ETV Bharat / state

निवडणुकांच्या तोंडावरती भाजप सरकारची मुश्रीफ यांच्यावरती कारवाई - अजित पवार - Ajit Pawar meeting

ज्यांचे कारखाने, शिक्षण संस्था आहेत, त्यांना त्रास देऊन पक्षात घेण्यासाठी दबाव व भीती दाखवली जात आहे, असे म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीका केली.

अजित पवार
author img

By

Published : Jul 25, 2019, 10:29 PM IST

Updated : Jul 25, 2019, 11:28 PM IST

सातारा - आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने टाकलेले छापे निवडणुकीच्या तोंडावर इतरांना भीती दाखवण्यासाठी टाकले जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सरकारवरती केली. ते आज साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेला इच्छुक असलेल्या नेत्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

साताऱ्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार भाजपवर टीका करताना

पवारांनी सांगितले, की ज्यांचे कारखाने, शिक्षण संस्था आहेत, त्यांना त्रास देऊन पक्षात घेण्यासाठी दबाव व भीती दाखवली जात आहे. त्यामुळे अशा कारवाया भाजप सरकार करत आहे. तसेच भाजपकडून अनेकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी कारस्थाने केली जात आहेत, असेही ते म्हणाले.

सातारा - आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने टाकलेले छापे निवडणुकीच्या तोंडावर इतरांना भीती दाखवण्यासाठी टाकले जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सरकारवरती केली. ते आज साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेला इच्छुक असलेल्या नेत्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

साताऱ्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार भाजपवर टीका करताना

पवारांनी सांगितले, की ज्यांचे कारखाने, शिक्षण संस्था आहेत, त्यांना त्रास देऊन पक्षात घेण्यासाठी दबाव व भीती दाखवली जात आहे. त्यामुळे अशा कारवाया भाजप सरकार करत आहे. तसेच भाजपकडून अनेकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी कारस्थाने केली जात आहेत, असेही ते म्हणाले.

Intro:सातारा : आज सातार्‍यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने विधानसभेला इच्छुक असलेल्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरती करण्यात आलेल्या आयकर विभागाचे छापे हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर केला जात असून इतरांना भीती दाखवली जात आहे. अशी टीका भाजप सरकारवरती अजित पवारांनी केली आहे.Body:आज सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की ज्यांचे कारखाने, शिक्षण संस्था आहेत.ह्यांना त्रास देऊन त्यांना पक्षात घेण्यासाठी दबाव व भीती दाखवली जात आहे. त्यामुळे अशा कारवाया भाजप सरकार करत आहे व अनेकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी कारस्थाने केली जात आहेत.Conclusion:
Last Updated : Jul 25, 2019, 11:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.