ETV Bharat / state

'मास्कच सध्या एकमेव लस.. रत्नागिरीतही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मदत करणार'

author img

By

Published : Oct 18, 2020, 7:15 PM IST

रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अफेरेसीस युनिटचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी रत्नागिरीला वैद्यकीय महाविद्यालय सुरू कऱण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच कोरोनावर मास्कच सध्या एकमेव लस असल्याचे ते म्हणाले.

cm on college
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी - जिल्ह्यात देखील वैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता देणार असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अफेरेसीस युनिटचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी ऑनलाईन उद्घाटन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. तसेच कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही. यासाठी (MAH)अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी शपथ सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

रत्नागिरीतही वैद्यकीय महाविद्यालय
रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अफेरेसीस युनिट उपलब्ध असलेला रत्नागिरी हा राज्यातील पाहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमास मुंबईतून पालकमंत्री ॲङ अनिल परब, जालन्यातून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रत्नागिरीतून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबतच खासदार विनायक राऊत दिल्ली येथून सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहण बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.शासन देणारच आहेमाझ्याकडे कौतुकाचे अभिनंदनाचे शब्द कानावर येतात, त्यावेळी त्यामागे आपली काहीतर मागणी असते. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यासाठी सर्व अटींची पूर्तता करा. रायगड आणि सिंधुदुर्गात दिले तसेच वैद्यकीय महाविद्यालय तुम्हालाही देवू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोकणला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही, पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही प्राथमिकता आहे. कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की याच पध्दतीने आगामी काळात जाणीव जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क असा सवाल करत सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अफेरेसीस युनिटचा इतर रोगांमध्येही फायदा

प्लाझमा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे 1 ते 2 लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी असे आरोग्यमंत्री टोपे याप्रसंगी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यत पोहोचून आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली याबद्दल त्यांनी अभिनंदन देखील टोपे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. तसेच याबाबत उद्घाटनानंतर ित्रफित दाखविण्यात आली.

रत्नागिरी - जिल्ह्यात देखील वैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता देणार असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अफेरेसीस युनिटचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी ऑनलाईन उद्घाटन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. तसेच कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही. यासाठी (MAH)अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी शपथ सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

रत्नागिरीतही वैद्यकीय महाविद्यालय
रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अफेरेसीस युनिट उपलब्ध असलेला रत्नागिरी हा राज्यातील पाहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमास मुंबईतून पालकमंत्री ॲङ अनिल परब, जालन्यातून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रत्नागिरीतून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबतच खासदार विनायक राऊत दिल्ली येथून सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहण बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.शासन देणारच आहेमाझ्याकडे कौतुकाचे अभिनंदनाचे शब्द कानावर येतात, त्यावेळी त्यामागे आपली काहीतर मागणी असते. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यासाठी सर्व अटींची पूर्तता करा. रायगड आणि सिंधुदुर्गात दिले तसेच वैद्यकीय महाविद्यालय तुम्हालाही देवू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोकणला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही, पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही प्राथमिकता आहे. कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की याच पध्दतीने आगामी काळात जाणीव जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क असा सवाल करत सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अफेरेसीस युनिटचा इतर रोगांमध्येही फायदा

प्लाझमा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे 1 ते 2 लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी असे आरोग्यमंत्री टोपे याप्रसंगी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यत पोहोचून आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली याबद्दल त्यांनी अभिनंदन देखील टोपे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. तसेच याबाबत उद्घाटनानंतर ित्रफित दाखविण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.