ETV Bharat / state

सांगलीतील पूरस्थिती बनली गंभीर, 2005 च्या महापुराचा रेकॉर्ड तुटला

author img

By

Published : Aug 7, 2019, 12:31 PM IST

Updated : Aug 7, 2019, 3:56 PM IST

सांगलीच्या पाणी पातळीने 2005 च्या महापुराचा रेकॉर्ड तोडला आहे. आता पाण्याची पातळी 54 फुटांच्या पुढे पोहोचली आहे. तर, पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होत असल्याने सांगली शहरातल्या अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरू लागले आहे.

sangli-flood-news-updates-day-three-flood-broke-record-of-2005-flood

सांगली - जिल्ह्यात सध्या महापूराने थैमान घातलेल आहे. वारणा आणि कृष्णाकाठच्या शंभरहून अधिक गावांना महापुराचा विळखा पडलेला आहे. त्यामुळे, नदीकाठच्या 70 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यासोबतच हजारो जनावरांचे देखील स्थलांतर करण्यात आले आहे. पूर परिस्थिती पाहता, या ठिकाणी आता लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे.

सांगलीतील पूरस्थिती बनली गंभीर, 2005 च्या महापुराचा रेकॉर्ड तुटला

सांगलीच्या पाणी पातळीने 2005 च्या महापुराचा रेकॉर्ड तोडला आहे. आता पाण्याची पातळी 54 फुटांच्या पुढे पोहोचली आहे. तर, पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होत असल्याने सांगली शहरातल्या अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरू लागले आहे.

सांगली शहरालासुद्धा या महापुराने वेढा घातला आहे. सांगलीची मुख्य बाजारपेठ तसेच आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे. पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होत असल्याने हे पाणी शहराच्या अनेक भागात आता शिरू लागले आहे.

शंभरहून अधिक गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे, विद्युत पुरवठा तसेच पाणी पुरवठा खंडित झाला आहे. शहरातले त्याचबरोबर ग्रामीण भागातले अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. सांगलीसह पूर भागांमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी महाविद्यालये आणि शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

पुराची पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि लष्कराला पाचारण करण्यात आले असून, एनडीआरएफच्या तीन तुकड्या आणि लष्कराची एक तुकडी याठिकाणी दाखल झाली आहे. नदीकाठी पुरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

सांगली - जिल्ह्यात सध्या महापूराने थैमान घातलेल आहे. वारणा आणि कृष्णाकाठच्या शंभरहून अधिक गावांना महापुराचा विळखा पडलेला आहे. त्यामुळे, नदीकाठच्या 70 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यासोबतच हजारो जनावरांचे देखील स्थलांतर करण्यात आले आहे. पूर परिस्थिती पाहता, या ठिकाणी आता लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे.

सांगलीतील पूरस्थिती बनली गंभीर, 2005 च्या महापुराचा रेकॉर्ड तुटला

सांगलीच्या पाणी पातळीने 2005 च्या महापुराचा रेकॉर्ड तोडला आहे. आता पाण्याची पातळी 54 फुटांच्या पुढे पोहोचली आहे. तर, पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होत असल्याने सांगली शहरातल्या अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरू लागले आहे.

सांगली शहरालासुद्धा या महापुराने वेढा घातला आहे. सांगलीची मुख्य बाजारपेठ तसेच आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे. पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होत असल्याने हे पाणी शहराच्या अनेक भागात आता शिरू लागले आहे.

शंभरहून अधिक गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे, विद्युत पुरवठा तसेच पाणी पुरवठा खंडित झाला आहे. शहरातले त्याचबरोबर ग्रामीण भागातले अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. सांगलीसह पूर भागांमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी महाविद्यालये आणि शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

पुराची पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि लष्कराला पाचारण करण्यात आले असून, एनडीआरएफच्या तीन तुकड्या आणि लष्कराची एक तुकडी याठिकाणी दाखल झाली आहे. नदीकाठी पुरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Intro:सरफराज सनदी

file name - mh_sng_01_sangli_pur_wkt_7203751

स्लग - सांगलीतील पूरस्थिती बनली गंभीर, 80 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर, 2005 च्या महापुराचा तुटला रेकॉर्ड...

अँकर - सांगली जिल्ह्यात सध्या महापूराने थैमान घातलेला आहे वारणा आणि कृष्णाकाठच्या शंभरहून अधिक गावांना महापुराचा विळखा पडलेला आहे,त्यामुळे जवळपास नदीकाठच्या 70 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेला आहे,पूर परिस्थिती पाहता या ठिकाणी आता लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आलेला आहे.सांगलीच्या पाणी पातळीने 2005 च्या महापुराचा रेकॉर्ड तोडलेली आहे,54 फुटांच्या पुढे आता ही पाण्याची पातळी पोहोचली आहे.तर पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होत, असल्याने सांगली शहरातल्या अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरू लागले आहे, याचा आढावा घेतला आहे,ईटीव्ह भारत सांगली प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी


Body:व्ही वो - सांगली जिल्ह्यात वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांना महापूर आलेला आहे.यामुळे नदीकाठची गाव पाण्याखाली गेलेली आहेत.सांगली शहराला सुद्धा या महापुराने वेढला आहे.सांगलीचे मुख्य बाजारपेठ यासह आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे. पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होत असल्याने हे पाणी शहराच्या अनेक भागात आता शिरू लागला आहे. तरी या महापुरामुळे नदीकाठच्या जवळपास 70 हजारांहून अधिक नागरिकांच्या जनावरांच्या सह स्थलांतर करण्यात आलेला आहे .शंभर अधिक गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे विद्युत पुरवठा पाणी पुरवठा खंडित झाला शहरातले त्याचबरोबर ग्रामीण भागातले अनेक मार्ग सुद्धा बंद पडली आहेत वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.सांगली सह पूर भागांमध्ये आज तिसऱ्या दिवशी महाविद्यालय आणि शाळांना सुट्टी देण्यात आल्या आहेत .तर पुराची पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि लष्कराला पाचारण करण्यात आले असून काल सायंकाळी एकूण तीन तुकड्या दाखल झालेल्या आहेत .त्याचबरोबर लष्करी आज सकाळी दाखल झाले आणि नदीकाठी पुरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.तर या महापुरामुळे सांगली शहरातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.जवळपास निम्मी चांगली ही पाण्याखाली गेली आहे स्टेशन चौक, त्याचबरोबर झुलेलाल चौक, एसटी स्टँड ,कोल्हापूर रोड वखारभाग ,हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे.चार ते पाच फुटांपर्यंत याठिकाणी आता पाणी पोहचले आहे. आणि पाणी वाढत असल्याने या ठिकाणाहून नागरिक आता स्वतःहून स्थलांतर करत आहेत.





Conclusion:
Last Updated : Aug 7, 2019, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.