ETV Bharat / state

ऐन पावसाळ्यात पनवेलकरांची पाण्यासाठी वणवण, भाजप नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

पनवेलकरांना सिडको प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

author img

By

Published : Jul 30, 2019, 9:15 PM IST

भाजप नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना विचारला जाब

पनवेल - दुष्काळाच्या झळा संपून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. मात्र, तरीही पनवेलकरांना सिडको प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे पनवेलकरांच्या घरात पाणी शिरले आहे. तर, दुसरीकडे नवीन पनवेलकरांचा घसा कोरडा आहे. या ठिकाणी पाणीटंचाई होत असल्यामुळे भाजप नगरसेवकांनी सिडको कार्यालयातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

भाजप नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना विचारला जाब

या ठिकाणी नवीन पनवेल नोडला 9 हजार ग्राहक आहेत. येथे 42 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 25 ते 28 एमएलडी इतकेच पाणी सिडकोला मिळते. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या 6 दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वायाळ येथील उपसा केंद्रावर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे त्याचा परिणाम नागरी वसाहतीतील पाणी पुरवठ्यावर झाला.

त्याबरोबरच पंप बिघडल्याने अडचणीत आणखीच भर पडली. त्यामुळे पाणीपुरवठा हा 19 एमएलडीवर आला. परिणामी सेक्टर 13, 14, 17, 18 या ठिकाणी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

त्यामुळे पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी सिडको कार्यालय गाठले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेवटी येत्या ७ दिवसात पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यलयाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे.

यावेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, ड प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कंडपीळे, नगरसेवक नितीन पाटील, मनोज भुजबळ, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, दर्शना भोईर, चारुशीला घरत, अजय बहिरा, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पनवेल - दुष्काळाच्या झळा संपून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. मात्र, तरीही पनवेलकरांना सिडको प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे पनवेलकरांच्या घरात पाणी शिरले आहे. तर, दुसरीकडे नवीन पनवेलकरांचा घसा कोरडा आहे. या ठिकाणी पाणीटंचाई होत असल्यामुळे भाजप नगरसेवकांनी सिडको कार्यालयातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

भाजप नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना विचारला जाब

या ठिकाणी नवीन पनवेल नोडला 9 हजार ग्राहक आहेत. येथे 42 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 25 ते 28 एमएलडी इतकेच पाणी सिडकोला मिळते. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या 6 दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वायाळ येथील उपसा केंद्रावर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे त्याचा परिणाम नागरी वसाहतीतील पाणी पुरवठ्यावर झाला.

त्याबरोबरच पंप बिघडल्याने अडचणीत आणखीच भर पडली. त्यामुळे पाणीपुरवठा हा 19 एमएलडीवर आला. परिणामी सेक्टर 13, 14, 17, 18 या ठिकाणी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

त्यामुळे पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी सिडको कार्यालय गाठले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेवटी येत्या ७ दिवसात पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यलयाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे.

यावेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, ड प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कंडपीळे, नगरसेवक नितीन पाटील, मनोज भुजबळ, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, दर्शना भोईर, चारुशीला घरत, अजय बहिरा, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:बातमीला व्हिडीओ सोबत जोडले आहेत

पनवेल


दुष्काळाच्या झळा संपून पावसाने दमदार सलामी दिली असतानाही पनवेलकरांना सिडको प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे पनवेलकरांच्या घराघरात पाणी शिरलं, तर दुसरीकडे नवीन पनवेलकरांचा घसा कोरडाच आहे. पाणी आहे पण ते पुरवता येत नाही , अशी अवस्था सध्या एमजेपी प्रशासनाची झाल्यानं अखेर पनवेलमधील भाजप नगरसेवकांनी आपला मोर्चा सिडको कार्यालयात नेला आणि एमजेपीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
Body:नवीन पनवेल नोडला नऊ हजार ग्राहक आहेत. या ठिकाणी ४२ एमएलडी पाण्याची गरज आहे. परंतु सद्यस्थितीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून २५ ते २८ एम एल डी इतकेच पाणी सिडकोला मिळते. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वायाळ येथील उपसा केंद्रावर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे त्याचा परिणाम नागरी वसाहतीतील पाणी पुरवठ्यावर झाला. त्याचबरोबर पंप बिघडल्याने अडचणीत आणखीच भर पडली. त्यामुळे पाणीपुरवठा हा १९ एमएलडीवर आला. परिणामी सेक्टर १३, १४, १७, १८, या ठिकाणी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.


आता पावसाला चांगली सुरवात झाली आहे. नद्या , नाले , धरण येथे पाण्याची पातळी वाढली आहे. पाणी आहे पण ते पुरवता येत नाही , अशी अवस्था बनली असल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. याचाच जाब विचारण्यासाठी पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी सिडको कार्यालय गाठलं आणि एमजेपी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. शेवटी येत्या ७ दिवसात पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत न झाल्यास म.जी. प्रा.(MJP) कार्यलयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला, देखील यावेळी भाजप नगरसेवकांनी दिला. Conclusion:यावेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, ड प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कंडपीळे, ,नगरसेवक नितीन पाटील, मनोज भुजबळ, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, दर्शना भोईर, चारुशीला घरत, अजय बहिरा, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.