ETV Bharat / state

रत्नागिरी कोरोना अपडेट : १२ कोरोनाबाधितांची भर.. रुग्णसंख्या पोहोचली 208 वर - ratnagiri corona patient

रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी रात्री त्यामध्ये आणखी 12 जणांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या 208 वर पोहोचली आहे.

civil hospital, ratnagiri
जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी
author img

By

Published : May 29, 2020, 2:01 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात महिनाभरापूर्वी शून्यावर आलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता दोनशेच्या पलीकडे गेली आहे. जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्याने कोरोनाबाधितांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 208 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी रात्री त्यामध्ये आणखी 12 जणांची भर पडली. नव्याने सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये संगमेश्वर तालुक्यात चार जण आहेत. त्यातील तिघेजण मेगी गावातील आहेत. तर चिपळूण तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह आहेत. हे दोघेही वाघिवरे गावांमधील रहिवासी आहेत. तर दापोली आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा - दिलासादायक बातमी..! एका महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी घेऊ शकणारी लॅब लवकरच सेवेत

जिल्ह्यात आजपर्यंत 83 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 1 मेपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे फक्त 6 रुग्ण होते. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. तर 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. मात्र, 2 मेपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली.

गेल्या 28 दिवसांत 202 रुग्ण नव्याने सापडले आहेत. यामध्ये बाहेरून आलेल्या रुग्णांची संख्या 80 टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यात महिनाभरापूर्वी शून्यावर आलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता दोनशेच्या पलीकडे गेली आहे. जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्याने कोरोनाबाधितांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 208 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी रात्री त्यामध्ये आणखी 12 जणांची भर पडली. नव्याने सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये संगमेश्वर तालुक्यात चार जण आहेत. त्यातील तिघेजण मेगी गावातील आहेत. तर चिपळूण तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह आहेत. हे दोघेही वाघिवरे गावांमधील रहिवासी आहेत. तर दापोली आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा - दिलासादायक बातमी..! एका महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी घेऊ शकणारी लॅब लवकरच सेवेत

जिल्ह्यात आजपर्यंत 83 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 1 मेपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे फक्त 6 रुग्ण होते. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. तर 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. मात्र, 2 मेपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली.

गेल्या 28 दिवसांत 202 रुग्ण नव्याने सापडले आहेत. यामध्ये बाहेरून आलेल्या रुग्णांची संख्या 80 टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.