ETV Bharat / state

"शरद पवार व अजित पवारांमध्ये बिनसल्याचे लोकसभा निवडणुकीपासूनच जाणवत होत"

author img

By

Published : Nov 23, 2019, 5:34 PM IST

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच शरद पवार व अजित पवार यांच्यामध्ये पटत नसल्याचे सांगून आज ते प्रत्येक्षात दिसून आल्याचे सांगितले.

अण्णासाहेब डांगे

सांगली- पवार कुटुंबामध्ये फूट पडणे हे दुर्दैव म्हणावे लागेल. पण लोकसभा निवडणुकीपासूनच शरद पवार व अजित पवार यांच्यामध्ये पटत नसल्याचे जाणवत होते. जे आज प्रत्यक्षात दिसून आले, असे मत राष्ट्रवादीचे अण्णासाहेब डांगे यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना अण्णासाहेब डांगे


डांगे पुढे म्हणाले, 1995 साली शिवसेना व भाजपमध्ये असेच सरकार स्थापन झाले होते. परंतु, त्यावेळी निर्णय घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असल्याने दोन तीन तास चर्चा करून योग्य निर्णय झाला होता. आता शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे स्वतः निर्णय घेतील की संजय राऊत की आणखीन कोणाची बोलण्यासाठी मदत घेतील हे पहावे लागेल. काँग्रेसमध्येही मोठ्या मतभेदाचे व चर्चेचे वातावरण असून काँग्रेसने हिंदुत्ववाद्यांच्या बरोबर जाऊन सर्वधर्मसमभावचे धोरण सोडल्याने त्यांच्यावर होणाऱ्या टीका पक्षाला सहन कराव्या लागतील.

राजकारणामध्ये काहीही घडू शकते. परंतु, एकमेकांचे आमदार फोडून, आमदारांना आमीष दाखवून स्थापन केलेले सरकार सात ते आठ महिनेही व्यवस्थित चालू शकेल असे वाटत नाही. कारण मंत्री पदांचं वाटप करताना ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जातील. आयाराम व गयारामांमुळे जे वातावरण निर्माण झाले आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. असे ते पुढे बोलताना म्हणाले.

अजित पवार हे विधिमंडळाचे नेते असल्याने त्यांना पदावरून काढण्यासाठी पुन्हा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवावी लागेल आणि उपस्थितांपैकी एकाने त्यांना काढून टाकण्याचा ठराव करावा लागेल. तो बहुमताने पास करूनच त्यांना पदावरून काढता येईल असेही मत अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले.

सांगली- पवार कुटुंबामध्ये फूट पडणे हे दुर्दैव म्हणावे लागेल. पण लोकसभा निवडणुकीपासूनच शरद पवार व अजित पवार यांच्यामध्ये पटत नसल्याचे जाणवत होते. जे आज प्रत्यक्षात दिसून आले, असे मत राष्ट्रवादीचे अण्णासाहेब डांगे यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना अण्णासाहेब डांगे


डांगे पुढे म्हणाले, 1995 साली शिवसेना व भाजपमध्ये असेच सरकार स्थापन झाले होते. परंतु, त्यावेळी निर्णय घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असल्याने दोन तीन तास चर्चा करून योग्य निर्णय झाला होता. आता शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे स्वतः निर्णय घेतील की संजय राऊत की आणखीन कोणाची बोलण्यासाठी मदत घेतील हे पहावे लागेल. काँग्रेसमध्येही मोठ्या मतभेदाचे व चर्चेचे वातावरण असून काँग्रेसने हिंदुत्ववाद्यांच्या बरोबर जाऊन सर्वधर्मसमभावचे धोरण सोडल्याने त्यांच्यावर होणाऱ्या टीका पक्षाला सहन कराव्या लागतील.

राजकारणामध्ये काहीही घडू शकते. परंतु, एकमेकांचे आमदार फोडून, आमदारांना आमीष दाखवून स्थापन केलेले सरकार सात ते आठ महिनेही व्यवस्थित चालू शकेल असे वाटत नाही. कारण मंत्री पदांचं वाटप करताना ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जातील. आयाराम व गयारामांमुळे जे वातावरण निर्माण झाले आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. असे ते पुढे बोलताना म्हणाले.

अजित पवार हे विधिमंडळाचे नेते असल्याने त्यांना पदावरून काढण्यासाठी पुन्हा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवावी लागेल आणि उपस्थितांपैकी एकाने त्यांना काढून टाकण्याचा ठराव करावा लागेल. तो बहुमताने पास करूनच त्यांना पदावरून काढता येईल असेही मत अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले.

Intro:Body:.Conclusion:Slg,, पवार कुटूंबामध्ये फूट पडणे हे दुर्दैव म्हणावे लागेल.पन हे लोकसभा निवडणुकी पासूनच शरद पवार व अजित पवार यांच्या मध्ये पटत नसल्याचे जाणवत होते पण . ते आज प्रत्येक्षात दिसून आले.
अँकर,, 1995साली शिवसेना व भाजप पक्षामध्ये असेच सरकार स्थापन झाले होते परंतु त्यावेळेस निर्णय घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरे. गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन असल्याने दोन तीन तास चर्चा करून योग्य निर्णय झाला होता .
व्हिओ, , आता शिवसेना मध्ये उद्धव ठाकरे स्वतः निर्णय घेतील कि संजय राऊत. कि आणखी कोणाची बोलण्यासाठी मदत घेतील हे पहावे लागेल तर काँग्रेस मध्ये मोठ्या मतभेदाचे व चर्चेचे वातावरण असून काँग्रेस हिंदुत्ववादीच्या बरोबर जाणार का. व सर्वधर्मसमभाव चे धोरण आहे ते सोडल्याने त्याच्यावर होणाऱ्या टीका सहन करावे लागेल. हे बगावे लागेल तर राष्ट्रवादी पक्ष शिवसेना भाजप किंवा अन्य पक्षबरोबर जाऊ शकतो. राजकारणामध्ये काहीही घडू शकते. परंतु हे जे एकमेकाचे आमदार फोडणे. काही आमदारांना अमिश दाखऊन सरकार स्थापन केलेले सरकार सात ते आठ महिने वेवस्तीत चालू शकेल असे वाटत नाही. कारण मंत्री पडे वाटप करताना ज्यांना मंत्री पद मिळाले नाही ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात पुनः एन्ट्री यामुळे अश्या अयाराम व गयारामा मुळे जे वातावरण निर्माण झाले ते महाराष्ट्रामध्ये योग्य नाही. तर अजित पवार हे विधिमंडळाचे नेते असल्याने त्यांना पदावरून काढण्यासाठी पुन्हा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवाविलागेल आणि कोणतरी अजित दादांना काढून टाकण्याचा ठराव करावा लागेल. व तो बहुमतांनी पास करूनच दादांना पदावरूनकाढता येईल. असे मत भाजपचे माजी मंत्री व सध्या राष्ट्रवादी पक्षाचे अण्णासाहेब डांगे यांनी चाललेल्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.