ETV Bharat / state

विहिरीत पडलेल्या बिबट्याची 12 तासानंतर सुखरूप सुटका

विहिरीत पडलेल्या बिबट्याला १२ तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे.

author img

By

Published : Dec 30, 2019, 10:00 AM IST

ratnagiri
बिबट्याची 12 तासानंतर सुखरूप सुटका

रत्नागिरी - विहिरीत पडलेल्या बिबट्याला १२ तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. राजापूर तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडीत ही घटना घडली आहे.

बिबट्याची 12 तासानंतर सुखरूप सुटका

आत्माराम बेंद्रे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या ५० फूट खोल विहिरीत पडला आणि जोरजोरात ओरडू लागला. ग्रामस्थांनी बिबट्याचा आवाज ऐकून विहिरीत डोकावून पाहिले तर बिबट्या विहिरीत पडलेला आढळला. वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच तातडीने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

हेही वाचा - रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक : मतदानासाठी मतदारांचा प्रचंड निरुत्साह; फक्त 47.38 टक्के मतदान

वन विभागाने प्रथम फळीचा तराफा खाली विहिरीत सोडला. बिबट्या त्या तराफ्यावर बसला होता. रात्र असल्याने त्याला बाहेर काढणे कठीण होते. अखेर सकाळी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. बिबट्याची तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

हेही वाचा - 'फडणवीस सरकारच्या काळातील कर्जमाफीची चौकशी करावीच'

रत्नागिरी - विहिरीत पडलेल्या बिबट्याला १२ तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. राजापूर तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडीत ही घटना घडली आहे.

बिबट्याची 12 तासानंतर सुखरूप सुटका

आत्माराम बेंद्रे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या ५० फूट खोल विहिरीत पडला आणि जोरजोरात ओरडू लागला. ग्रामस्थांनी बिबट्याचा आवाज ऐकून विहिरीत डोकावून पाहिले तर बिबट्या विहिरीत पडलेला आढळला. वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच तातडीने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

हेही वाचा - रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक : मतदानासाठी मतदारांचा प्रचंड निरुत्साह; फक्त 47.38 टक्के मतदान

वन विभागाने प्रथम फळीचा तराफा खाली विहिरीत सोडला. बिबट्या त्या तराफ्यावर बसला होता. रात्र असल्याने त्याला बाहेर काढणे कठीण होते. अखेर सकाळी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. बिबट्याची तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

हेही वाचा - 'फडणवीस सरकारच्या काळातील कर्जमाफीची चौकशी करावीच'

Intro:विहिरीत पडलेल्या बिबट्याची 12 तासानंतर सुखरूप सुटका

रत्नागिरी, प्रतिनिधी

विहरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वन विभागाला यश आलं आहे. राजापूर तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडीतील हि घटना घडली आहे. आत्माराम बेंद्रे यांच्या शेत विहिरीत रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या 50 फूट खोल विहिरीत पडला व तो जोरजोरात ओरडू लागला. त्यामुळे ग्रामस्थांनी या बिबट्याचा आवाज एकून विहिरीत डोकावून पाहिलं तर बिबट्या विहिरीत पडलेला होता. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच तातडीने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वन विभागाने प्रथम फळीचा तारपा खाली विहित सोडला. बिबट्या त्या तारप्यावर बसला होता. रात्र असल्याने त्याला बाहेर काढणं कठीण होतं. अखेर सकाळी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं. तब्बल १२ तासानंतर बिबट्याची वनविभागाने सुटका केली. बिबट्याची तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.
Body:विहिरीत पडलेल्या बिबट्याची 12 तासानंतर सुखरूप सुटकाConclusion:विहिरीत पडलेल्या बिबट्याची 12 तासानंतर सुखरूप सुटका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.