ETV Bharat / state

पवारांचा डाव अन् साताऱ्याच्या दोन आमदारांवर घाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात यंदा मात्र चांगलीच गळती लागली होती. सत्तेच्या अपेक्षा बाळगत शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राज्यात नवीन समिकरण उदयास आणत शरद पवार यांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. नुकत्याच भाजपवासी झालेल्या भोसले आणि गोरे या आमदारांचा मात्र अपेक्षा भंग झाला.

author img

By

Published : Nov 29, 2019, 2:01 PM IST

sharad pawar's political strategy
शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात यंदा मात्र चांगलीच गळती लागली होती. सत्तेच्या अपेक्षा बाळगत शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राज्यात नवीन समिकरण उदयास आणत शरद पवार यांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. नुकत्याच भाजपवासी झालेल्या भोसले आणि गोरे या आमदारांचा मात्र अपेक्षा भंग झाला.

हेही वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा चेहरा

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीला गळती लागली होती. या आऊटगोईंचा फायदा भाजपला झाला. बरेच विद्यमान आमदार आघाडीला राम राम ठोकून भाजपवासी झाले. माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे यांनी काँग्रेस सोडली तर सातारा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडली. दोघांनीही यंदा भाजपकडून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले. मोठ्या अपेक्षेने भाजपमध्ये गेलेल्या या आमदारांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. भाजपची सत्ता गेली अन् महाविकासआघाडीची सत्ता आली. शरद पवारांच्या रणनितीमुळे भाजपवासी झालेल्या सर्व आमदारांना याचा फटका बसला आहे.

दरम्यान, सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षात माजी खासदार उदयनराजे यांच्याशी फारसं पटत नसल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवेंद्रराजे यांच्या पाठोपाठ उदयनराजेंनीही भाजपमध्ये प्रवेश केला. शिवेंद्रराजे निवडून देखील आले मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे त्यांची मंत्रिपदाची संधी गेली. भाजपच्या शेवटच्या मेगाभरतीमध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांचे नाव होते. आमदार जयकुमार गोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. मात्र त्यांना देखील विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयात मिळणार पोटभर जेवण; नव्या सरकारचा किमान समान कार्यक्रम घोषित

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात यंदा मात्र चांगलीच गळती लागली होती. सत्तेच्या अपेक्षा बाळगत शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राज्यात नवीन समिकरण उदयास आणत शरद पवार यांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. नुकत्याच भाजपवासी झालेल्या भोसले आणि गोरे या आमदारांचा मात्र अपेक्षा भंग झाला.

हेही वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा चेहरा

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीला गळती लागली होती. या आऊटगोईंचा फायदा भाजपला झाला. बरेच विद्यमान आमदार आघाडीला राम राम ठोकून भाजपवासी झाले. माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे यांनी काँग्रेस सोडली तर सातारा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडली. दोघांनीही यंदा भाजपकडून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले. मोठ्या अपेक्षेने भाजपमध्ये गेलेल्या या आमदारांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. भाजपची सत्ता गेली अन् महाविकासआघाडीची सत्ता आली. शरद पवारांच्या रणनितीमुळे भाजपवासी झालेल्या सर्व आमदारांना याचा फटका बसला आहे.

दरम्यान, सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षात माजी खासदार उदयनराजे यांच्याशी फारसं पटत नसल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवेंद्रराजे यांच्या पाठोपाठ उदयनराजेंनीही भाजपमध्ये प्रवेश केला. शिवेंद्रराजे निवडून देखील आले मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे त्यांची मंत्रिपदाची संधी गेली. भाजपच्या शेवटच्या मेगाभरतीमध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांचे नाव होते. आमदार जयकुमार गोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. मात्र त्यांना देखील विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयात मिळणार पोटभर जेवण; नव्या सरकारचा किमान समान कार्यक्रम घोषित

Intro:सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यातच भाजपने अनेक नेते फोडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले मात्र सातारा लोकसभा पोट निवडणूक जिंकून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचे दाखवून दिले, तर पवार यांच्या डावाने अनेक नेत्यांची मंत्री पदाची स्वप्न देखील भंग झाली. Body:राज्यात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार आले. या सत्तांतरामुळे विधानसभा निवडणुकीआधी सातारा जिल्ह्यातील पक्षांतर केलेल्या अनेक नेत्यांना मोठा फटका बसला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. मात्र या नेत्यांचा अंदाज चुकल्याने सत्तेच्या लोभापाई भाजपमध्ये गेलेल्या या नेत्यांची निराशा झाली असून त्यांना विरोधातचं बसावं लागणार आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे तात्कालीन कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षात माजी खासदार उदयनराजे यांच्याशी फारसं पटत नसल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिवेंद्रराजें पाठोपाठ उदयनराजेंनीही भाजपवासी झाले. शिवेंद्रराजे निवडून देखील आले मात्र महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होत असाताना त्यांची मंत्रिपदाची संधी गेली. भाजपच्या शेवटच्या मेगाभरतीमध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांचं नाव होतं. आमदार जयकुमार गोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. मात्र त्यांना देखील विरोधी बाकावर बसावं लागले आहे. हे दोन्ही नेते महाविकास आघाडी सरकारमध्ये असते तर त्यांना किमान राज्यमंत्रीपद मिळालं असती कारण दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील मुख्या नेते तर पश्चिम महाराष्ट्रत मोठा आवाज देखील होता मात्र अचानक पवारांचा राजकीय डाव पडला आणि पुन्हा विरोधी बाकावरती बसावे लागले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.