ETV Bharat / state

भाज्यांचे दर भडकले, गृहिणींपुढे पेच; तरीही शेतकऱ्यांना फायदा नाहीच

author img

By

Published : Nov 30, 2019, 7:30 PM IST

पावसामुळे कांदा शेतातच नासून गेल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लसणाच्या भावाने प्रतीकिलो दोनशे रुपयांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. हिरव्या वाटाण्याचा भावही दीडशे रुपयांच्या घरात गेला आहे. भाज्यांचे भाव कडाडल्याने घरात कोणती भाजी बनवायची हा पेच गृहीणींसमोर निर्माण झाला आहे.

भाज्यांचे दर भडकले
भाज्यांचे दर भडकले

सातारा - जिल्ह्यात अवकाळी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेक पिके पाण्याखाली गेली, तर पालेभाज्या सडून गेल्या. शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांना सुध्दा याचा फटका बसला आहे. बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

पावसामुळे कांदा शेतातच नासून गेल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लसणाच्या भावाने प्रतीकिलो दोनशे रुपयांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. हिरव्या वाटाण्याचा भावही दीडशे रुपयांच्या घरात गेला आहे. भाज्यांचे भाव कडाडल्याने घरात कोणती भाजी बनवायची हा पेच गृहीणींसमोर निर्माण झाला आहे. सध्या गृहिणींनी स्वयंपाकात अंडी व डाळीचा वापर वाढवला आहे.

भाज्यांचे दर भडकले

हेही वाचा - 'येथे' मटण ४२५ रुपये किलो; मटण दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन
पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वांग्याच्या झाडावर खोड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर कीडनाशक औषधाच्या कितीही फवारण्या केल्या तरीही कीड आटोक्यात येत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वांग्याचे उत्पादन घटले आहे. कोथिंबीर, पालक, चाकवत या पालेभाज्या पावसाने शेतातच सडल्या आहेत. ग्रामीण भागातून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी भाज्यांचे भाव भडकले आहेत. भाज्यांना चांगले दर असताना शेतात भाज्या नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. भाजी विक्रीतून दररोज येणारा पैसा थांबल्यामुळे घर चालवताना त्यांना कसरत करावी लागत आहे.

जिल्हा बाजारपेठेतील भाज्यांचे प्रती किलो भाव -
लसूण- 200 रु, वांगी- 120 रु, वाटाणा- 150 रु,
पावटा, कारली, भेंडी, घेवडा, कांदा, गाजर, ढोबळी मिरची, फ्लावर, कोबी- 80 रु,
बिट, हिरवी मिरची, टोमॅटो- 60 रु, आलं, गवार- 100 रु, भोपळा- 40रु
वाघा घेवडा- 80 रु, चाकवत- 40, शेपू ,पालक- 20 रु, कोथिंबीर- 15रु जुडी,
काकडी, बटाटा- 20 रु. किलो

सातारा - जिल्ह्यात अवकाळी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेक पिके पाण्याखाली गेली, तर पालेभाज्या सडून गेल्या. शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांना सुध्दा याचा फटका बसला आहे. बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

पावसामुळे कांदा शेतातच नासून गेल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लसणाच्या भावाने प्रतीकिलो दोनशे रुपयांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. हिरव्या वाटाण्याचा भावही दीडशे रुपयांच्या घरात गेला आहे. भाज्यांचे भाव कडाडल्याने घरात कोणती भाजी बनवायची हा पेच गृहीणींसमोर निर्माण झाला आहे. सध्या गृहिणींनी स्वयंपाकात अंडी व डाळीचा वापर वाढवला आहे.

भाज्यांचे दर भडकले

हेही वाचा - 'येथे' मटण ४२५ रुपये किलो; मटण दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन
पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वांग्याच्या झाडावर खोड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर कीडनाशक औषधाच्या कितीही फवारण्या केल्या तरीही कीड आटोक्यात येत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वांग्याचे उत्पादन घटले आहे. कोथिंबीर, पालक, चाकवत या पालेभाज्या पावसाने शेतातच सडल्या आहेत. ग्रामीण भागातून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी भाज्यांचे भाव भडकले आहेत. भाज्यांना चांगले दर असताना शेतात भाज्या नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. भाजी विक्रीतून दररोज येणारा पैसा थांबल्यामुळे घर चालवताना त्यांना कसरत करावी लागत आहे.

