय होता?

मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी खासदार नारायण राणे हे दोन महिन्यापूर्वी मातोश्रीवर फोन करत होते. असा गौप्यस्फोट शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात बोलताना केला होता. तर आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीची १२ कोटींची फसवणूक केली आहे. नारायण राणे हे दोन महिन्यापूर्वी मातोश्रीवर फोन करत होते. असाही आरोप त्यांनी यावेळी केला होता.

मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी नारायण राणे यांचा मातोश्रीवर फोन

नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा सल्लाही विनायक राऊत यांनी राणेंना दिला होता.

देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस हे नितेश राणे यांना तुरुंगात टाकणार होते. त्यांनी एका व्यक्तीला १२ कोटीचा गंडा घातला होता. पण नारायण राणे भाजपला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती एक ओपन झाली तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा विनायक राऊत यांनी केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.