ETV Bharat / state

खाशाबा जाधवांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' द्या; श्रीनिवास पाटील यांचे नरेंद्र मोदींना पत्र

author img

By

Published : Aug 26, 2020, 6:38 PM IST

ऑलिंम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्य पदक मिळवून देणारे साताऱ्यातील कराडचे सुपूत्र पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्कार देण्याची मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Give posthumous Padma Vibhushan to Khashaba Jadhav; Mp Shrinivas Patil wright letter to Narendra Modi
खाशाबा जाधवांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' द्या; खा. श्रीनिवास पाटील यांचे नरेंद्र मोदींना पत्र

कराड (सातारा) - ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्य पदक मिळवून देणारे साताऱ्यातील कराडचे सुपूत्र पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्कार देण्याची मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच त्यांनी याबाबत राज्याच्या पद्म पुरस्कार शिफारस समितीनेही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.

खासदार श्रीनिवास पाटील बोलताना...

सातारा लोकसभा मतदार संघातील गोळेश्वर येथील दिवंगत पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मधील हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्री स्टाइल बॅन्टमवेट कुस्ती प्रकारात 'कांस्य पदक' पटकावत भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. भारत सरकारने 1952 मध्ये त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकिट छापले. तसेच 2000 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च 'अर्जुन' पुरस्काराने गौरविले होते.

सुविधांचा अभाव आणि प्रतिकूल परिस्थितीत जाधव यांनी कुस्तीमध्ये मिळविलेले कांस्य पदक हे 1952 पासून पुढील 44 वर्षे भारतासाठी मिळविलेले एकमेव व्यक्तिगत पदक होते. भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होत आहे. क्रीडाप्रेमींची भावना लक्षात घेऊन दिवंगत खाशाबा जाधव यांचा पद्मविभूषण पुरस्काराने मरणोत्तर सन्मान करण्यात यावा, अशी विनंती खासदार पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

हेही वाचा - पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे दरवाजे बंद; 95.79 टीएमसी पाणीसाठा

हेही वाचा - सेल्फी बेतली जीवावर, बलकवडी धरणाच्या कड्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

कराड (सातारा) - ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्य पदक मिळवून देणारे साताऱ्यातील कराडचे सुपूत्र पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्कार देण्याची मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच त्यांनी याबाबत राज्याच्या पद्म पुरस्कार शिफारस समितीनेही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.

खासदार श्रीनिवास पाटील बोलताना...

सातारा लोकसभा मतदार संघातील गोळेश्वर येथील दिवंगत पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मधील हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्री स्टाइल बॅन्टमवेट कुस्ती प्रकारात 'कांस्य पदक' पटकावत भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. भारत सरकारने 1952 मध्ये त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकिट छापले. तसेच 2000 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च 'अर्जुन' पुरस्काराने गौरविले होते.

सुविधांचा अभाव आणि प्रतिकूल परिस्थितीत जाधव यांनी कुस्तीमध्ये मिळविलेले कांस्य पदक हे 1952 पासून पुढील 44 वर्षे भारतासाठी मिळविलेले एकमेव व्यक्तिगत पदक होते. भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होत आहे. क्रीडाप्रेमींची भावना लक्षात घेऊन दिवंगत खाशाबा जाधव यांचा पद्मविभूषण पुरस्काराने मरणोत्तर सन्मान करण्यात यावा, अशी विनंती खासदार पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

हेही वाचा - पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे दरवाजे बंद; 95.79 टीएमसी पाणीसाठा

हेही वाचा - सेल्फी बेतली जीवावर, बलकवडी धरणाच्या कड्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.