ETV Bharat / state

सिंधुदुर्गनगरी येथून सुटली पहिली विशेष श्रमिक रेल्वे, कर्नाटकातील 1 हजार 440 मजूर स्वगृही रवाना

author img

By

Published : May 15, 2020, 12:22 PM IST

जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे गुरुवारी पहिली विशेष श्रमिक रेल्वे कर्नाटकातील विजापूरकडे निघाली. जिल्ह्यातून एकूण 1 हजार 440 मजूर व कामगारांना या रेल्वेने त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.

कर्नाटकातील 1440 मजुरांना घेऊन सिंधुदुर्गनगरी येथून धावली पहिली श्रमिक विशेष रेल्वे
कर्नाटकातील 1440 मजुरांना घेऊन सिंधुदुर्गनगरी येथून धावली पहिली श्रमिक विशेष रेल्वे

सिंधुदुर्ग - लॉकाडाऊनमुळे गेले दोन महिले शांत असलेल्या सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर गुरुवारी घरी पतरणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांची रेलचेल दिसून आली. लॉकडाऊन काळात गुरुवारी पहिल्यांदाच सिंधुदुर्गहुन पहिली श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेतून १ हजार ४४० मजुर कर्नाटकातील विजापूरकडे रवाना झाले. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.

सिंधुदुर्गनगरी येथून पहिली विशेष श्रमिक रेल्वे कर्नाटकातील 1440 मजुरांना घेऊन रवाना

जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे गुरुवारी पहिली विशेष श्रमिक रेल्वे कर्नाटकातील विजापूरकडे निघाली. जिल्ह्यातून एकूण 1 हजार 440 मजूर व कामगारांना या रेल्वेने त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता. सिंधुदुर्गनगरी येथून सुटलेली ही रेल्वे मडगाव व हुबळी स्थानकात थांबा घेऊन विजापूर येथे पोहचणार आहे. यावेळी प्रवाशांना ल्युपीन फाउन्डेशनच्या माध्यमातून पाण्याची बाटली, मास्क, साबन व फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.

गेले दोन महिने कोरोनाच्या सावटाखाली वावरल्यावर आज स्वतःच्या गावी जाण्यासाठी रेल्वेसमोर दिसली आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला. आता आम्हाला घरी जायला मिळणार यासाठी जिल्हा प्रशासनाचे मनापासून आभार अशी भावना विजापूर जिल्ह्यातील हरीष चव्हाण यांनी व्यक्त केली. बदामी जिल्ह्यातील शेखर कमतर यांनी, पोटापाण्यासाठी आमचा गाव सोडून आम्ही आमच्या 5 कुटुंबासह जिल्ह्यात आलो. गेली तीन वर्ष चांगली गेली. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळे आम्ही धास्तावलो होतो. गावाकडे जाता येईल का नाही, ही भीती मनात होती. महाराष्ट्र सरकारने आम्हाला रोजगार दिला आणि आता आम्हाला गावी जाण्यासाठी मोफत रेल्वेची सोय केली. महाराष्ट्राच्या मातीला आम्ही कदापी विसरणार नाही. महाराष्ट्राला माझा नमस्कार व जिल्हा प्रशासनाचे अनंत अभार, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील 1 हजार 440 कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एसटी बसमधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. कुडाळ तालुक्यातील 359 व्यक्ती 18 बसगाड्यांमधून, देवगड तालुक्यातील 371 व्यक्ती 18 गाड्यांमधून, मालवण तालुक्यातील 307 व्यक्ती 15 गाड्यांमधून, कणकवली तालुक्यातील 235 व्यक्ती 13 गाड्यामंधून, सावंतवाडी तालुक्यातील 25 व्यक्ती 1 गाडीमधून तर वेंगुर्ला तालुक्यातील 71 व्यक्तींना 4 गाड्या, अशा एकूण 69 एसटी बसमधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आणण्यात आले. या वाहतूकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले. तसेच या सर्वांना त्यांची तिकीटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक टी. मंजुनाथ, रेल्वे पोलीस दलाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सतीशन व्ही.व्ही., स्टेशन मास्तर वैभव दामले यांच्यासह सर्व तालुक्यांचे तहसिलदार आदी उपस्थित होते. रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सिंधुदुर्ग - लॉकाडाऊनमुळे गेले दोन महिले शांत असलेल्या सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर गुरुवारी घरी पतरणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांची रेलचेल दिसून आली. लॉकडाऊन काळात गुरुवारी पहिल्यांदाच सिंधुदुर्गहुन पहिली श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेतून १ हजार ४४० मजुर कर्नाटकातील विजापूरकडे रवाना झाले. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.

सिंधुदुर्गनगरी येथून पहिली विशेष श्रमिक रेल्वे कर्नाटकातील 1440 मजुरांना घेऊन रवाना

जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे गुरुवारी पहिली विशेष श्रमिक रेल्वे कर्नाटकातील विजापूरकडे निघाली. जिल्ह्यातून एकूण 1 हजार 440 मजूर व कामगारांना या रेल्वेने त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता. सिंधुदुर्गनगरी येथून सुटलेली ही रेल्वे मडगाव व हुबळी स्थानकात थांबा घेऊन विजापूर येथे पोहचणार आहे. यावेळी प्रवाशांना ल्युपीन फाउन्डेशनच्या माध्यमातून पाण्याची बाटली, मास्क, साबन व फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.

गेले दोन महिने कोरोनाच्या सावटाखाली वावरल्यावर आज स्वतःच्या गावी जाण्यासाठी रेल्वेसमोर दिसली आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला. आता आम्हाला घरी जायला मिळणार यासाठी जिल्हा प्रशासनाचे मनापासून आभार अशी भावना विजापूर जिल्ह्यातील हरीष चव्हाण यांनी व्यक्त केली. बदामी जिल्ह्यातील शेखर कमतर यांनी, पोटापाण्यासाठी आमचा गाव सोडून आम्ही आमच्या 5 कुटुंबासह जिल्ह्यात आलो. गेली तीन वर्ष चांगली गेली. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळे आम्ही धास्तावलो होतो. गावाकडे जाता येईल का नाही, ही भीती मनात होती. महाराष्ट्र सरकारने आम्हाला रोजगार दिला आणि आता आम्हाला गावी जाण्यासाठी मोफत रेल्वेची सोय केली. महाराष्ट्राच्या मातीला आम्ही कदापी विसरणार नाही. महाराष्ट्राला माझा नमस्कार व जिल्हा प्रशासनाचे अनंत अभार, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील 1 हजार 440 कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एसटी बसमधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. कुडाळ तालुक्यातील 359 व्यक्ती 18 बसगाड्यांमधून, देवगड तालुक्यातील 371 व्यक्ती 18 गाड्यांमधून, मालवण तालुक्यातील 307 व्यक्ती 15 गाड्यांमधून, कणकवली तालुक्यातील 235 व्यक्ती 13 गाड्यामंधून, सावंतवाडी तालुक्यातील 25 व्यक्ती 1 गाडीमधून तर वेंगुर्ला तालुक्यातील 71 व्यक्तींना 4 गाड्या, अशा एकूण 69 एसटी बसमधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आणण्यात आले. या वाहतूकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले. तसेच या सर्वांना त्यांची तिकीटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक टी. मंजुनाथ, रेल्वे पोलीस दलाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सतीशन व्ही.व्ही., स्टेशन मास्तर वैभव दामले यांच्यासह सर्व तालुक्यांचे तहसिलदार आदी उपस्थित होते. रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.