ETV Bharat / state

'उसाच्या एफआरपीबाबत 28 जानेवारीला निर्णय'

राज्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी बुधवारी पहिल्यांदाच सांगलीमध्ये उपस्थिती लावली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री कदम यांनी आढावा बैठक घेतली.

author img

By

Published : Jan 22, 2020, 8:40 PM IST

Vishwajeet Kadam
विश्वजीत कदम

सांगली - राज्यातील सहकाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकाकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील उसाच्या एफआरपीबाबत येत्या 28 जानेवारीला मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विश्वजीत कदम, कृषी व सहकार राज्यमंत्री

हेही वाचा - प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी

राज्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी बुधवारी पहिल्यांदाच सांगलीमध्ये उपस्थिती लावली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री कदम यांनी आढावा बैठक घेतली.

यावेळी कदम म्हणाले, देशातील 65 टक्के सहकार हा एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे. पण, मागील काळात सहकाराची परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील सहकाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेतले जातील, असा विश्वास मंत्री कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल. आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे. त्यामुळे या घोटाळ्यात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर हे सरकार नक्की कारवाई करेल, असेही कदम यांनी सांगितले.

हेही वाचा - आत्महत्या केलेल्या धर्मा पाटलांच्या स्मरणार्थ शेतकरी संघटनेचे सांगलीत आंदोलन

सांगली - राज्यातील सहकाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकाकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील उसाच्या एफआरपीबाबत येत्या 28 जानेवारीला मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विश्वजीत कदम, कृषी व सहकार राज्यमंत्री

हेही वाचा - प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी

राज्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी बुधवारी पहिल्यांदाच सांगलीमध्ये उपस्थिती लावली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री कदम यांनी आढावा बैठक घेतली.

यावेळी कदम म्हणाले, देशातील 65 टक्के सहकार हा एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे. पण, मागील काळात सहकाराची परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील सहकाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेतले जातील, असा विश्वास मंत्री कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल. आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे. त्यामुळे या घोटाळ्यात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर हे सरकार नक्की कारवाई करेल, असेही कदम यांनी सांगितले.

हेही वाचा - आत्महत्या केलेल्या धर्मा पाटलांच्या स्मरणार्थ शेतकरी संघटनेचे सांगलीत आंदोलन

Intro:
File name - mh_sng_02_v_kadam_press_vis_01_7203751 - to - mh_sng_02_v_kadam_press_byt_05_7203751

स्लग - सहकाराला गतवैभव प्राप्त करून देणार,एफआरपीसाठी 28 रोजी मुंबईत बैठक - कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम.

अँकर - राज्यातील सहकाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हे सरकाकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील,असा विश्वास सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील ऊसाच्या एफआरपी बाबत येत्या 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही मंत्री कदम यांनी दिली आहे,सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .Body:राज्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी बुधवारी पहिल्यांदाच सांगलीमध्ये उपस्थिती लावली.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री कदम यांनी आढावा बैठक घेतली.यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मंत्री विश्वजीत कदम यांनी बोलताना राज्यातल्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या सहकार, कृषी यासह 6 खात्याची जबाबदारी राज्यमंत्री म्हणून आपल्यावर सोपवली आहे.आणि देशातील 65 टक्के सहकार हा एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे,पण मागील काळात सहकाराची परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही,त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील सहकाराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेतले जातील, असा विश्वास मंत्री कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच राज्यातील उसाच्या दराच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला आहे,तो सोडण्यासाठी 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि संबंधित खात्याचे मंत्री,अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक पार पडणार असून त्यामध्ये सफारीचा निर्णय घेतला जाईल विश्वजीत कदम यांनी घ्यावी दिले आहेत.

तसेच राज्यातील गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई 100% केली जाईल, आधीचे परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे,त्यामुळे या घोटाळ्यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर हे सरकार नक्की कारवाई करेल असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केला आहे.

त्याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आपली निवड असा आग्रह नव्हता,मात्र या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याची निवड व्हावी,असा आपला आग्रह होता,असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवडीवरून अप्रत्यक्ष नाराजी कदम यांनी व्यक्त केली.तसेच जिल्ह्यातील काँग्रेसला सांगली शहरातून बळकट करण्यासाठी आपला यापुढे प्रयत्न असेल,असा विश्वास मंत्री कदम यांनी व्यक्त केला आहे.

बाईट - विश्वजीत कदम - कृषी व सहकार राज्यमंत्री.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.