ETV Bharat / state

कोकण किनारपट्टीवर लाटांचे तांडव; अजस्त्र लाटांमुळे मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड

साडेचार मीटर उंचीच्या अजस्त्र लाटांनी मिऱ्या इथल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडले आहे. मोठ्या लाटा असल्याने मिऱ्या आलावा आणि पंधरामाड परिसरातले नागरिक भयभीत झालेत.

author img

By

Published : Jul 1, 2019, 1:34 PM IST

कोकण किनारपट्टीवर लाटांचे तांडव

रत्नागिरी - पावसाळा सुरू होताच समुद्रात मोठे उधाण आले. या उधाणामुळे लाटांचे रौद्र रुप कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळत आहे. मंगळवारी अमावास्या असल्याने समुद्राचे आणखीच मोठे रौद्र रूप पाहायला मिळणार आहे.

आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली. मात्र समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. आलावा ते पंधरामाड या गावांची समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप थांबवण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधला गेला आहे. मात्र, या आजस्त्र लाटांमुळे या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड वाढले तर समुद्राच्या लाटा मानवी वस्तीत घुसू शकतात.

कोकण किनारपट्टीवर लाटांचे तांडव

दरवर्षी हा बंधारा अजस्त्र लाटांमुळे फुटतो. यावर्षी साडेचार मीटर उंचीच्या अजस्त्र लाटांनी मिऱ्या इथल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडले आहे. मोठ्या लाटा असल्याने मिऱ्या आलावा आणि पंधरामाड परिसरातले नागरिक भयभीत झालेत. तर नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान किनाऱ्यावरच्या उधाणाचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

रत्नागिरी - पावसाळा सुरू होताच समुद्रात मोठे उधाण आले. या उधाणामुळे लाटांचे रौद्र रुप कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळत आहे. मंगळवारी अमावास्या असल्याने समुद्राचे आणखीच मोठे रौद्र रूप पाहायला मिळणार आहे.

आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली. मात्र समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. आलावा ते पंधरामाड या गावांची समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप थांबवण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधला गेला आहे. मात्र, या आजस्त्र लाटांमुळे या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड वाढले तर समुद्राच्या लाटा मानवी वस्तीत घुसू शकतात.

कोकण किनारपट्टीवर लाटांचे तांडव

दरवर्षी हा बंधारा अजस्त्र लाटांमुळे फुटतो. यावर्षी साडेचार मीटर उंचीच्या अजस्त्र लाटांनी मिऱ्या इथल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडले आहे. मोठ्या लाटा असल्याने मिऱ्या आलावा आणि पंधरामाड परिसरातले नागरिक भयभीत झालेत. तर नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान किनाऱ्यावरच्या उधाणाचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

Intro:किनारपट्टीवर लाटांचं तांडव
अजस्त्र लाटांमुळे मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड

रत्नागिरी, प्रतिनिधी

आज समुद्राला मोठं उधाण आलेलं पहायला मिळालं. उधाणामुळे लाटांचं रौद्र रुप कोकण किनारपट्टीवर पहायला मिळत आहे. उद्या आमावास्या आहे. त्यामुळे समुद्राचं आणखी रौद्र रूप पहायला मिळणार आहे.
आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलीय. मात्र समुद्रात उंचच उचं लाटा उसळताना पहायला मिळत आहेत. आलावा ते पंधरामाड या गावांची समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप थांबवण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधला गेलाय. मात्र या आजस्त्र लाटांमुळे या बंधाऱ्याला मोठं भगदाड पडलं आहे. हे भगदाड वाढलं तर समुद्राच्या लाटा मानवी वस्तीत घुसु शकतात. दरवर्षी हा बंधारा अजस्त्र लाटांमुळे फुटतो. यावर्षी साडेचार मिटर उंचीच्या अजस्त्र लाटांनी मिऱ्या इथल्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडलं आहे. मोठ्या लाट असल्यानं मिऱ्या आलावा आणि पंधरामाड परिसरातले नागरिक भयभीत झालेत. पण नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान किनाऱ्यावरच्या उधाणाचा आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..Body:किनारपट्टीवर लाटांचं तांडव
अजस्त्र लाटांमुळे मिऱ्या बंधाऱ्याला भगदाडConclusion:किनारपट्टीवर लाटांचं तांडव
अजस्त्र लाटांमुळे मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.