ETV Bharat / state

संगमेश्वरमध्ये नदीत बुडून बाप-लेक व पुतण्याचा मृत्यू; एकजण सुदैवाने बचावला

चौघेही डोहात बुडू लागले. काठावर असलेल्या इतर कुटुंबियांना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि लाकडाच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, फक्त प्रसाद काठीच्या सहाय्याने काठावर आला.

author img

By

Published : May 20, 2019, 8:59 PM IST

आंबवली गावात नदीत बुडून तिघांचा मृत्यू

रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या सप्तलिंग नदीतील पाण्यात मुलगा, वडील आणि पुतण्याचा मृत्यू झाला तर, एकजण बुडण्यापासून वाचला आहे.

जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मृतांची नावे आहेत. तर, प्रसाद पांचाळ हा बुडण्यापासून वाचला आहे. मुंबई येथे राहणारे जनार्दन पांचाळ सुट्टीनिमित्त आंबवली येथे आले होते. ते मुंबईत शिक्षक होते. आज (सोमवार) ते आपल्या कुटुंबासह सप्तलिंग नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही डोहात बुडू लागले. काठावर असलेल्या इतर कुटुंबियांना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि लाकडाच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, फक्त प्रसाद काठीच्या सहाय्याने काठावर आला. अन्य तिघेही पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती समजताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर येथील रुग्णालयात पाठवले आहेत.

रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या सप्तलिंग नदीतील पाण्यात मुलगा, वडील आणि पुतण्याचा मृत्यू झाला तर, एकजण बुडण्यापासून वाचला आहे.

जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मृतांची नावे आहेत. तर, प्रसाद पांचाळ हा बुडण्यापासून वाचला आहे. मुंबई येथे राहणारे जनार्दन पांचाळ सुट्टीनिमित्त आंबवली येथे आले होते. ते मुंबईत शिक्षक होते. आज (सोमवार) ते आपल्या कुटुंबासह सप्तलिंग नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही डोहात बुडू लागले. काठावर असलेल्या इतर कुटुंबियांना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि लाकडाच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, फक्त प्रसाद काठीच्या सहाय्याने काठावर आला. अन्य तिघेही पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती समजताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर येथील रुग्णालयात पाठवले आहेत.

Intro:संगमेश्वरमधल्या आंबवलीत नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

रत्नागिरी, प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या सप्तलिंग नदीतीतील डोहात ही दुर्घटना घडली.
मध्ये यामध्ये मुलगा, बाप आणि पुतण्याचा समावेश आहे. सुदैवाने एक जण यातून बचावला. हे चौघेही मुंबईतून गावी आले होते. जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी तिघांची नावे असून प्रसाद पांचाळ सुदैवाने बचावला.
सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने अनेक चाकरमानी गावी आले आहेत.. आंबवली येथील जनार्दन पांचाळ हेही सुट्टीनिमित्त गावी आले होते.. ते मुंबईत शिक्षक होते. आज ते आपल्या कुटुंबासह सप्तलिंग नदीत आंघोळीसाठी गेले होते.. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही डोहात बुडू लागले.. काठावर असलेल्या इतर कुटुंबियांना हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. व लाकडाच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र फक्त प्रसाद काठीच्या सहाय्याने काठावर आला, अन्य तिघेही डोहात बुडाले.. घटनेची माहिती समजताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वरात पाठवण्यात आले.. दरम्यान या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यात दुःखाचं सावट पसरलं असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..Body:संगमेश्वरमधल्या आंबवलीत नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू
Conclusion:संगमेश्वरमधल्या आंबवलीत नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.