ETV Bharat / state

शेतकर्‍यांना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा- शिवेंद्रसिंहराजे भोसले

author img

By

Published : Jun 24, 2020, 6:46 PM IST

देगाव, निगडी, वर्णे वाढीव एमआयडीसी मंजूर असून तसे शिक्केही जमीनीवर पडले आहेत.या साठी करण्यात येणाऱ्या भूसंपदनावेळी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 ते 60 लाख दर मिळावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्याच मुलाबाळांना हक्काची नोकरी मिळण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

shivendrasinh raje bhonsale visit satara collector
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

सातारा- तालुक्यातील वाढीव एमआयडीसीसाठी टप्पा क्र. 3 व 4 मधील देगाव, निगडी आणि वर्णे याठिकाणी योग्य दर मिळाला तर शेतकरी जमिनी देण्यासाठी तयार होतील. रोजगारनिर्मिती, भुमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी आणि सातारा तालुक्याच्या विकासाच्यादृष्टीने वाढीव एमआयडीसी होणे काळाची गरज आहे. याठिकाणी 11 लाख रुपये हेक्टरी एवढा उच्चतम दर आहे. नवीन कायद्यानुसार चारपट म्हणजेच 44 लाख रुपये हेक्टरी दर शेतकऱ्यांना मिळू शकतो. मात्र, तडजोडीअंती शेतकर्‍यांना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा, अशी मागणी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. 3 (देगांव) आणि टप्पा क्र. 4 (निगडी- वर्णे) भूसंपादनाबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांनी भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा दर याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी आ. प्रभाकर घार्गे, औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, साताऱ्याचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारा एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, भूमापक खापरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

देगांव, निगडी, वर्णे वाढीव एमआयडीसी मंजूर असून तसे शिक्केही जमीनीवर पडले आहेत. रोजगारनिर्मीतीसाठी ही एमआयडीसी लवकरात लवकर पुर्ण होणे आवश्यक आहे. भूमीपुत्रांना नोकर्‍या मिळतील आणि शेतकर्‍यांंच्या जमिनीला पैसेही मिळतील. त्यासाठी भुसंपादन तातडीने झाले पाहिजे. रास्त भाव मिळाला तर शेतकरीही जमीन देण्यास तयार आहेत. भुसंपादन करताना बागायती क्षेत्र, तसेच घरबांधणीसाठी झालेले प्लॉटिंग, नागरी वस्ती आणि देगांव पाझर तलाव वगळून डोंगरालगतची पडीक, माळरान, नापीक जमीन संपादन करावी, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीत केली.

शेतकर्‍यांना चांगला दर मिळावा याबाबत आपण स्वत: पाठपुरावा करु. शेतकर्‍यांनीही भूसंपादनासाठी सहकार्य केले पाहिजे. चांगला दर मिळत असेल तर विरोध करु नये आणि आपल्याच मुलाबाळांना हक्काची नोकरी मिळण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले.

सातारा- तालुक्यातील वाढीव एमआयडीसीसाठी टप्पा क्र. 3 व 4 मधील देगाव, निगडी आणि वर्णे याठिकाणी योग्य दर मिळाला तर शेतकरी जमिनी देण्यासाठी तयार होतील. रोजगारनिर्मिती, भुमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी आणि सातारा तालुक्याच्या विकासाच्यादृष्टीने वाढीव एमआयडीसी होणे काळाची गरज आहे. याठिकाणी 11 लाख रुपये हेक्टरी एवढा उच्चतम दर आहे. नवीन कायद्यानुसार चारपट म्हणजेच 44 लाख रुपये हेक्टरी दर शेतकऱ्यांना मिळू शकतो. मात्र, तडजोडीअंती शेतकर्‍यांना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा, अशी मागणी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. 3 (देगांव) आणि टप्पा क्र. 4 (निगडी- वर्णे) भूसंपादनाबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांनी भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा दर याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी आ. प्रभाकर घार्गे, औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, साताऱ्याचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारा एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, भूमापक खापरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

देगांव, निगडी, वर्णे वाढीव एमआयडीसी मंजूर असून तसे शिक्केही जमीनीवर पडले आहेत. रोजगारनिर्मीतीसाठी ही एमआयडीसी लवकरात लवकर पुर्ण होणे आवश्यक आहे. भूमीपुत्रांना नोकर्‍या मिळतील आणि शेतकर्‍यांंच्या जमिनीला पैसेही मिळतील. त्यासाठी भुसंपादन तातडीने झाले पाहिजे. रास्त भाव मिळाला तर शेतकरीही जमीन देण्यास तयार आहेत. भुसंपादन करताना बागायती क्षेत्र, तसेच घरबांधणीसाठी झालेले प्लॉटिंग, नागरी वस्ती आणि देगांव पाझर तलाव वगळून डोंगरालगतची पडीक, माळरान, नापीक जमीन संपादन करावी, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीत केली.

शेतकर्‍यांना चांगला दर मिळावा याबाबत आपण स्वत: पाठपुरावा करु. शेतकर्‍यांनीही भूसंपादनासाठी सहकार्य केले पाहिजे. चांगला दर मिळत असेल तर विरोध करु नये आणि आपल्याच मुलाबाळांना हक्काची नोकरी मिळण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.