ETV Bharat / state

सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा; जनजीवन विस्कळीत

संततधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराने वेढले आहे. अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शहरातील जवाहर चौकापर्यंत पोहचले आहे. पूरस्थितीमुळे शहरासह नदीकाठच्या ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

author img

By

Published : Sep 6, 2019, 12:16 PM IST

सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा

रत्नागिरी - संततधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराने वेढले आहे. अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शहरातील जवाहर चौकापर्यंत पोहचले आहे. पूरस्थितीमुळे शहरासह नदीकाठच्या ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा

चोवीस तासांचा कालावधी उलटला तरी पूरस्थिती जैसे थे आहे. राजापूर शहरातील शिवाजीपथ, मच्छिमार्केट, वरची पेठ परिसर पाण्याखाली गेला आहे. कोंढेतड पुलही पाण्याखाली आहे. या भागातील लोकांना पुलावरून धोका पत्करून शहरात यावे लागत आहे. शहरानजीकचा शीळ,गोठणे आणि दोनीवडे मार्गही पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे या गावांकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

रत्नागिरी - संततधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराने वेढले आहे. अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शहरातील जवाहर चौकापर्यंत पोहचले आहे. पूरस्थितीमुळे शहरासह नदीकाठच्या ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा

चोवीस तासांचा कालावधी उलटला तरी पूरस्थिती जैसे थे आहे. राजापूर शहरातील शिवाजीपथ, मच्छिमार्केट, वरची पेठ परिसर पाण्याखाली गेला आहे. कोंढेतड पुलही पाण्याखाली आहे. या भागातील लोकांना पुलावरून धोका पत्करून शहरात यावे लागत आहे. शहरानजीकचा शीळ,गोठणे आणि दोनीवडे मार्गही पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे या गावांकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Intro:सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा
जनजीवन विस्कळीत


रत्नागिरी, प्रतिनिधी

संततधार पावसामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा पडला आहे. अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने शहरातील जवाहरचौकामध्ये काल धडक दिली. त्याला चोवीस तासाचा कालावधी उलटला तरी, जवाहरचौकातील पूरस्थिती जैसे थे राहिले आहे. या पूरस्थितीने शहरासह ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐन गणेशोत्सवात पुराच्या आलेल्या विघ्नाने सारेच चिंताक्रांत झाले आहेत.
संततधार पावसामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. जवाहर चौकात धडक दिलेल्या नद्यांच्या पुराच्या पाण्याने काल दुपारी राजापूर शहराला वेढा घातला. त्याला सुमारे चोवीस तासाचा कालावधी उलटला तरी पुराच्या पाण्याची स्थिती जैसे थे राहिली आहे. राजापूर शहरातील शिवाजीपथ रस्ता, मच्छिमार्केट परिसर, वरचीपेठ परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे. कोंढेतड पुलालाही पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने कोंढेतड परिसरातील लोकांचा काहीसा संपर्क तुटला आहे. या भागातील लोकांना पुलावरून शहरामध्ये येण्यासाठी धोका पत्करून पुराच्या पाण्यातून यावे लागत आहे. शिवाजी पथ रस्ता येथील दुकाने आणि जवाहर चौकातील टपऱ्यासह दुकाने कालपासून आज दिवसभर कुलूपबंद होती. शहरानजीकच्या शीळ गोठणेदोनीवडे मार्गही पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामूळे या गावांकडे जाणारी वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यातून गावांचा संपर्क तुटला आहे. एकंदरीत, सलग दुसऱ्या दिवशीच्या पूरस्थितीमुळे शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.Body:सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा
जनजीवन विस्कळीत
Conclusion:सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा
जनजीवन विस्कळीत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.