ETV Bharat / state

ज्यांना पक्ष जोडता येत नाही ते देश काय जोडणार, रामदास आठवलेंची राहुल गांधींवर खोचक टीका - २०२४ ला मोदीच पंतप्रधान होणार

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अशी टीका काँग्रेस आणि राहुल गांधींवर केली आहे (Ramdas Athawale criticizes Rahul Gandhi). ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे (how can Rahul handle the country).

रामदास आठवलेंची राहुल गांधींवर खोचक टीका
रामदास आठवलेंची राहुल गांधींवर खोचक टीका
author img

By

Published : Sep 8, 2022, 9:00 PM IST

Updated : Sep 8, 2022, 9:24 PM IST

सातारा - ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर केली आहे. भारत जोडो यात्रेला भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली असल्याचा हल्लाबोलही आठवलेंनी केला आहे.

आठवलेंची राहुल गांधींवर खोचक टीका

पंतप्रधान मोदींनी सगळा देश जोडला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात सध्या दुसरा कोणीही नेता नाही. बिहारचे नेते नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांना भेटत असले तरी मोदींशी सामना करणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल, असा टोला आठवलेंनी विरोधकांना मारला.


महापालिका निवडणुकीत मनसेला बरोबर घेऊ नये - मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मनसेला बरोबर घेऊ नये. शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.

२०२४ ला मोदीच पंतप्रधान होणार - केंद्रीय मंत्री आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यासाठी येणार आहेत. शरद पवारांची बारामती आपल्या ताब्यात कशी येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. बारामती मतदार संघात भाजपची हवा असल्याने बारामतीची जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. तसेच २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

सातारा - ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर केली आहे. भारत जोडो यात्रेला भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली असल्याचा हल्लाबोलही आठवलेंनी केला आहे.

आठवलेंची राहुल गांधींवर खोचक टीका

पंतप्रधान मोदींनी सगळा देश जोडला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात सध्या दुसरा कोणीही नेता नाही. बिहारचे नेते नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांना भेटत असले तरी मोदींशी सामना करणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल, असा टोला आठवलेंनी विरोधकांना मारला.


महापालिका निवडणुकीत मनसेला बरोबर घेऊ नये - मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मनसेला बरोबर घेऊ नये. शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.

२०२४ ला मोदीच पंतप्रधान होणार - केंद्रीय मंत्री आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यासाठी येणार आहेत. शरद पवारांची बारामती आपल्या ताब्यात कशी येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. बारामती मतदार संघात भाजपची हवा असल्याने बारामतीची जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. तसेच २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Sep 8, 2022, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.