ETV Bharat / state

जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई ११६ जणांसह १४ चारचाकी व एक ट्रक पोलीसांनी घेतला ताब्यात - satara police registered case agains 166 peoples

सातारा पोलिसांनी मुंबई, पुणे, आणि सुरतवरुन येणाऱ्या 14 दुकाची आणि एका ट्रक मधील 116 जणांवर कारवाई केली. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

satara-police-have-registered-a-case-against-116-persons
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 28, 2020, 4:49 PM IST

सातारा - मुंबईवरुन पुण्याकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र, अगदी सुरत पासून दहिवडीपर्यंत लपत-छपत पोहोचलेल्या तब्बल 116 जणांसह 14 चारचाकी आणि एका ट्रकला दहिपडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई ११६ जणांसह १४ चारचाकी व एक ट्रक पोलीसांनी घेतला ताब्यात

कोरोना'चा संसंर्ग वाढू नये म्हणून शासनाने विविध निर्बंध घातले आहेत. १४४ कलम लागू करुन संचारबंदी व टाळेबंदी जाहीर केली आहे. कोणालाही गाव सोडण्यास परवानगी नाही. विशेषतं मुंबई, पुण्यासह परराज्यातून येण्यास पुर्ण मज्जाव करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेल विक्री सामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने एवढे करुनही या उपाययोजनामध्ये राबवण्यात आलेल्या ढिलाईमुळे अजूनही गावोगावी मोठ्या प्रमाणात बाहेरील लोक येत आहेत.

दहिवडी पोलीसांनी केलेल्या नाकाबंदीत आज फलटण चौक व मार्डी चौकात मुंबईवरुन आलेल्या १४ चारचाकी पोलिसांनी पकडल्या. यातील ७९ प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले असून गुजरामधील सुरत, भिवंडी येथून मालवाहू ट्रकमधून आलेल्या ३७ प्रवाशांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर भारतीय दंड विधान कलम २६९, १८८ अन्वये शासनाचे निर्बंध डावलून आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आणि संसर्गजन्य आजार पसरविण्याचा धोका माहिती असतानाही फिरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा - मुंबईवरुन पुण्याकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र, अगदी सुरत पासून दहिवडीपर्यंत लपत-छपत पोहोचलेल्या तब्बल 116 जणांसह 14 चारचाकी आणि एका ट्रकला दहिपडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई ११६ जणांसह १४ चारचाकी व एक ट्रक पोलीसांनी घेतला ताब्यात

कोरोना'चा संसंर्ग वाढू नये म्हणून शासनाने विविध निर्बंध घातले आहेत. १४४ कलम लागू करुन संचारबंदी व टाळेबंदी जाहीर केली आहे. कोणालाही गाव सोडण्यास परवानगी नाही. विशेषतं मुंबई, पुण्यासह परराज्यातून येण्यास पुर्ण मज्जाव करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेल विक्री सामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने एवढे करुनही या उपाययोजनामध्ये राबवण्यात आलेल्या ढिलाईमुळे अजूनही गावोगावी मोठ्या प्रमाणात बाहेरील लोक येत आहेत.

दहिवडी पोलीसांनी केलेल्या नाकाबंदीत आज फलटण चौक व मार्डी चौकात मुंबईवरुन आलेल्या १४ चारचाकी पोलिसांनी पकडल्या. यातील ७९ प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले असून गुजरामधील सुरत, भिवंडी येथून मालवाहू ट्रकमधून आलेल्या ३७ प्रवाशांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर भारतीय दंड विधान कलम २६९, १८८ अन्वये शासनाचे निर्बंध डावलून आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आणि संसर्गजन्य आजार पसरविण्याचा धोका माहिती असतानाही फिरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.