ETV Bharat / state

लेक लाडकी अभियानाला दोन बालविवाह रोखण्यात यश; 'त्या' मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा - दोन अल्पवयीन मुंलीचा विवाह

गेली काही वर्षे साताऱ्यातील लेक लाडकी अभियानाच्या संचालिका अॅड. वर्षा देशपांडे बालविवाहाविरोधात शिरुरकासार तालुक्यात काम करतात. यांनी लेक लाडकी अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील दोन मुंलीचे बाल विवाह रोखले आहेत. दोघींच्या पालकांचे समुदेशन करण्यात आले आहे.

दोन बालविवाह रोखण्यात यश
दोन बालविवाह रोखण्यात यश
author img

By

Published : May 15, 2021, 6:49 AM IST

Updated : May 15, 2021, 7:22 AM IST


सातारा - कोरोना महामारीला हाताळण्यात सध्या प्रशासन व्यस्त आहे. याचाच फायदा घेत बीड जिल्ह्यात चोरून दोन बालविवाह उरकरण्यात येणार होते. मात्र, साताऱ्याच्या लेक लाडकी अभियान राबणाऱ्या संस्थेस हे बालविवाह रोखण्यात यश आले आहे. या अभियानाच्या संचालिका अॅड. वर्षा देशपांडे यांनी तत्परता दाखवत पोलिसांच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हे बालविवाह रोखले आहेत.

तिला शिकून वकील व्हायच आहे-

बहुसंख्येने ऊसतोड कामगार असलेल्या बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यात बालविवाहांची मोठी समस्या आहे. गेली काही वर्षे साताऱ्यातील लेक लाडकी अभियानाच्या संचालिका अॅड. वर्षा देशपांडे बालविवाहाविरोधात शिरुरकासार तालुक्यात काम करतात. इयत्ता ११ वीत शिकत असलेली १७ वर्षांची वैशाली (नाव बदलले आहे.) शाळेच्या दिवसात 'लेक लाडकी अभियान' आणि यूएनएफपीएच्या बालविवाह रोखून मुलींना स्वयंपूर्ण करण्याच्या एका प्रकल्पामध्ये सक्रिय होती. वडील नसल्याने आईसह मामाच्या आधाराने ती एका दुर्गम वाडीत राहते. विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन वकील व्हायचे तिचे स्वप्न आहे. वक्तृत्व स्पर्धा आणि पथनाट्याबरोबरच ती अभ्यासातही हुशार आहे. मात्र तिलाच या बालविवाहाच्या संकटाला सामोरे जावे लागणार होते.

वैशाली व तिच्या आईचा होता विरोध

लॉकडाऊनमुळे २० लोकांच्या उपस्थितीची अट असल्याने लग्न स्वस्तात होते. बऱ्याचदा मुलाकडील लोकांकडूनच काही रक्कम पदरात पडते. वैशालीच्या मामानेही तिच्यासाठी पैठणहून स्थळ आणले आणि लग्नाची तयारी सुरू केली. वैशाली आणि आईने त्याला विरोध केला, पण त्यांना गप्प बसवले गेले. बहिणीचा बालविवाह झाल्याने तिच्या आयुष्याची झालेली फरफट वैशाली बघत होती. हट्ट करून, रडूनही मामाला पाझर फुटत नाही म्हटल्यावर तिने 'लेक लाडकी अभियाना'च्या अॅड. वर्षा देशपांडे यांना या घडामोडींचा एक संदेश पाठवला. त्यानंतर चक्रे हलली.

'लेक लाडकी'ने घेतली जबाबदारी

अभियानाकडून तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हाधिकारी, शिरुरकासार पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. चाइल्ड हेल्प लाइनवरही तक्रार नोंदवली. ४ एप्रिलला चाइल्डलाइनकडून वाडीच्या ग्रामसेवकांना तातडीने पत्र गेले. बुधवारी, ५ एप्रिल रोजी महिला पोलिसासह सरिता आणि तिच्या पालकांना बीडला बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगून हा विवाह रोखला गेला. लॉकडाउन संपताच तिचे पुढील शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी लेक लाडकी अभियान उचलणार आहे.

दोन बालविवाह रोखण्यात यश
'तिचा'ही रोखला बालविवाहयाच तालुक्यातील एका गावात दुसरा एक बालविवाह रोखला गेला. कमल (नाव बदलले आहे) ही मुलगी अवघ्या १६ वर्षांची असून इयत्ता ७ वीत शिकते. तिच्या वडिलांनी स्थळ पाहिले होते. 8 मे रोजी तिचा विवाह होणार होता. मात्र एवढ्यात लग्न न करता कमलला शिक्षण पुर्ण करायचे आहे. दारात मांडवही पडला होता. कमलच्या मैत्रिणीने कमलच्या इच्छेविरोधात लग्न होत असल्याची माहिती अॅड. देशपांडे यांना कळवली. हायस्कूल शिक्षकांकडून मिळालेली माहिती तपासण्यात आली. ग्रामसेवक व अंगणवाडीताई यांची मदत मिळाली. यंत्रणेला सजग करण्यात आल्यानंतर हा विवाहही पालकांचे हमीपत्र घेऊन रोखण्यात आला.मंत्र्यांनी लक्ष घालावे-पंचवीस लोकांमध्ये लग्न करायला परवानगी असल्याने आणि गुपचूपरीत्या काही गोष्टी करता येत असल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत आहेत. कोरोनाचा कठीण काळ आज ना उद्या जाईल. परंतु दुसऱ्या बाजूला बालविवाह झाले तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी बालके कुपोषित असतील, त्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणून महिला व बालकल्याण मंत्र्यांनी या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी अॅड. वर्षा देशपांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.


