ETV Bharat / state

रायगड : राज्य शिक्षक परिषदेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन

author img

By

Published : Sep 8, 2020, 4:42 PM IST

Updated : Sep 8, 2020, 7:29 PM IST

विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदन देताना
निवेदन देताना

रायगड - शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अंतर्गत रायगड जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

बोलताना राजेश सुर्वे
शिक्षकांच्या काही मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासाठी शिक्षक परिषदेकडून आंदोलन, मोर्चे काढण्यात आले होते. मात्र, अद्यापही शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनाने पूर्ण केलेल्या नाहीत. यासाठी आज (दि. 8 सप्टें.) राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन शिक्षक परिषदेकडून देण्यात आले. अलिबाग येथे जिल्हाधिकाऱ्यांना रायगड शाखेमार्फत निवेदन दिले. राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष राजेंद्र नाईक, कार्यवाह विजय पवार, संघटन मंत्री वैभव कांबळे, संचालक देवानंद गांगर आदी उपस्थित होते.1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेल्यांना 10 लाख विशेष आर्थिक मदत द्या, 10 वर्षांची अट शिथिल करा, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित योजना लागू करा, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख पदे सेवा जेष्ठतेने भरा, कॅशलेस विमा योजना लागू करा, शाळांची वीजबिले शासनाने भरावी, कोविड 19 मध्ये कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख विमा संरक्षण मिळावे, जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या विनंती बदल्या ऑनलाइन पद्धतीने कराव्यात, अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

रायगड - शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अंतर्गत रायगड जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

बोलताना राजेश सुर्वे
शिक्षकांच्या काही मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासाठी शिक्षक परिषदेकडून आंदोलन, मोर्चे काढण्यात आले होते. मात्र, अद्यापही शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनाने पूर्ण केलेल्या नाहीत. यासाठी आज (दि. 8 सप्टें.) राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन शिक्षक परिषदेकडून देण्यात आले. अलिबाग येथे जिल्हाधिकाऱ्यांना रायगड शाखेमार्फत निवेदन दिले. राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष राजेंद्र नाईक, कार्यवाह विजय पवार, संघटन मंत्री वैभव कांबळे, संचालक देवानंद गांगर आदी उपस्थित होते.1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेल्यांना 10 लाख विशेष आर्थिक मदत द्या, 10 वर्षांची अट शिथिल करा, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित योजना लागू करा, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख पदे सेवा जेष्ठतेने भरा, कॅशलेस विमा योजना लागू करा, शाळांची वीजबिले शासनाने भरावी, कोविड 19 मध्ये कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख विमा संरक्षण मिळावे, जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या विनंती बदल्या ऑनलाइन पद्धतीने कराव्यात, अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
Last Updated : Sep 8, 2020, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.