ETV Bharat / state

जिवलग चार मित्र जेवणाच्या निमित्ताने गेले... अन् काळाने घाला घातला...

सुनिल पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर (तिघेही पोफळी) आणि सुमित निकम (कोंडफणसवणे), अशी या चार मित्रांची नावे आहेत. तिवरे आणि पोफळीतील अंतर फक्त ३० किलोमिटर इतके आहे.

author img

By

Published : Jul 4, 2019, 1:43 PM IST

जिवलग चार मित्र जेवणाच्या निमित्ताने गेले... अन् काळाने घाला घातला...

रत्नागिरी - चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आणि हाहाकार माजला. मात्र, यात बऱ्याचजणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये पोफळी आणि कोडफणसवणेतील ४ जिवलग मित्रांवरही काळाने घाला घातला. तिवरेगावात मित्राकडे जेवणाच्या निमित्ताने हे चारहीजण गेले होते. नियतीचा फेरा कसा चुकत नाही आणि घडणारं घडतंच. हे ४ मित्रांच्या उदाहरणातून पाहायला मिळते.

तिवरे दुर्घटना

सुनिल पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर (तिघेही पोफळी) आणि सुमित निकम (कोंडफणसवणे), अशी या चार मित्रांची नावे आहेत. तिवरे आणि पोफळीतील अंतर फक्त ३० किलोमीटर इतके आहे. सुनिल पवार याचा मित्र चव्हाण याच्या तिवरे येथील घरी जेवणाच्या निमित्ताने सुनिल पवार, रंजित, राकेश आणि सुमित हे चौघेही गेले होते. त्यांच घर तिवरे धरणाला लागूनच होतं. या चौघांपैकी रणजित काजवे यांचा शोध अद्याप लागला नाही. त्यांचे कुटुंबीय त्याच्या परतण्याची वाट पाहत आहे.

सुनिल, रणजीत, राकेश हे तीघे मोलमजुरीकरून आपला उदरनिर्वाह करत होते. सुनिल पवार हा अविवाहित होता. त्यांना चार भाऊ आहेत. एकत्र कुटुंबात ते राहत होते. त्याच्या जाण्याने पवार कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. सुनिलचा भाऊ संजय रुग्णालयात आपला भाऊ गेला, यावर विश्वास ठेवायला तयार नाही. पोफळी गावातील एकाच वाडीतील हे चौघे मित्र या दुर्देवी घटनेत गेले याचे दुख त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या वाडीतल्या अनेकांना सलत आहे. त्यामुळे अनेक मित्र सखे सोयरे त्यांच्या आठवणीने रडतायत. अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटतोय.

रत्नागिरी - चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आणि हाहाकार माजला. मात्र, यात बऱ्याचजणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये पोफळी आणि कोडफणसवणेतील ४ जिवलग मित्रांवरही काळाने घाला घातला. तिवरेगावात मित्राकडे जेवणाच्या निमित्ताने हे चारहीजण गेले होते. नियतीचा फेरा कसा चुकत नाही आणि घडणारं घडतंच. हे ४ मित्रांच्या उदाहरणातून पाहायला मिळते.

तिवरे दुर्घटना

सुनिल पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर (तिघेही पोफळी) आणि सुमित निकम (कोंडफणसवणे), अशी या चार मित्रांची नावे आहेत. तिवरे आणि पोफळीतील अंतर फक्त ३० किलोमीटर इतके आहे. सुनिल पवार याचा मित्र चव्हाण याच्या तिवरे येथील घरी जेवणाच्या निमित्ताने सुनिल पवार, रंजित, राकेश आणि सुमित हे चौघेही गेले होते. त्यांच घर तिवरे धरणाला लागूनच होतं. या चौघांपैकी रणजित काजवे यांचा शोध अद्याप लागला नाही. त्यांचे कुटुंबीय त्याच्या परतण्याची वाट पाहत आहे.

