ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 22 जणांचा मृत्यू, 24 बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु

author img

By

Published : Jul 24, 2021, 9:16 PM IST

जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली आहेत. तर, 22 जणांचा मृत्यु झाला आहे. तर, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले, असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

सातारा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 22 जणांचा मृत्यू
सातारा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 22 जणांचा मृत्यू

सातारा - गेल्या तीन चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली आहेत. तर, 22 जणांचा मृत्यु झाला आहे. तर, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले, असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत बोलताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील

22 जणांचा मृत्यु

जिल्ह्यातील एकूण 22 जणांचा मृत्यु झाला असून, 24 जण बेपत्ता आहेत. तर, 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत व्यक्ती, 2 जण बेपत्ता व 20 मृत पशुधन, कराड तालुक्यात 3 हजार मृत पशुधन (कोंबडी), पाटण तालुक्यात 16 मृत व्यक्ती व 20 जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत व्यक्ती व 2 मृत पशुधन, सातारा तालुक्यात 2 मृत पशुधन, जावली तालुक्यात 2 मृत व्यक्ती व 2 जण बेपत्ता झाले आहेत.

379 गावे बाधित

जिल्ह्यातील एकूण 167 गावे पुर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झाली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पुर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अंशत: बाधित झाली आहेत. पाटण तालुक्यातील 10 गावे पुर्णत: व 60 गावे अंशत: अशी एकूण 70 गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पुर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील 13 गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील 102 गावे अंशत: बाधित झाली आहेत.

1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतरण

जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील 72 कुटुंबातील 390 जण, कराड तालुक्यातील 876 कुटुंबातील 3 हजार 836 जण, पाटण तालुक्यातील 325 कुटुंबातील 1 हजार 300 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 51 कुटुंबातील 130 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

कार्यरत टिम

जिल्ह्यात एकूण 3 'एनडीआरएफ' च्या टीम कार्यरत असून एका टिमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

सातारा - गेल्या तीन चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली आहेत. तर, 22 जणांचा मृत्यु झाला आहे. तर, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले, असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत बोलताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील

22 जणांचा मृत्यु

जिल्ह्यातील एकूण 22 जणांचा मृत्यु झाला असून, 24 जण बेपत्ता आहेत. तर, 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत व्यक्ती, 2 जण बेपत्ता व 20 मृत पशुधन, कराड तालुक्यात 3 हजार मृत पशुधन (कोंबडी), पाटण तालुक्यात 16 मृत व्यक्ती व 20 जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत व्यक्ती व 2 मृत पशुधन, सातारा तालुक्यात 2 मृत पशुधन, जावली तालुक्यात 2 मृत व्यक्ती व 2 जण बेपत्ता झाले आहेत.

379 गावे बाधित

जिल्ह्यातील एकूण 167 गावे पुर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झाली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पुर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अंशत: बाधित झाली आहेत. पाटण तालुक्यातील 10 गावे पुर्णत: व 60 गावे अंशत: अशी एकूण 70 गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पुर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील 13 गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील 102 गावे अंशत: बाधित झाली आहेत.

1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतरण

जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील 72 कुटुंबातील 390 जण, कराड तालुक्यातील 876 कुटुंबातील 3 हजार 836 जण, पाटण तालुक्यातील 325 कुटुंबातील 1 हजार 300 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 51 कुटुंबातील 130 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

कार्यरत टिम

जिल्ह्यात एकूण 3 'एनडीआरएफ' च्या टीम कार्यरत असून एका टिमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.