सातारा - कोरोना महामारीला हाताळण्यात सध्या प्रशासन व्यस्त आहे. याचाच फायदा घेत बीड जिल्ह्यात चोरून दोन बालविवाह उरकरण्यात येणार होते. मात्र, साताऱ्याच्या लेक लाडकी अभियान राबणाऱ्या संस्थेस हे बालविवाह रोखण्यात यश आले आहे. या अभियानाच्या संचालिका अॅड. वर्षा देशपांडे यांनी तत्परता दाखवत पोलिसांच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हे बालविवाह रोखले आहेत.

तिला शिकून वकील व्हायच आहे-

बहुसंख्येने ऊसतोड कामगार असलेल्या बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यात बालविवाहांची मोठी समस्या आहे. गेली काही वर्षे साताऱ्यातील लेक लाडकी अभियानाच्या संचालिका अॅड. वर्षा देशपांडे बालविवाहाविरोधात शिरुरकासार तालुक्यात काम करतात. इयत्ता ११ वीत शिकत असलेली १७ वर्षांची वैशाली (नाव बदलले आहे.) शाळेच्या दिवसात 'लेक लाडकी अभियान' आणि यूएनएफपीएच्या बालविवाह रोखून मुलींना स्वयंपूर्ण करण्याच्या एका प्रकल्पामध्ये सक्रिय होती. वडील नसल्याने आईसह मामाच्या आधाराने ती एका दुर्गम वाडीत राहते. विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन वकील व्हायचे तिचे स्वप्न आहे. वक्तृत्व स्पर्धा आणि पथनाट्याबरोबरच ती अभ्यासातही हुशार आहे. मात्र तिलाच या बालविवाहाच्या संकटाला सामोरे जावे लागणार होते.

वैशाली व तिच्या आईचा होता विरोध

लॉकडाऊनमुळे २० लोकांच्या उपस्थितीची अट असल्याने लग्न स्वस्तात होते. बऱ्याचदा मुलाकडील लोकांकडूनच काही रक्कम पदरात पडते. वैशालीच्या मामानेही तिच्यासाठी पैठणहून स्थळ आणले आणि लग्नाची तयारी सुरू केली. वैशाली आणि आईने त्याला विरोध केला, पण त्यांना गप्प बसवले गेले. बहिणीचा बालविवाह झाल्याने तिच्या आयुष्याची झालेली फरफट वैशाली बघत होती. हट्ट करून, रडूनही मामाला पाझर फुटत नाही म्हटल्यावर तिने 'लेक लाडकी अभियाना'च्या अॅड. वर्षा देशपांडे यांना या घडामोडींचा एक संदेश पाठवला. त्यानंतर चक्रे हलली.

'लेक लाडकी'ने घेतली जबाबदारी

अभियानाकडून तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हाधिकारी, शिरुरकासार पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. चाइल्ड हेल्प लाइनवरही तक्रार नोंदवली. ४ एप्रिलला चाइल्डलाइनकडून वाडीच्या ग्रामसेवकांना तातडीने पत्र गेले. बुधवारी, ५ एप्रिल रोजी महिला पोलिसासह सरिता आणि तिच्या पालकांना बीडला बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगून हा विवाह रोखला गेला. लॉकडाउन संपताच तिचे पुढील शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी लेक लाडकी अभियान उचलणार आहे.

दोन बालविवाह रोखण्यात यश
'तिचा'ही रोखला बालविवाहयाच तालुक्यातील एका गावात दुसरा एक बालविवाह रोखला गेला. कमल (नाव बदलले आहे) ही मुलगी अवघ्या १६ वर्षांची असून इयत्ता ७ वीत शिकते. तिच्या वडिलांनी स्थळ पाहिले होते. 8 मे रोजी तिचा विवाह होणार होता. मात्र एवढ्यात लग्न न करता कमलला शिक्षण पुर्ण करायचे आहे. दारात मांडवही पडला होता. कमलच्या मैत्रिणीने कमलच्या इच्छेविरोधात लग्न होत असल्याची माहिती अॅड. देशपांडे यांना कळवली. हायस्कूल शिक्षकांकडून मिळालेली माहिती तपासण्यात आली. ग्रामसेवक व अंगणवाडीताई यांची मदत मिळाली. यंत्रणेला सजग करण्यात आल्यानंतर हा विवाहही पालकांचे हमीपत्र घेऊन रोखण्यात आला.मंत्र्यांनी लक्ष घालावे-पंचवीस लोकांमध्ये लग्न करायला परवानगी असल्याने आणि गुपचूपरीत्या काही गोष्टी करता येत असल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत आहेत. कोरोनाचा कठीण काळ आज ना उद्या जाईल. परंतु दुसऱ्या बाजूला बालविवाह झाले तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी बालके कुपोषित असतील, त्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणून महिला व बालकल्याण मंत्र्यांनी या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी अॅड. वर्षा देशपांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.
Last Updated : May 15, 2021, 7:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.