ETV Bharat / state

अवकाळीचा कहर.. सांगली जिल्ह्यातील सुमारे 8 हजारहून अधिक द्राक्षबागा उद्ध्वस्त

author img

By

Published : Dec 3, 2021, 3:04 AM IST

Updated : Dec 3, 2021, 4:14 AM IST

गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः सांगली जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्याचा मोठा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागांना बसला आहे. जवळपास आठ हजार हेक्टरहून अधिक द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे.

grape crops loss in sangli district
द्राक्ष बाग नुकसान सांगली वाळवा

सांगली - गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः सांगली जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्याचा मोठा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागांना बसला आहे. जवळपास आठ हजार हेक्टरहून अधिक द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. यामुळे आधीच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांवर संकटांचे डोंगर कोसळले आहे.

माहिती देताना कृषी अधिकारी आणि शेतकरी

हेही वाचा - Chandrakant Patil : मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं सर्व पक्ष संपवायचं ठरवलंय - भाजप नेते चंद्रकांत पाटील

अवकाळीचा द्राक्षबागांना फटका

जिल्ह्यामध्ये सुमारे 31 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस, द्राक्ष बागायत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसामुळे द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली आहे. सुमारे आठ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. घडकुज, मणीगळ, मणी क्रॅक तसेच, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे, द्राक्षबाग शेतकरी हवालदिल झाला आहे.

एका रात्रीत होत्याचे नव्हते

अवकाळीचा फटका वाळवा तालुक्यातले द्राक्ष उत्पादक शेतकरी आशिष मगदूम यांना मोठा प्रमाणात बसला आहे. एकाच रात्रीत हातातोंडाशी आलेली दीड एकर बाग कोसळली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मगदूम यांची द्राक्ष शेती वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे वाया गेली आहे. या वर्षी त्यांना चांगले उत्पादन येईल, अशी अपेक्षा होती. जवळपास साडेसहा लाख रुपये खर्चून त्यांनी ही बाग उभारली होती. काही दिवसांत ही द्राक्ष विक्रीसाठी उपलब्ध होणार होती, मात्र एकाच रात्रीत 18 टन द्राक्ष उत्पादन अपेक्षित असणाऱ्या मगदूम यांची बाग अवकाळीच्या कहरामुळे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे, वारंवार संकटात सापडलेल्या मगदूम यांनी शासनाला मदतीची याचना केली आहे.

हातातोंडाशी आलेल्या बागा उद्ध्वस्त

गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गुडघाभर पाणी द्राक्ष बागते थांबून आहे. हातातोंडाशी आलेले द्राक्षघड फूटत आहेत. तर, उरल्यासुरल्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, त्यासाठी आता अधिकची औषध फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे, खर्चही अधिक येणार आहे.

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या कृषी विभागाकडून नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भर पावसामध्ये कृषी विभागाचे अधिकारी बाधित शेती आणि बागांची थेट बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांना योग्य औषधांच्या बाबतीत मार्गदर्शन करत पंचनामे देखील करत आहेत.

संकटात शासन मदतीची गरज

गेल्या तीन वर्षांपासून सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटे कोसळत आहेत. अशा परिस्थितीमध्येही इथल्या शेतकऱ्यांनी न डगमगता संकटाला सामोरे जात द्राक्ष शेती केली आहे. मात्र, निसर्गाच्या आणखी एका संकटामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून, वेळीच शासनाच्या मदतीचा हात न मिळाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय ऊरणार नसल्याची भिती व्यक्त होत आहे.

हेही वाचा - मंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर.. वीज बिल, एसटी आंदोलनावरून ठाकरे सरकार इशारा

सांगली - गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः सांगली जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्याचा मोठा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागांना बसला आहे. जवळपास आठ हजार हेक्टरहून अधिक द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. यामुळे आधीच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांवर संकटांचे डोंगर कोसळले आहे.

माहिती देताना कृषी अधिकारी आणि शेतकरी

हेही वाचा - Chandrakant Patil : मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं सर्व पक्ष संपवायचं ठरवलंय - भाजप नेते चंद्रकांत पाटील

अवकाळीचा द्राक्षबागांना फटका

जिल्ह्यामध्ये सुमारे 31 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस, द्राक्ष बागायत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसामुळे द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली आहे. सुमारे आठ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. घडकुज, मणीगळ, मणी क्रॅक तसेच, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे, द्राक्षबाग शेतकरी हवालदिल झाला आहे.

एका रात्रीत होत्याचे नव्हते

अवकाळीचा फटका वाळवा तालुक्यातले द्राक्ष उत्पादक शेतकरी आशिष मगदूम यांना मोठा प्रमाणात बसला आहे. एकाच रात्रीत हातातोंडाशी आलेली दीड एकर बाग कोसळली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मगदूम यांची द्राक्ष शेती वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे वाया गेली आहे. या वर्षी त्यांना चांगले उत्पादन येईल, अशी अपेक्षा होती. जवळपास साडेसहा लाख रुपये खर्चून त्यांनी ही बाग उभारली होती. काही दिवसांत ही द्राक्ष विक्रीसाठी उपलब्ध होणार होती, मात्र एकाच रात्रीत 18 टन द्राक्ष उत्पादन अपेक्षित असणाऱ्या मगदूम यांची बाग अवकाळीच्या कहरामुळे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे, वारंवार संकटात सापडलेल्या मगदूम यांनी शासनाला मदतीची याचना केली आहे.

हातातोंडाशी आलेल्या बागा उद्ध्वस्त

गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गुडघाभर पाणी द्राक्ष बागते थांबून आहे. हातातोंडाशी आलेले द्राक्षघड फूटत आहेत. तर, उरल्यासुरल्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, त्यासाठी आता अधिकची औषध फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे, खर्चही अधिक येणार आहे.

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या कृषी विभागाकडून नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भर पावसामध्ये कृषी विभागाचे अधिकारी बाधित शेती आणि बागांची थेट बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांना योग्य औषधांच्या बाबतीत मार्गदर्शन करत पंचनामे देखील करत आहेत.

संकटात शासन मदतीची गरज

गेल्या तीन वर्षांपासून सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटे कोसळत आहेत. अशा परिस्थितीमध्येही इथल्या शेतकऱ्यांनी न डगमगता संकटाला सामोरे जात द्राक्ष शेती केली आहे. मात्र, निसर्गाच्या आणखी एका संकटामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून, वेळीच शासनाच्या मदतीचा हात न मिळाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय ऊरणार नसल्याची भिती व्यक्त होत आहे.

हेही वाचा - मंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर.. वीज बिल, एसटी आंदोलनावरून ठाकरे सरकार इशारा

Last Updated : Dec 3, 2021, 4:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.