ETV Bharat / state

Mask Compulsion: मुख्यमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यावर सातारा जिल्ह्यातील मास्कसक्ती मागे, तक्रारीनंतर शिंदेंनी जिल्ह्याधिकाऱ्यांना झापले

author img

By

Published : Apr 14, 2023, 12:12 PM IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे मास्कसक्ती करण्यात आली होती. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कसक्ती केली होती. परंतु, तक्रारीमुळे हा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मास्कसक्ती मागे घ्यावी लागली आहे.

mask compulsion
मास्क सक्तीचा आदेश घेतला मागे

सातारा : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. कोरोना झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू साताऱ्यामध्ये झाला आहे. त्यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली होती. परंतु, तक्रारीमुळे हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांची कानउघाडणी करताच जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्ती मागे घेतली. तसेच खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. सक्ती केली नव्हती, अशी पलटीदेखील मारली आहे.



मास्क सक्तीची तक्रार : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली होती. मास्क सक्तीमुळे सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यास अडचण होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मुख्य सचिवांना विचारणा केली.



मुख्य सचिवांकरवी कानउघाडणी : सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी मास्कसक्ती करण्याचा निर्णय लागू केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे असल्याने त्यांनी तक्रारीची दखल घेतली. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या कारवाईमुळे सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. आठवड्यापूर्वी सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली होती. मात्र, तक्रारीनंतर त्यांना आदेश मागे घ्यावा लागला आहे. मास्क सक्तीचे कोणतेही आदेश दिले नव्हते. खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन केल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी आता दिले आहे.



जिल्हाधिकाऱ्यांचे आपल्या अधिकारात आदेश : साथ नियंत्रण कायदा लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना काही अधिकार देण्यात आले आहेत. त्या आधारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी मास्क सक्तीचे आदेश दिले होते. मास्क न घालता गेल्यास सरकारी कार्यालयात त्यांना प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली होती. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केली होती.

स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा : याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला होता. स्वयंस्फूर्तीने मास्क वापरावा आठवडी बाजार, एसटी स्टॅंड, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, तसेच मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, अशा ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. सामाजिक अंतर राखून सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले होते.

हेही वाचा: Two corona patients died साताऱ्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू या संस्थांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

सातारा : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. कोरोना झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू साताऱ्यामध्ये झाला आहे. त्यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली होती. परंतु, तक्रारीमुळे हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांची कानउघाडणी करताच जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्ती मागे घेतली. तसेच खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. सक्ती केली नव्हती, अशी पलटीदेखील मारली आहे.



मास्क सक्तीची तक्रार : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली होती. मास्क सक्तीमुळे सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यास अडचण होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मुख्य सचिवांना विचारणा केली.



मुख्य सचिवांकरवी कानउघाडणी : सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी मास्कसक्ती करण्याचा निर्णय लागू केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे असल्याने त्यांनी तक्रारीची दखल घेतली. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या कारवाईमुळे सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. आठवड्यापूर्वी सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली होती. मात्र, तक्रारीनंतर त्यांना आदेश मागे घ्यावा लागला आहे. मास्क सक्तीचे कोणतेही आदेश दिले नव्हते. खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन केल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी आता दिले आहे.



जिल्हाधिकाऱ्यांचे आपल्या अधिकारात आदेश : साथ नियंत्रण कायदा लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना काही अधिकार देण्यात आले आहेत. त्या आधारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी मास्क सक्तीचे आदेश दिले होते. मास्क न घालता गेल्यास सरकारी कार्यालयात त्यांना प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली होती. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केली होती.

स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा : याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला होता. स्वयंस्फूर्तीने मास्क वापरावा आठवडी बाजार, एसटी स्टॅंड, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, तसेच मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, अशा ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. सामाजिक अंतर राखून सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले होते.

हेही वाचा: Two corona patients died साताऱ्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू या संस्थांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.