जिल्हा बाजारपेठेतील भाज्यांचे प्रती किलो भाव -
लसूण- 200 रु, वांगी- 120 रु, वाटाणा- 150 रु,
पावटा, कारली, भेंडी, घेवडा, कांदा, गाजर, ढोबळी मिरची, फ्लावर, कोबी- 80 रु,
बिट, हिरवी मिरची, टोमॅटो- 60 रु, आलं, गवार- 100 रु, भोपळा- 40रु
वाघा घेवडा- 80 रु, चाकवत- 40, शेपू ,पालक- 20 रु, कोथिंबीर- 15रु जुडी,
काकडी, बटाटा- 20 रु. किलो

Intro:सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली अनेक पिके पाण्याने भस्मसात झाली तर पालेभाज्या सडून गेल्या आहेत. त्याचा फटका शेतकर्यांबरोबर ग्राहकांना सुध्दा बसला आहे. बाजारात भाज्यांची आवक घटल्याने आठवडा बाजारात भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. शेतातच कांदा नासून गेला असल्याने कांदा खरेदी करताना गृहिणींच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. आठवडा बाजार व मंडईत भाज्याचे भाव भडकले आहेत. आज लसणाच्या कांद्याने दोनशे रुपये किलोच्या आसपास भाव गाठला आहे. हिरव्या वाटण्याचा भाव सर्वाधिक दीडशे रुपयांच्या घरात गेला असून गृहींनीना घरात कोणती भाजी बनवायची हा पेच निर्माण झाला आहे.

Body:स्वादिष्ट जेवण बनवायचे म्हटले की फोडणीसाठी लसणाची आवश्यकता असते मात्र भाजीत लसूण टाकायचा का नाही हा पेच निर्माण झाला आहे,लसणाच्या चार कुडयासुध्दा पाच रुपयांच्या घरात गेल्या आहेत. कोथिंबीरच्या चार काड्यांना दहा रुपये मोजावे लागत असले तरी बाजारात कोथिंबीर मिळणे दुर्मिळ झाले आहे.गृहिणींनी भाजी बनवितांना कोथिंबीर टाकण्याचे टाळण्यास सुरुवात केली आहे. सध्या कडीपत्त्यावर फोडणीसाठी समाधान मानावे लागत आहे.कांद्याच्या चिंगळ्याना सुध्दा सत्तरीचा भाव आला आहे. स्वयंपाक करताना गृहिणींना नाकीनऊ आले आहे स्वयंपाक घरात भाजी बनविताना त्यांच्या अंगावर काटा येत आहे.

जिल्ह्यातील बाजारपेठेतील भाज्यांचे प्रती किलोचे भाव
लसूण200, वांगी 120, वाटाणा 150,पावटा, कारली, भेंडी, घेवडा, कांदा, गाजर,ढोबळी मिरची,फ्लावर कोबी80, बिट, हिरवीमिरची , टोमॅटो60, आलं, गवारी 100, भोपळा40, वाघा घेवडा80 रुपये वचाकवत 40,शापू ,पालक 20,कोथिंबीर 15रुपये पेंडी तर करडईची भाजी मिळत नाही. काकडी,बटाटा 20 रुपये किलो व लिंबू दीड रुपयाला असल्याने ते सर्वात स्वस्त आहेत. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे वांग्याच्या झाडावर खोड आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याने यावर कीडनाशक औषधाच्या कितीही फवारण्या केल्या तरी कीड आटोक्यात येत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वांग्याचे क्षेत्र किडीने घटले आहे, कोथिंबीर पालक चाकवत या पालेभाज्या पावसाने नासुन गेल्या आहेत. ग्रामीण भागातूनभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे,परिणामी भाज्यांचे भाव भडकले आहेत. भाजीपाला विक्रीवर घरसंसार चालविणारा शेतकरी भाज्यांना दर असताना शेतात भाज्या नसल्याने अडचणीत आला आहे, भाजी विक्रीतून दररोज येणारा पैसाथांबल्यामुळे घरगाडा चालविताना त्यांना कसरत करावी लागत आहे. सध्या गृहिणींनी अंडी व डाळीचा वापर स्वयंपाकात वाढविला आहे, भाजी-पाल्यांपेक्षा पर्याय निर्माण केला आहे. देशी भेंडी गवार,फरसं बी तर बाजारात मिळतच नाही. कोथिंबीर चाकवत बाजारात दिसेनाशी झाली आहे.
 
बाईट
अनिल सावंत -भाजी विक्रेता
स्वाती जाधव -भाजी विक्रेत्या
नंदूराम पाल- हॉटेल व्यावसायिक
आप्पा देशमुख- नागरिक

 
  Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.