ETV Bharat / state

धान्य वाहतूक करणारा ट्रक डोंगरावर आदळला, चालकाचा जागीच मृत्यू

धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आज रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.

author img

By

Published : May 5, 2021, 12:51 AM IST

truck  accident at Nivli
truck accident at Nivli

रत्नागिरी - धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आज रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक श्रीराम शशिकांत प्रसादे (५२, रा. देवरूख ) यांचा जागीच मृत्यू झाला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ट्रक चालक श्रीराम शशिकांत प्रसादे हे ट्रक क्रमांक (एमएच ०४, ईवाय ९२०३) घेऊन निवळी येथील मासेबाव गोडावूनमधील धान्य घेऊन संगमेश्वरकडे जात होते. निवळी येथील दत्तमंदिर येथील वळणावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडीवर नियंत्रण मिळवता न आल्याने गाडी समोरील डोंगरावर जाऊन आदळली. या अपघातात ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रत्नागिरी - धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आज रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक श्रीराम शशिकांत प्रसादे (५२, रा. देवरूख ) यांचा जागीच मृत्यू झाला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ट्रक चालक श्रीराम शशिकांत प्रसादे हे ट्रक क्रमांक (एमएच ०४, ईवाय ९२०३) घेऊन निवळी येथील मासेबाव गोडावूनमधील धान्य घेऊन संगमेश्वरकडे जात होते. निवळी येथील दत्तमंदिर येथील वळणावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडीवर नियंत्रण मिळवता न आल्याने गाडी समोरील डोंगरावर जाऊन आदळली. या अपघातात ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.