ETV Bharat / state

माणुसकीचा झरा : ते दोघे करताहेत स्वखर्चातून गरजूंना अन्नधान्य वाटप, अनेक कुटुंबियांना मदतीचा हात

author img

By

Published : Apr 20, 2020, 1:15 PM IST

नवशीन आणि लवेश हे सकाळी लवकर आपले वाहन घेऊन त्यात धान्य, पाणी भरून अलिबाग, मुरुड तालुक्यातील गरजूंना मदत करत आहेत. तसेच पोलीस, महसूल प्रशासन, रुग्णालय, प्रांत कार्यालय यांना मास्क, पाणी, बिस्किटचे वाटपही करत आहेत. आत्तापर्यत दोघांनी अनेक गरजवंताना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांचे मदतकार्य रोज सुरू असून संचारबंदी असेपर्यंत असेच सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते दोघे ठरत आहेत गरजवंतांचे अन्नदाता
ते दोघे ठरत आहेत गरजवंतांचे अन्नदाता

रायगड - कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद पडल्याने गरीब सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच ओढाताण होत आहे. अशावेळी शासन, प्रशासन, सामाजिक संस्था यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अलिबाग तालुक्यातील दोन मित्रही स्वखर्च करून रोज गरजवंताना पाणी, धान्य, मास्कचे वाटप करत मदत करत आहेत. नवशीन पटेल आणि लवेश नाईक असे या जोडगळींची नावे असून त्यांनी आत्तापर्यंत 700 कुटुंबाना मदत पोहोचवली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व कामधंदा बंद असून याचा सर्वाधिक फटका मोलमजुरी करणाऱ्या हातांना आणि सर्वसामान्य जनतेला बसला आहे. काम बंद असल्याने हातात पैसे नसल्याने अनेकांचे खाण्याचे हाल झाले आहेत. एकीकडे प्रशासन परराज्यातील मजूर, कामगार यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत आहेत. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील काही गरजवंत आजही मदतीविना उपेक्षित राहिले आहेत, अशा उपेक्षित असलेल्या गरजवंतांना नवशीन आणि लवेश हे स्वतः जाऊन मदत करत आहेत.

नवशीन आणि लवेश हे सकाळी लवकर आपले वाहन घेऊन त्यात धान्य, पाणी भरुन अलिबाग, मुरुड तालुक्यातील गरजूंना मदत करत आहेत. तसेच पोलीस, महसूल प्रशासन, रुग्णालय, प्रांत कार्यालय यांना मास्क, पाणी, बिस्किटचे वाटपही करत आहेत. आत्तापर्यत दोघांनी अनेक गरजवंताना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांचे मदतकार्य रोज सुरू असून संचारबंदी असेपर्यंत असेच सुरू राहणार असल्याचे नवशीन आणि लवेश यांनी सांगितले.

ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून हे दोघे नेहुली, मानी, भुते, लोणेरे आदी गावांमध्ये स्वतः जाऊन अन्नधान्य पुरविण्याचे कार्य करत आहे. या उपक्रमातून अनेकजण आपल्या या मित्रांना सहकार्याने पुढाकार घेऊन चिंचोटी, बापळे, मोरखोल, भिलजी, बोरघर, कावाडे, अलिबाग शहर बागमळा, चौलमळा, नागांव येथील कुटुंबांना प्रत्येकी तांदूळ, मूगडाळ, चवळी, गोडतेल, साखर, चहापावडर, मसाला, मीठ, हळद आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत.

रायगड - कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद पडल्याने गरीब सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच ओढाताण होत आहे. अशावेळी शासन, प्रशासन, सामाजिक संस्था यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अलिबाग तालुक्यातील दोन मित्रही स्वखर्च करून रोज गरजवंताना पाणी, धान्य, मास्कचे वाटप करत मदत करत आहेत. नवशीन पटेल आणि लवेश नाईक असे या जोडगळींची नावे असून त्यांनी आत्तापर्यंत 700 कुटुंबाना मदत पोहोचवली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व कामधंदा बंद असून याचा सर्वाधिक फटका मोलमजुरी करणाऱ्या हातांना आणि सर्वसामान्य जनतेला बसला आहे. काम बंद असल्याने हातात पैसे नसल्याने अनेकांचे खाण्याचे हाल झाले आहेत. एकीकडे प्रशासन परराज्यातील मजूर, कामगार यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत आहेत. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील काही गरजवंत आजही मदतीविना उपेक्षित राहिले आहेत, अशा उपेक्षित असलेल्या गरजवंतांना नवशीन आणि लवेश हे स्वतः जाऊन मदत करत आहेत.

नवशीन आणि लवेश हे सकाळी लवकर आपले वाहन घेऊन त्यात धान्य, पाणी भरुन अलिबाग, मुरुड तालुक्यातील गरजूंना मदत करत आहेत. तसेच पोलीस, महसूल प्रशासन, रुग्णालय, प्रांत कार्यालय यांना मास्क, पाणी, बिस्किटचे वाटपही करत आहेत. आत्तापर्यत दोघांनी अनेक गरजवंताना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांचे मदतकार्य रोज सुरू असून संचारबंदी असेपर्यंत असेच सुरू राहणार असल्याचे नवशीन आणि लवेश यांनी सांगितले.

ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून हे दोघे नेहुली, मानी, भुते, लोणेरे आदी गावांमध्ये स्वतः जाऊन अन्नधान्य पुरविण्याचे कार्य करत आहे. या उपक्रमातून अनेकजण आपल्या या मित्रांना सहकार्याने पुढाकार घेऊन चिंचोटी, बापळे, मोरखोल, भिलजी, बोरघर, कावाडे, अलिबाग शहर बागमळा, चौलमळा, नागांव येथील कुटुंबांना प्रत्येकी तांदूळ, मूगडाळ, चवळी, गोडतेल, साखर, चहापावडर, मसाला, मीठ, हळद आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.