रत्नागिरी - प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही हॉटेल सुरू ठेऊन, प्रवाशांना टेबल सर्व्हिस दिल्याप्रकरणी निवळी (ता. रत्नागिरी) येथील हॉटेल वृंदावनवर तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्यात आले.
कोरोना नियमांचे उल्लंघन; निवळीतील हॉटेल वृंदावनला जिल्हा प्रशासनाने ठोकले टाळे
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टांरंट यांना सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करुन फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसून जेवण्यास मनाई आहे. तरीही नियम डावलून हॉटेल सुरू ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
हॉटेल वृंदावनला जिल्हा प्रशासनाने ठोकले टाळे
रत्नागिरी - प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही हॉटेल सुरू ठेऊन, प्रवाशांना टेबल सर्व्हिस दिल्याप्रकरणी निवळी (ता. रत्नागिरी) येथील हॉटेल वृंदावनवर तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्यात आले.