ETV Bharat / state

सांगली : पूरग्रस्तांनो घाबरू नका, पूरस्थिती नियंत्रणात - पालकमंत्री

author img

By

Published : Aug 6, 2019, 7:45 AM IST

पुढील दोन दिवसात पुराची स्थिती आणखी गंभीर झाल्यास मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथक देखील दाखल होणार असल्याचे सुभाष देशमुख म्हणाले. तसेच नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील देशमुख यांनी यावेळी केल्या.

पालकमंत्री सुभाष देशमुख

सांगली - जिल्ह्यातील पूरस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. त्यासाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. गरज पडल्यास मदतीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्यात येईल. पूरग्रस्तांनी घाबरू नये, त्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे आहे, असे पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले. देशमुख यांनी सोमवारी पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

सांगलीतील पूरस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात; एनडीआरएफ दाखल होणार - सुभाष देशमुख

सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला आहे. नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा वेढा घातला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. जिल्हा आणि सांगली महापालिका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. त्यांनी यावेळी पलूस तालुक्यातील भिलवडी, आमनापूर, धनगाव यासह सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी परिसरात भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आहे.

पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे जवळपास १३०० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच ४ हजाराहून अधिक जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. नागरिकांची अन्नाची, तर जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासना देण्यात आल्या आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

पुढील दोन दिवसात पुराची स्थिती आणखी गंभीर झाल्यास मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथक देखील दाखल झाली असल्याचे देशमुख म्हणाले. तसेच नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील देशमुख यांनी यावेळी केल्या.

सांगली - जिल्ह्यातील पूरस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. त्यासाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. गरज पडल्यास मदतीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्यात येईल. पूरग्रस्तांनी घाबरू नये, त्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे आहे, असे पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले. देशमुख यांनी सोमवारी पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

सांगलीतील पूरस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात; एनडीआरएफ दाखल होणार - सुभाष देशमुख

सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला आहे. नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा वेढा घातला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. जिल्हा आणि सांगली महापालिका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. त्यांनी यावेळी पलूस तालुक्यातील भिलवडी, आमनापूर, धनगाव यासह सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी परिसरात भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आहे.

पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे जवळपास १३०० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच ४ हजाराहून अधिक जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. नागरिकांची अन्नाची, तर जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासना देण्यात आल्या आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

पुढील दोन दिवसात पुराची स्थिती आणखी गंभीर झाल्यास मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथक देखील दाखल झाली असल्याचे देशमुख म्हणाले. तसेच नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील देशमुख यांनी यावेळी केल्या.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

avb

file name - mh_sng_06_mahapur_palkamantri_pahani_121_7203751

स्लग - पूरस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर - पालकमंत्री सुभाष देशमुख...

अँकर - जिल्ह्यातील पूरस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे,आणि पुरग्रस्तांच्या पाठीशी प्रशासन ठाम आहे,असा विश्वास सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे, तसेच प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे,आणि गरज पडल्यास मदतीसाठी हेलिकॉप्टर सुध्दा उपलब्ध करण्याची सोय करण्यात आली असल्याचं
देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.आज जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची मंत्री देशमुख यांनी पाहणी केली आहे.यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आहे सांगली ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी..



Body:व्ही वो - सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला आहे, नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. तर या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. जिल्हा आणि सांगली महापालिका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. मंत्री देशमुख यांनी यावेळी पलूस तालुक्यातील भिलवडी आमनापूर धनगाव यासह सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी परिसरात भेट देऊन,तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत, पूरग्रस्त नागरिकांशी देशमुख यांनी संवाद साधला आहे.यावेळी सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्णता प्रशासनाच्या नियंत्रणात आहे संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे,त्यामुळे जवळपास तेराशे हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले,तर चार हजाराहून अधिक जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. नागरिकांची अन्नाची तर जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सक्त सूचना प्रशासना देण्यात आल्या आहेत,तसेच पुढील दोन दिवसात पुराची स्थिती आणखी गंभीर बनल्यास मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला,असून
राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथकाची टीमही दाखल होणार असल्याची माहिती देशमुख यांनी सांगत,नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं, आणि या परिस्थितीमध्ये प्रशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे,असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.त्यांच्याशी बातचीत केली आहे,सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी .


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.