सांगली - राज्यात ब्राह्मण विरुध्द ओबीसी असा वाद लावण्याचे षड्यंत्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून करण्यात असल्याचा आरोप आरोप धनगर समाजाचे व भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच भाजपमध्ये बहुजन नेतृत्वाला डावलले जात नाही, उलट संधी दिली जाते. त्यामुळे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची नाराजी ही पक्षांमधील ज्येष्ठ मंडळी बसून दूर करतील, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. ते आज (गुरुवार) सांगलीमध्ये बोलत होते.
राज्यातील भाजपमध्ये ओबीसी व बहुजन नेत्यांना डावलण्यात येत असल्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ खडसे, विनोद पंकज, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे हे नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, ही सर्व जाणीवपूर्वक पासरवलेली अफवा आसल्याचे मत भाजप व धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे. राज्यात याआधी ब्राह्मण विरुद्ध दलित, ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद आणि आता ब्राह्मण विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे षडयंत्र असून सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडून हे करण्यात येत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला.
हेही वाचा - नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी दलित महासंघाने काढला सांगली पालिकेवर 'गाढव मोर्चा'
भाजपमध्ये नेहमी ओबीसी आणि बहुजन समाजातील नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत कधीच पक्षात ओबीसींना डावलण्यात आले नाही, उलट सन्मानाचा करण्यात आला. याउलट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षात ओबीसी नेतृत्वाला मनाचे स्थान देण्यात आले नाही आणि ते कधी दिलेही जाणार नाही अशा शब्दात पडळकर यांनी टीका केली. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या मुलीच्या पराभवाची कारणे पक्ष शोधेल. या पराभवचा आणि नेते मंडळी पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी भाजपमधले आमदार फुटणार नाही, असा देखील दावा केला आहे.
हेही वाचा - ऊस आंदोलनातून शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला, पोलिसांकडून कारवाईला टाळाटाळ