रत्नागिरी - काठमांडू येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार आणि ऐश्वर्या सावंत या खेळाडूंची भारतीय खो-खो संघात निवड झाली आहे.
हेही वाचा - आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप : ज्योती-अभिषेकने रचला इतिहास, पटकावले सुवर्णपदक
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा १ ते ५ डिसेंबर २०१९ या कालावधीत काठमांडू येथे होत आहेत. दिल्ली येथे आज भारतीय खो-खो संघाची निवड झाली. या भारतीय संघात रत्नागिरीच्या २ खेळाडूंनी स्थान पटकावले आहे.
ऐश्वर्या सावंतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. २ वर्षांपूर्वी झालेल्या आशियायी खो-खो स्पर्धेत तिचा भारतीय संघात समावेश झाला होता. छत्रपती पुरस्कारप्राप्त ऐश्वर्याला भारतातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा 'राणी लक्ष्मी' पुरस्कार मिळाला आहे. तर अपेक्षाला भारतातील सर्वोत्कृष्ट ज्युनियर महिला खेळाडूचा 'जानकी' पुरस्कार मिळाला आहे.