ETV Bharat / state

Nitesh Rane Bail Rejected : नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.. शिवसैनिकांचा जल्लोष

author img

By

Published : Dec 30, 2021, 6:46 PM IST

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात ( Santosh Parab Attack Case ) आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला ( Nitesh Rane Bail Rejected ) आहे. त्यामुळे नितेश राणे यांना कधीही अटक होऊ शकते. जामीन अर्ज फेटाळून लावताच सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला.

नितेश राणे
नितेश राणे

सिंधुदुर्ग - शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील कणकवलीत झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी ( Santosh Parab Attack Case ) संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला ( Nitesh Rane Bail Rejected ) आहे. नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालयाने आज निकाल दिला. जामीन अर्ज फेटाळून लावताच सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. जामीन मिळतो की नाही, हे आज ठरणार होते. अखेर हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे आता काय करणार?

संतोष परब वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात ऍड. राजेंद्र रावराणे आणि ऍड. संग्राम देसाई यांच्या माध्यमातून धाव घेतली होती. या अटकपूर्व जामिनावर पहिली सुनावणी 27 डिसेंबर रोजी झाली होती. यानंतर उर्वरित सुनावणी 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर रोजी झाली होती. आता यावरचा निर्णय 30 डिसेंबरला दिला जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. भादंवि 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की त्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार हे चित्र आज स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आमदार की राणे त्यांना पोलीस अटक करतात की ते हायकोर्टात धाव घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारी वकील घरत यांनी केला युक्तिवाद

आमदार नितेश राणे, गोट्या सावंत यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर काल 28 डिसेंबर रोजी सायंकाळी उशीरापर्यंत आ. नितेश राणे, गोट्या सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर 29 डिसेंबरच्या दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील घरत यांनी केलेल्या युक्तिवादात आ. नितेश राणे, गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी हा निकाल दिला.

शिवसैनिकांचा जल्लोष

दरम्यान, आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. अनेक ठिकाणी फटाके फोडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

उच्च न्यायालयात घेणार धाव

आमदार नितेश राणे उद्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्‍यता आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर राणे या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात पोलीस यंत्रणा झाली सतर्क

आमदार नितेश राणे हे अद्यापही जिल्ह्यात दाखल झाले नाहीत. त्यांचा शोध घेण्याकरिता जिल्हा पोलिसांचे ( Sindhudurg District Police ) पथक कालच गोवा आणि मुंबईत दाखल झाले आहे. आमदार नितेश राणे हे सोमवारी रात्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) यांना गोवा विमानतळावर ( Goa Airport ) भेटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यास जिल्ह्यातील वातावरण तापू शकते, हे लक्षात घेता जिल्ह्यात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कणकवली मध्ये पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

सिंधुदुर्ग - शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील कणकवलीत झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी ( Santosh Parab Attack Case ) संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला ( Nitesh Rane Bail Rejected ) आहे. नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालयाने आज निकाल दिला. जामीन अर्ज फेटाळून लावताच सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. जामीन मिळतो की नाही, हे आज ठरणार होते. अखेर हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे आता काय करणार?

संतोष परब वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात ऍड. राजेंद्र रावराणे आणि ऍड. संग्राम देसाई यांच्या माध्यमातून धाव घेतली होती. या अटकपूर्व जामिनावर पहिली सुनावणी 27 डिसेंबर रोजी झाली होती. यानंतर उर्वरित सुनावणी 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर रोजी झाली होती. आता यावरचा निर्णय 30 डिसेंबरला दिला जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. भादंवि 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की त्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार हे चित्र आज स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आमदार की राणे त्यांना पोलीस अटक करतात की ते हायकोर्टात धाव घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारी वकील घरत यांनी केला युक्तिवाद

आमदार नितेश राणे, गोट्या सावंत यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर काल 28 डिसेंबर रोजी सायंकाळी उशीरापर्यंत आ. नितेश राणे, गोट्या सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर 29 डिसेंबरच्या दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील घरत यांनी केलेल्या युक्तिवादात आ. नितेश राणे, गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी हा निकाल दिला.

शिवसैनिकांचा जल्लोष

दरम्यान, आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. अनेक ठिकाणी फटाके फोडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

उच्च न्यायालयात घेणार धाव

आमदार नितेश राणे उद्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्‍यता आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर राणे या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात पोलीस यंत्रणा झाली सतर्क

आमदार नितेश राणे हे अद्यापही जिल्ह्यात दाखल झाले नाहीत. त्यांचा शोध घेण्याकरिता जिल्हा पोलिसांचे ( Sindhudurg District Police ) पथक कालच गोवा आणि मुंबईत दाखल झाले आहे. आमदार नितेश राणे हे सोमवारी रात्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) यांना गोवा विमानतळावर ( Goa Airport ) भेटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यास जिल्ह्यातील वातावरण तापू शकते, हे लक्षात घेता जिल्ह्यात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कणकवली मध्ये पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.