सुनिल, रणजीत, राकेश हे तीघे मोलमजुरीकरून आपला उदरनिर्वाह करत होते. सुनिल पवार हा अविवाहित होता. त्यांना चार भाऊ आहेत. एकत्र कुटुंबात ते राहत होते. त्याच्या जाण्याने पवार कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. सुनिलचा भाऊ संजय रुग्णालयात आपला भाऊ गेला, यावर विश्वास ठेवायला तयार नाही. पोफळी गावातील एकाच वाडीतील हे चौघे मित्र या दुर्देवी घटनेत गेले याचे दुख त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या वाडीतल्या अनेकांना सलत आहे. त्यामुळे अनेक मित्र सखे सोयरे त्यांच्या आठवणीने रडतायत. अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटतोय.

Intro:(व्हिडिओ व्हाट्सआप नंबर वर टाकत आहे)

जिवलग चार मित्र जेवणाच्या निमित्ताने गेले... आणि काळाने घाला घातला..

रत्नागिरी, प्रतिनिधी


चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आणि हाहाकार माजला. मात्र यात अनेकांवर काळाने घाला घातला. पण यातून जिवगल मित्र असणारे पोफळी आणि कोडफणसवणेतील चार जिवलग मित्र सुद्धा सुटले नाहीत. तिवरेगावातील मित्राकडे जेवणाच्या निमित्ताने हे तिथं गेले आणि या धरणाच्या पाण्यात या सर्वांना काळाच्यापडद्या आड नेलं. नियतीचा फेरा कसा चुकत नाही आणि घडणारं घडतंच हे चार मित्रांच्या उदाहरणातून पहायला मिळतं..

व्हिओ-१- सुनिल पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर (तिघेही पोफळी) आणि सुमित निकम (कोंडफणसवणे)... तिवरे धरण फुटलं आणि या काळाच्या घाल्यात हे चार जण काळाच्या पडद्याआड गेले. नियती एखाद्याला आपल्या कवेत कसं घेते याचं हे उदाहरण...तिवरे आणि पोफळी ३० किलोमिटरचे अंतर...पण सुनिल पवार याचा मित्र चव्हाण याच्या तिवरे इथल्या घरी जेवणाच्या निमित्ताने सुनिल पवार, रंजित, राकेश आणि सुमित हे चौघे या तिवरे धरणाला लागून असलेल्या घरी गेले. मात्र हेच जेवण त्यांचा काळ बनून वाट पहात होते.

बाईट-१- काजवे यांचा सख्खा भाऊ

व्हिओ-२- सुनिल, रंजित, राकेश हे तीघे मोलमजुरीकरून आपलं पोट भरत होते. सुनिल पवार हा अविवाहित होता. मात्र त्याच्या जाण्याने पवार कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय. सुनिलचा भाऊ संजय रुग्णालयात आपला भाऊ गेला यावर विश्वास ठेवायला तयार नाही. पोफळी गावातील एकाच वाडीतील हे चौघे मित्र या दुदैवी घटनेत गेले याचं दुख त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या वाडीतल्या अनेकांना सलतय. त्यामुळे अनेक मित्र सखे सोयरे त्यांच्या आठवणीने रडतायत. अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटतोय.

बाईट-२- विलास सावंत. सुनिलचे शेजारी

व्हिओ-३- सुनिल पवार यांना चार भाऊ, एकत्र कुटुंबात सुनिल रहात होता. तिवरेतल्या धरणाच्या बाजूला लागून असलेल्या मित्राच्या घरी जेवणाच्या निमित्ताने गेलेले हे चौघे मित्र आज नियतीने ओढून नेले. दुर्दैव काय असतं ते याहून वेगळं उदाहरण तिवरे गावातील या घटनेनं पुढे आलं.
Body:जिवलग चार मित्र जेवणाच्या निमित्ताने गेले... आणि काळाने घाला घातला..Conclusion:जिवलग चार मित्र जेवणाच्या निमित्ताने गेले... आणि काळाने घाला घातला..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.