रत्नागिरी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ध्वज दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक हजार एकशे अकरा फुटांच्या तिरंगा ध्वजासह शहरातून रॅली काढण्यात आली. शाळा-कॉलेजमधील शेकडो मुलांनी या रॅलीत सहभाग नोंदवला.
हेही वाचा - सामाजिक न्याय भवनात ध्वजदिन निधी कार्यक्रमाचे आयोजन; निधी संकलनाचा शनिवार पासून शुभारंभ
गोगटे जोगळेकर कॉलेजच्या प्रांगणातून या तिरंगा रॅलीला सुरवात झाली होती. मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या हेतूने हा अनोखा उपक्रम राबवला गेला. अशा पद्धतीने तिरंगा रॅली कोकणात पहिल्यांदाच काढली गेली आहे.