ETV Bharat / state

रत्नागिरीत पाणीबाणी; कळमणी गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागतेय वणवण

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कळमणी गावात सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा पहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ पाण्यासाठी लढत आहेत.

author img

By

Published : Jun 5, 2019, 6:29 PM IST

कळमणी गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागतेय वणवण

रत्नागिरी - जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कळमणी गावात सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा पहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ पाण्यासाठी लढत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी नेहमी निराशाच आली आहे.

गावात १९८० साली नळपाणी योजना आली, मात्र त्या नळाला पाणी कधी आलेच नाही. आज ना उद्या पाणी येईल या आशेने नळासमोर भांड्यांची रांग मात्र वाढताना दिसून येते. पाणी नसल्याने गावातील शेती ओस पडली आहे. उष्णतेमुळे पाणी पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावात प्रत्येकाला पाणी देण्यासाठी प्रशासनसुद्धा हतबल आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कळमणी गावात सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा पहायला मिळत आहेत.

पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागत असून विहिरीत पाणी साठण्याची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे. पाऊस आणखी लांबला तर कळमणी गावाप्रमाणेच आणखी काही गावांचीही अशीच अवस्था होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

रत्नागिरी - जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कळमणी गावात सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा पहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ पाण्यासाठी लढत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी नेहमी निराशाच आली आहे.

गावात १९८० साली नळपाणी योजना आली, मात्र त्या नळाला पाणी कधी आलेच नाही. आज ना उद्या पाणी येईल या आशेने नळासमोर भांड्यांची रांग मात्र वाढताना दिसून येते. पाणी नसल्याने गावातील शेती ओस पडली आहे. उष्णतेमुळे पाणी पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावात प्रत्येकाला पाणी देण्यासाठी प्रशासनसुद्धा हतबल आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कळमणी गावात सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा पहायला मिळत आहेत.

पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागत असून विहिरीत पाणी साठण्याची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे. पाऊस आणखी लांबला तर कळमणी गावाप्रमाणेच आणखी काही गावांचीही अशीच अवस्था होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Intro:कळमणी गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागतेय वणवण

रत्नागिरी, प्रतिनिधी


मराठवाडा विदर्भाप्रमाणे कोकणातही सध्या पाणी टंचाईच्या तीव्र झळा पहायला मिळतायत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कळमणी गावाची अवस्था अशीच काहीशी भयानक झालीय. गेल्या अनेक वर्षापासून इथले ग्रामस्थ पाण्यासाठी लढतात मात्र त्यांच्या पदरी निराशाच आलीय. कळमणी गावच्या गावं पाणी टंचाईनं ग्रासलं आहे.. पाहूया याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट


व्हिओ 1 - कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो,असं असतानाही कोकणातही अनेक गावांमध्ये भिषण पाणी टंचाई जाणवतेय..अनेक गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय...अशीच काहीशी परिस्थिती खेड तालुक्यातल्या कळमणी खुर्द गावात. सह्याद्रीच्या कुशीत आणि नदीकाठी वसलेल्या या गावाची परिस्थिती सध्या भिषण आहे..गावातून दोन नद्या वाहतात. सध्या नदीच पात्र कोड पडलंय. पाण्याचा ठणठणाट आहे. गावातल्या विहीरींनी केंव्हाच तळ गाठलाय. पाणी नसल्यानं अनेकांशी शेती करणचं सोडून दिलय त्यामुळे शकडो एकर जमीनी ओस पडल्यात...पाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतोय..विहीरीत पाणी साठण्याची वाट पहावी लागते आणि पाणी मिळतं तेही गढूळ...गावात 1980 साली नळपाणी योजना आली मात्र त्या नळाला पाणी कधी आलंच नाही. आज ना उद्या पाणी येईल या आशेनं नळासमोर भांड्यांची रांग मात्र वाढताना दिसतेय. पाणी मिळत नाही पाणी नसल्यानं इथली शेती ओस पडलीय गावातील 80 टक्के लोक सध्या मुंबई पुणे सारख्या शहराच्या ठिकाणी स्थिर झालेयत त्यामुळे गावात फक्त बुजुर्ग लोकं जास्त पहायला मिळतायत.

बाईट 1 - विमला जाधव , ग्रामस्थ.

व्हिओ 2- मार्च महीन्यापासून या गावात पाणी टंचाई जाणवू लागते. गावात पाणी भरण्यासाठी प्रत्येक घरातला माणुस इथं संघर्ष करतो. कधी नळावर तर कधी गावच्या विहिरीवर. दरोरोज पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट ठरलेलीच.

बाईट 2- किरण. ग्रामस्थ

व्हिओ 3 - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या कळमणी गावातून नदी वाहते पुर्वी या नदीला भरपूर पाणी असायचं मात्र आता नदीपात्र कोरडं झालंय. नदीपात्रात एक झरा वाहतो..हे साठलेलं पाणी भरण्यासाठी गावक-यांची इथं गर्दी होते.एक हांडा भरण्यासाठी कधी कधी तासन तास काढावे लागतात..गावापासून दोन ते तीन किलोमीटरती पायपीट या पाण्यासाठी करावी लागते..सध्या पाऊस लांबणीवर आहे आणि नंतर हा पाणीसाठी शिल्लक राहीला नाही तर बिकट अवस्था इथल्या ग्रामस्थांवर ओढवेल. असं अअसलं तरी इथल्या ग्रामस्थांना पाणी मिळेल असं सरकारी उत्तर देवून रत्नागिरीच्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
बाईट-३- स्वरुपा साळवी. जिल्हापरिषद अध्यक्ष
व्हिओ-४- यावर्षी पावसाचा अद्याप पत्ता नाहीय.. उष्णतेमुळे पाणी पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावात प्रत्येकाला पाणी देण्यासाठी प्रशासन सुद्धा हतबल आहे. पाऊस आणखी लांबला तर कळमणी गावाप्रमाणेच आणखी काही गावांची अशीच अवस्था होऊ शकते..
Body:कळमणी गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागतेय वणवण Conclusion:कळमणी गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागतेय वणवण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.