ETV Bharat / state

शेतकऱ्यांनो आता तरी वीज बील भरू नका.. पाटलांचे आवाहन

शेतकऱ्यांनी शेती पंपाची वीज बिले भरू नयेत, असे आवाहन १९९८ मध्ये सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या शेतकरी अधिवेशनात शरद जोशी यांनी केले होते. 'कर, कर्जा नही देंगे, बिजली का बील नही देंगे, अशी घोषणा त्यावेळी देण्यात आली होती.

author img

By

Published : Feb 15, 2020, 10:26 PM IST

Updated : Feb 15, 2020, 11:52 PM IST

patil
'आता तरी शेतकऱ्यांनी वीज बील भरू नये'

सांगली - शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या नावाखाली वीज कंपनीने ३० हजार कोटींची लूट केल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर तरी शेतकऱ्यांनी आता वीज बिल भरू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सांगलीत केले. लुटलेले पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांनो आता तरी वीज बील भरू नका.. पाटलांचे आवाहन

शेती पंपाची वीज बिले वसुली करून वीज कंपनीने राज्यातील शेतकरी आणि सरकारकडून ३० हजार कोटी अधिकचे पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारच्या अहवालातच या बाबी पुढे आल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांनी शेती पंपाची वीज बिले भरू नयेत, असे आवाहन १९९८ मध्ये सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या शेतकरी अधिवेशनात शरद जोशी यांनी केले होते. 'कर, कर्जा नही देंगे, बिजली का बील नही देंगे, अशी घोषणा त्यावेळी देण्यात आली होती. शेतकरी संघटना या भूमिकेवर अजुनही ठाम आहे. शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते, काही शेतकरी गेल्या १० वर्षांपासून ही बिले भरत नाहीत. असे असले तरी बहुतांश शेतकरी हे पैसे भरत आहेत.

हेही वाचा - हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान

काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेती पंप वीज बिल माफ केल्याची घोषणा केली होती. काही काळ त्याची अंमलबजावणीही झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी वीज बिल भरायला सुरुवात केली.

सांगली - शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या नावाखाली वीज कंपनीने ३० हजार कोटींची लूट केल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर तरी शेतकऱ्यांनी आता वीज बिल भरू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सांगलीत केले. लुटलेले पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांनो आता तरी वीज बील भरू नका.. पाटलांचे आवाहन

शेती पंपाची वीज बिले वसुली करून वीज कंपनीने राज्यातील शेतकरी आणि सरकारकडून ३० हजार कोटी अधिकचे पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारच्या अहवालातच या बाबी पुढे आल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांनी शेती पंपाची वीज बिले भरू नयेत, असे आवाहन १९९८ मध्ये सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या शेतकरी अधिवेशनात शरद जोशी यांनी केले होते. 'कर, कर्जा नही देंगे, बिजली का बील नही देंगे, अशी घोषणा त्यावेळी देण्यात आली होती. शेतकरी संघटना या भूमिकेवर अजुनही ठाम आहे. शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते, काही शेतकरी गेल्या १० वर्षांपासून ही बिले भरत नाहीत. असे असले तरी बहुतांश शेतकरी हे पैसे भरत आहेत.

हेही वाचा - हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान

काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेती पंप वीज बिल माफ केल्याची घोषणा केली होती. काही काळ त्याची अंमलबजावणीही झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी वीज बिल भरायला सुरुवात केली.

Last Updated : Feb 15, 2020, 11:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.